मुंबई | प्रतिनिधी
ऑपरेशन सिंदूरनंतर देशभरात देशभक्तीची लाट उसळली असतानाच मुंबईतील एका जोडप्याने शहीद
मुरली नायक यांच्या कुटुंबासाठी एक स्तुत्य निर्णय घेतला आहे. स्वतःच्या परदेश दौऱ्यासाठी साठवलेली
Related News
ठाणे-कल्याणमध्ये घर खरेदीदारांसाठी सुवर्णसंधी;
बीएसएफ जवान पूर्णम कुमार शॉ यांची पाकिस्तानातून सुरक्षित वापसी
कान्समध्ये उर्फी जावेदचा डेब्यू उधळला;
शोपियांमध्ये ‘ऑपरेशन केलर’ दरम्यान मोठी कारवाई;
“अकोल्याच्या पातुर रोडवर एक भीषण अपघात झाला आहे…
जागतिक तणावाच्या पार्श्वभूमीवर सोनं खरेदी करावं की विकावं
अकोल्यातील पाच मोठ्या सराफा दुकांनांवर आयकर विभागाची धाड,
“सीजेआय पदाची शपथ घेण्याआधी आईचं आशीर्वाद घेतलं”
“भारताच्या अटींवरच उत्तर मिळेल; ऑपरेशन सिंदूरनंतर आदमपूरवरून मोदींचा संदेश”
“सरन्यायाधीशांच्या मातोश्रींचा स्पष्ट सूर : ‘बॅलेट पेपरच सुरक्षित, मतदारांचा विश्वास जपणं गरजेचं'”
दहावी नापास? चिंता नको! आता अकरावीमध्ये प्रवेशाचा मार्ग खुला
महागाईने झोप उडवली! वाढलेल्या दरांमुळे गृहिणींचे बजेट कोलमडले, प्रवासही महागला
रक्कम त्यांनी शहीदाच्या कुटुंबाला अर्पण केली आहे. ही घटना समाजाला एक सकारात्मक संदेश देणारी ठरली आहे.
शहीदासाठी दांपत्याचा अभिमानास्पद निर्णय
जोडप्याने आपली ओळख गोपनीय ठेवत ही मदत ‘वीआरयुवा’ संस्थेच्या माध्यमातून केली आहे.
त्यांचा विश्वास आहे की देशासाठी बलिदान दिलेल्या एका सुपुत्राच्या कुटुंबाला ही मदत थोडासा आधार देईल.
“आमच्या परदेश दौऱ्यापेक्षा एका वीरमृत जवानाच्या कुटुंबाचं सुख महत्त्वाचं आहे,” असं त्या दांपत्याचं म्हणणं आहे.
शहीद मुरली नायक – एकमेव अपत्य, देशासाठी बलिदान
शहीद मुरली नायक हे आंध्र प्रदेशातील श्री सत्य साई जिल्ह्यातील कल्लीथांडा गावचे रहिवासी होते.
ते आपल्या आई-वडिलांचे एकमेव अपत्य होते. एलओसीवर झालेल्या गोळीबारात त्यांनी वीरमरण पत्करलं.
त्यांच्या बलिदानाने संपूर्ण देशात शोकाची लाट उसळली.
सरकारकडूनही मदतीचं आश्वासन
आंध्र प्रदेश सरकारने शहीद मुरली नायक यांच्या कुटुंबासाठी ५० लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे.
त्याचसोबत ५ एकर शेती, ३०० वर्ग गजांचे घर आणि कुटुंबातील एका सदस्याला शासकीय नोकरी देण्याचे
आश्वासनही देण्यात आले आहे. उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांनीही २५ लाख रुपयांची वैयक्तिक मदत जाहीर करत कुटुंबाला भेट दिली.
समाजासाठी प्रेरणा
या दांपत्याने दाखवलेली संवेदनशीलता आणि कर्तव्यभावना सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात
कौतुकाचा विषय ठरली आहे. देशासाठी प्राण गमावणाऱ्या जवानांच्या
कुटुंबासाठी सामान्य नागरिकांचाही हातभार लागू शकतो, हे त्यांनी सिद्ध केलं आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/cj/