अकोला | प्रतिनिधी
श्रावण महिन्यात अकोल्याचे आराध्य दैवत श्री राजराजेश्वर महाराज यांना जलाभिषेकासाठी गांधीग्राम
येथील पूर्णा नदीवरून जल नेण्यासाठी हजारो शिवभक्तांची यात्रा दरवर्षी आयोजित होते.
Related News
वजन कमी करायचे आहे का? गव्हाच्या पिठाऐवजी या आरोग्यदायी पिठांचा समावेश करा
अमेरिका-इराण संघर्ष: युद्ध झाले तर कोण जिंकणार?
कोल्ड ड्रिंक गॅस-अॅसिडिटीपासून आराम देतात का? तज्ज्ञांचा स्पष्ट सल्ला
अमोल कोल्हेंचा मोठा गौप्यस्फोट: विलिनीकरणानंतर भुजबळांना राज्यसभेची संधी मिळणार होती
गावातील वडिलोपार्जित जमिनीवर आता मिळवा कायदेशीर हक्क – पीएम स्वामित्व योजना सुरु!
29 वर्षांच्या अलेक्झांडर वांगचा मोदींसोबत एआय इम्पॅक्ट समिटमध्ये दमदार प्रवेश
BSNL 5G: शहरांसाठी हाय-स्पीड इंटरनेटची नवी क्रांती
दारूच्या नशेत 36 वर्षीय मुलाने 65 वर्षीय आईचा प्राण घेतला – समाज हादरला
‘Thank You India’ म्हणत Emmanuel Macron यांचा व्हिडिओ व्हायरल : मॅक्रॉन यांचा भारत दौरा; ‘धुरंधर’ गाण्याने व्यक्त केला खास आभार संदेश
यंदाही 28 जुलैपासून श्रावण महिना सुरू होत असल्याने, यात्रेपूर्वी गांधीग्राम घाट परिसरातील सुरक्षा व व्यवस्थापनाचा
आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षकांनी सकाळी 10 वाजता भेट दिली.
या पाहणीदरम्यान जिल्हाधिकारी अजित कुंभार, पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अप्पर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे,
उपविभागीय पोलीस अधिकारी, दहीहंडा पोलीस ठाण्याचे ठाणेदार पुरुषोत्तम ठाकरे, शहर वाहतूक शाखेचे अधिकारी,
तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, आरोग्य विभाग,
ग्रामपंचायत अधिकारी व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पाहणीदरम्यान घाटावर बॅरिकेडिंग, रस्त्यांची स्वच्छता, पथदिवे, वाहतुकीची सोय,
जलस्तराची स्थिती याबाबत सखोल चर्चा करण्यात आली. यात्रेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि शिवभक्तांना
कोणतीही अडचण येऊ नये यासाठी प्रशासन सज्ज असल्याची ग्वाहीही यावेळी देण्यात आली.
