पहिल्यांदाच ट्रॉफीवर नजर:
आरसीबीचे नेतृत्व भलेही यंदा रजत पाटीदार करत असले, तरीही या संघाची खरी
ओळख विराट कोहली आहे. कोहलीने जगभरात अनेक विजेतेपदे मिळवली,
Related News
मात्र आयपीएल ट्रॉफी अजूनही त्याच्या झोळीत आलेली नाही. यंदा ती संधी आहे. दुसरीकडे,
श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील पंजाब किंग्सही पहिल्यांदा चॅम्पियन होण्यासाठी सज्ज आहे.
अय्यर मागील हंगामात KKR चे कर्णधार होते.
अहमदाबादमध्ये पावसाचे सावट:
3 जूनला अहमदाबादमध्ये संध्याकाळनंतर पावसाची शक्यता वर्तवली आहे.
त्यामुळे अंतिम सामन्यावर पावसाचे संकट आहे. मात्र, BCCI ने तयारी करून ठेवली आहे –
सामन्यासाठी 120 मिनिटांचा अतिरिक्त वेळ आणि 4 जूनचा रिजर्व डे राखीव ठेवलेला आहे.
जर दोनही दिवस सामना न झाल्यास काय?
जर 3 व 4 जून या दोन्ही दिवशी 5 षटकांचाही सामना झाला नाही,
तर लीग टप्प्यात गुणतालिकेत वर असलेल्या संघाला विजेता घोषित करण्यात येईल.
यानुसार पंजाब किंग्सला फायदेशीर स्थिती आहे, कारण दोन्ही संघांचे
19 गुण असले तरी पंजाबचा नेट रन रेट 0.372, तर RCB चा 0.301 आहे.
संपूर्ण निर्णय मैदानात ठरणार:
तरीही अंतिम निर्णय मैदानात होईल, जर सामना खेळवला गेला तर जो चांगला खेळेल, तोच आयपीएल 2025 चा चॅम्पियन ठरेल.
Read Also : https://ajinkyabharat.com/ayodhya-chaya-ram-temple-pranapratishtha-sohyacha-dusara-tappa/
