शेगाव प्रतिनिधी
श्री क्षेत्र पंढरपूर येथे होणाऱ्या आषाढी एकादशी यात्रा महोत्सवासाठी
श्रीच्या पालखीचे प्रस्थान आज संत नगरी शेगाव येथून झाले.
Related News
अकोला- जिल्हा नियोजन समितीचा वाद
अवैध्य गौण खनिज विना रायल्टी वाहतूक प्रकरणी पातुर महसूल विभागाने दोन ट्रॅक्टर पकडले
अकोल्यातील बार्शीटाकळी शहरात आज भीषण अपघात
12 मिनिटांत घेतलं आयुष्याचं टोकाचं निर्णय; पुण्यात आयटी अभियंतेच्या आत्महत्येचं CCTV फुटेज समोर
‘श्रीं’ ची पालखी शनिवारी पातुरात ; पंचायत समितीकडून स्वागताची जय्यत तयारी
भारतासाठी अभिमानाचा क्षण! राफेल लढाऊ विमानाचा ढाचा आता भारतात तयार होणार;
जालना जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयातील धक्कादायक प्रकार समोर..
पंतप्रधान मोदींच्या हस्ते ‘सिंदूर’ वनस्पतीचे रोपण;
गजानन महाराज पालखी सोबत ‘व्यवसाय व वारी’चा अनोखा संगम!
अकोट शहरात देवपूरा सोमवार वेस येथे शॉट सर्किट झाल्याने घराला लागली आग…
कोरोनाचा पुनरुज्जीवन! देशभरात 5000 जवळपास अॅक्टिव्ह रुग्ण,
खतांची संशयास्पद विक्री : वाहनातील साठा सील!
या पालखी सोहळ्याचे यंदाचे हे सलग 56वे वर्ष असून,
यामध्ये 700 हून अधिक वारकरी सहभागी झाले आहेत.
रथ, मेणा, अश्व, टाळकरी, पताकाधारी अशा पारंपरिक वेशभूषेतील वारकऱ्यांच्या उपस्थितीत,
“जय गजानन, श्री गजानन, गण गण गणात बोते” व “श्रीहरी विठ्ठल”
या नामजपाच्या गजरात पालखीचे पंढरपूरकडे मंगल प्रस्थान झाले.
टाळ-मृदंगाच्या निनादात, भक्तीभावाने भारलेल्या वातावरणात हा सोहळा पार पडला.
श्रीची पालखी तब्बल 33 दिवसांचा पायी प्रवास करत सुमारे 725 किलोमीटरचे अंतर पार करून
4 जूलै रोजी श्री क्षेत्र पंढरपूर येथे पोहोचणार आहे. पंढरपूरमध्ये 4 जुलै ते 9 जुलै दरम्यान
श्री गजानन महाराज संस्थानच्या शाखेत पालखीचा मुक्काम असणार आहे.
परतीचा प्रवास 10 जुलै रोजी सुरू होणार असून, पंढरपूर ते शेगाव हे सुमारे 550 किलोमीटरचे
अंतर पायी पार करून, 30 जुलै रोजी खामगाव येथे मुक्काम केल्यानंतर,
31 जुलै (गुरुवार) रोजी श्रीची पालखी शेगावला पोहोचणार आहे.
एकूण 1300 किलोमीटरचा पायी प्रवास भक्तिभावाने करणाऱ्या वारकऱ्यांसाठी ही एक अद्वितीय आध्यात्मिक यात्रा ठरणार आहे.
READ MORE HERE https://ajinkyabharat.com/balapuramadhil-three-rahivashancha-death/