अकोला, दि. १० : राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने दिलेल्या निर्देशानुसार सर्व यंत्रणांनी सजग
राहून दिलेल्या सुचनांचे काटेकोर पालन करावे. जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवतानाच,
चुकीची माहिती, अफवा पसरणार नाही याची खबरदारी घ्यावी. तसे आढळल्यास वेळीच खंडन करावे,
Related News
यवतमाळ, ९ मे :
लोहारा पोलीस स्टेशनच्या हद्दीत दोन कुख्यात हिस्ट्रीशीटर गुन्हेगार संशयास्पद रित्या फिरत
असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाल्यानंतर तात्काळ कारवाई करण्यात आ...
Continue reading
मुंबई :
पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर
(PoK) मधील ९ दहशतवादी तळांवर प्रतिहल्ला करत ‘ऑपरेशन सिंदूर’ यशस्वीपणे पार पाडले.
या का...
Continue reading
अकोला :
अकोला शहरात आज सायंकाळी अचानक वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाला सुरुवात झाली.
अवघ्या वीस मिनिटांपर्यंत चाललेल्या या मुसळधार पावसामुळे नागरिकांची मोठी तारांबळ उडाली.
शहरातील ...
Continue reading
नवी दिल्ली :
भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आज एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.
दोन्ही देशांमध्ये तात्काळ आणि पूर्ण शस्त्रसंधीवर सहमती झाली असून, ती ...
Continue reading
सतना (मध्य प्रदेश) :
जिथे देश झोपलेला असतो, तिथे चूंद गावाचे जवान सरहद्दीवर जागे असतात.
मध्य प्रदेशातील सतना जिल्ह्यातील लहानसं चूंद गाव आज देशासाठी अभिमानाचं प्रतीक ठरतंय.
फक्त...
Continue reading
नवी दिल्ली | वॉशिंग्टन: अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक मोठा दावा करत सांगितले की,
भारत आणि पाकिस्तान सीझफायरवर (शस्त्रसंधी) सहमत झाले आहेत. ट्रम्प यांनी त्य...
Continue reading
नवी दिल्ली: भारत आणि पाकिस्तानमधील तणाव ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर अधिकच तीव्र झालेला असताना,
केंद्र सरकारने दहशतवादाविरुद्ध एक कठोर आणि ऐतिहासिक निर्णय घेतला आहे.
केंद्र सरकारशी संबंधि...
Continue reading
अकोट प्रतिनिधी: वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर (प्रकाश आंबेडकर)
यांच्या वाढदिवसानिमित्त अकोट येथे वंचित बहुजन युवक आघाडीच्या वतीने रक्तदान शिबिरा...
Continue reading
नवी दिल्ली: ऑपरेशन सिंदूरच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात पाकिस्तानविरोधी संताप उसळला असताना,
AIMIM प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी पाकिस्तानवर थेट आणि परखड हल्लाबोल केला आहे.
भारता...
Continue reading
रायपूर (छत्तीसगड): भारताच्या हरित ऊर्जेकडे वाटचाल करताना अदानी इंटरप्रायजेसने देशातील
पहिला हायड्रोजन फ्यूल सेल ट्रक लाँच केला आहे. हा ट्रक विशेषतः कोळसा वाहतुकीसाठी वापरण्यात ये...
Continue reading
अमरावती : शहरातील नांदगाव पेठ औद्योगिक वसाहतीमधील एका नामांकित खासगी कंपनीला पाकिस्तानमधून
आलेल्या कॉलवरून बॉम्बने उडवण्याची धमकी मिळाल्याने एकच खळबळ उडाली आहे. या कॉलमुळे
कंपनीत...
Continue reading
नवी दिल्ली/बीजिंग : भारताच्या ‘ऑपरेशन सिंदूर’मुळे पाकिस्तान अस्वस्थ झाला असून
दोन्ही देशांमध्ये निर्माण झालेल्या तणावामुळे चीनची धडधड वाढली आहे.
भारताने दहशतवादाविरोधात घेतलेल्या...
Continue reading
असे निर्देश जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी आज दिले.
सदयस्थितीच्या अनुषंगाने राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने दिलेले निर्देश आणि मान्सूनपूर्व तयारीचा आढावा
घेण्यासाठी बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात पार पडली, त्यावेळी ते बोलत होते.
सहाय्यक पोलीस अधीक्षक अमल मित्तल, महापालिका आयुक्त सुनील लहाने, निवासी उपजिल्हाधिकारी
तथा उपविभागीय अधिकारी डॉ.शरद जावळे, सर्व उपविभागीय अधिकारी , सर्व तहसीलदार ,
कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम , जिल्हा शल्य चिकीत्सक , जिल्हा आरोग्य अधिकारी ,
सर्व नगरपालिका मुख्याधिकारी यांच्यासह सर्व यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री अजित कुंभार म्हणाले की, सर्व यंत्रणांनी परस्परांशी सातत्यपूर्ण समन्वय ठेवावा.
कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी वायरलेस यंत्रणा, २४ बाय ७ नियंत्रण कक्ष व सर्व सुरक्षा यंत्रणा ’अलर्ट’ ठेवाव्यात.
चुकीची माहिती मिळून कुठेही अव्यवस्था निर्माण होता कामा नये. अफवा पसरू नयेत याची खबरदारी घ्यावी.
अधिकृत संदेश व संकेतस्थळाबाबत नागरिकांची जाणीवजागृती करावी.
जिल्ह्यात मान्सूनपूर्व नालेसफाई आदी कामे महापालिका व स्थानिक स्वराज्य संस्थांनी विहित मुदतीत पूर्ण करावी.
रुग्णालये, रुग्णवाहिका, अग्निशमन दल, निवारा केंद्रे, आरोग्य केंद्रे सुसज्ज ठेवावी. पुरेसा औषध साठा ठेवावा.
सर्वत्र पाणीपुरवठा सुरळीत ठेवावा. दूषित पाणी, अस्वच्छता, रोगराई पसरू नये यासाठी उपाययोजना कराव्यात.
हवामान खात्याकडून येणा-या सूचना सर्वदूर प्रसारित व्हाव्यात. जलप्रकल्पांच्या ठिकाणी आवश्यक सर्व दुरुस्ती वेळेत पूर्ण कराव्यात.
आरोग्य विभाग, नगरपालिका, महानगरपालिका, पाटबंधारे विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग आदी
यंत्रणांनी नियंत्रण कक्ष सुरू करून जिल्हा नियंत्रण कक्षाशी समन्वय ठेवावा.
नदी नाल्याच्या प्रवाहास अडथळा असलेले अतिक्रमण काढणे, घनकचरा व्यवस्थापन, संभाव्य धोका टाळण्यासाठी
वाळलेली झाडे विहित प्रक्रिया पूर्ण करून तोडणे आदी बाबींची वेळेत पूर्तता करावी,
असे निर्देश जिल्हाधिकारी श्री. अजित कुंभार यांनी दिले आहेत.
Read Also : https://ajinkyabharat.com/mission-sinduramadhye-300-jawan-sarahdhadi/