१२ मे २०२५ | नवी दिल्ली
पाकिस्तानात असलेल्या दहशतवादी तळांवर भारतीय लष्कराने केलेल्या निर्णायक कारवाईनंतर,
“ऑपरेशन सिंदूर” संदर्भात सोमवारी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेला राष्ट्रकवी रामधारी सिंह दिनकर यांच्या कवितेच्या ओजस्वी ओळींनी सुरुवात झाली.
Related News
चूकूनही करू नका ही एक चूक
विराट कोहलीचा टेस्ट क्रिकेटमधून संन्यास
चंद्रपूरमध्ये वाघाची दहशत – ७२ तासांत ५ महिलांचा मृत्यू
“पहलगामपर्यंत पापाचा घडा भरला होता…
नीट ची तयारी करणाऱ्या दोन विद्यार्थ्यांची आत्महत्या
बुद्ध पौर्णिमेच्या निमित्तानं अकोल्यातील अशोक वाटिकेत प्रार्थनांचं आयोजन
बुद्ध पौर्णिमा निमित्त महाबोधी वृक्षाचे १२ तास महापूजा
मराठा पर्यटन ट्रेन ९ जूनपासून सुरू
विराट कोहलीची टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती;
ड्रोन हल्ल्यांमुळे PSL स्थगित; बांगलादेशी खेळाडूचा पाकिस्तान क्रिकेटवर गंभीर आरोप
भारताच्या कारवाईत पाकिस्तानच्या फायटर जेटला नुकसान
काटेपूर्णा अभयारण्यात आज वैशाख पौर्णिमेला मचाणावरून होणार प्राणी गणना
भारतीय हवाई दलाचे वायू संचालन महासंचालक एअर मार्शल ए. के. भारती यांनी ही पत्रकार परिषद सुरू करताना
दिनकर यांची प्रसिद्ध कविता ‘रश्मिरथी’ यातील ओळींचा उल्लेख करत, भारताचा संदेश स्पष्ट केला – “याचना नाही आता रण होईल, जीवन जय की मरण होईल!”
त्याच वेळी त्यांनी तुलसीदास यांचेही शब्द उद्धृत करत स्पष्ट केलं की भारत
आता केवळ विनवण्या करणार नाही, तर दहशतवाद्यांना आणि त्यांच्या पाठराखणाऱ्या यंत्रणांना कठोर उत्तर दिलं जाईल.
लेफ्टिनंट जनरल राजीव घई यांनी आपली माहिती देताना स्पष्ट केलं की, “भारताने सीमा ओलांडली नाही,
पण पाकिस्तानकडून त्याचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न झाला. मात्र, भारतीय हवाई संरक्षण यंत्रणेने प्रत्येक हल्ला अपयशी ठरवला.”
पत्रकार परिषदेत ‘ऑपरेशन सिंदूर’चा एक शक्तिशाली व्हिडिओ दाखवण्यात आला,
ज्यामध्ये दिनकर यांची कविता पार्श्वसंगीत म्हणून वापरली गेली होती. यामुळे भारताने
केवळ सैनिकी ताकद नव्हे तर सांस्कृतिक आणि नैतिक संदेशही देण्याचं तंत्र वापरलं.
घई यांनी शेवटी म्हटलं, “हौसले बुलंद असतील तर यश तुमचे पाय धरते.”
हे विधान ऑपरेशन सिंदूरच्या यशावर शिक्कामोर्तब करत होतं.
Read Also : https://ajinkyabharat.com/virat-kohlicha-test-cricketmadhun-retirement/