अकोला | प्रतिनिधी
अकोला शहरातील गांधी रोड परिसरात सुरू असलेली आयकर विभागाची छापेमारी दुसऱ्या दिवशीही
सुरू राहिल्याने शहरात प्रचंड खळबळ निर्माण झाली आहे. सराफा दुकानांवर सुरू
Related News
कापशी रस्त्यावरील अपूर्ण सर्विस रोड जीवघेणा ठरत आहे!
धामणा बुद्रुकमध्ये कॉलराचा उद्रेक; एका नागरिकाचा मृत्यू, गावात भीतीचं वातावरण
रिधोरा : नाग प्रजातीचा विषारी साप घरात आढळला;
पिंपळखुटा येथील चोरी गेलेले गोवंश पोलिसांनी पकडले
धामणा बुद्रुक येथे कॉलऱ्याचा शिरकाव; एकाचा मृत्यू, ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण
अकोल्यातील शेतकऱ्याचा मुलगा बनला ‘क्रिकेट पंच’
धोंडा आखर येथे ‘प्रधानमंत्री धरती आबा’ अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद
परशुराम नाईक विद्यालयाचे तंबाखू मुक्त अभियान कौतुकास्पद – न्यायाधीश आर. एन. बंसल यांची प्रशंसा
बोर्डी ग्रामपंचायतीचा भोंगळ कारभार : सांडपाण्यामुळे नागरिक त्रस्त
इंझोरी महसूल मंडळात २०० एकरांवर दुबार पेरणीचे संकट
“आपके नाम से हर शख्स…” शिंदेंचा शेर आणि ‘जय गुजरात’ घोषणेने चर्चांना उधाण!
सेंट पॉल्स अकॅडमी ,अकोट येथे शाळेचा स्थापना दिवस उत्साहात साजरा
असलेल्या या तपासणीमुळे केवळ संबंधित व्यापारीच नव्हे तर संपूर्ण सराफा बाजारात चिंता पसरली आहे.
सकाळपासूनच दुकानांपुढे आयकर विभागाची वाहने
बुधवारपासून सुरू झालेल्या कारवाईदरम्यान आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांची वाहने
सलग दुसऱ्या दिवशी सकाळपासूनच सराफा दुकानांपुढे उभ्या असल्याचे दृश्य नागरिकांनी पाहिले.
त्यामुळे परिसरात एकच चर्चा रंगली – “कारवाईचा आघात नेमका कोणावर झाला?”
व्यवहारांची कसून तपासणी
मिळालेल्या माहितीनुसार, आयकर अधिकाऱ्यांनी दुकानांतील खरेदी-विक्री व्यवहार, आर्थिक नोंदी,
रोख रकमेची देवाणघेवाण व बिलांची सखोल छाननी केली. काही महत्त्वाचे दस्तऐवज जप्त केल्याचेही समजते.
नागपूर विभागाच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
ही कारवाई आयकर विभागाच्या नागपूर परिक्षेत्राच्या मार्गदर्शनाखाली केली जात आहे, अशी माहिती समोर आली आहे.
अनिश्चितता कायम, अधिकृत माहितीची प्रतीक्षा
या कारवाईबाबत अधिकृत प्रेस नोट अद्याप मिळालेली नाही. त्यामुळे कारवाई कोणत्या पातळीवर सुरू आहे,
ती किती काळ सुरू राहणार आणि कुणावर नेमकी कारवाई झाली आहे, याबाबत अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत.
इतर व्यवसायिकांमध्ये भीतीचं वातावरण
सराफा बाजारात यामुळे इतर व्यापाऱ्यांमध्येही अस्वस्थता आणि भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.
काही व्यवसायिकांनी सांगितलं की, “कायदेशीर व्यवहार असूनही अशा कारवाया झाल्याने तणाव वाढतो.”
Read Also : https://ajinkyabharat.com/dronechya-najretoon-operation-clean/