सतना (मध्य प्रदेश) :
जिथे देश झोपलेला असतो, तिथे चूंद गावाचे जवान सरहद्दीवर जागे असतात.
मध्य प्रदेशातील सतना जिल्ह्यातील लहानसं चूंद गाव आज देशासाठी अभिमानाचं प्रतीक ठरतंय.
Related News
लोहारा पोलिसांच्या कारवाईत दोन पिस्तुलांसह दोन हिस्ट्रीशीटर अटकेत
‘ऑपरेशन सिंदूर’वर फिल्म घोषणेनंतर वाद; निर्मात्यांकडून माफी
अकोला शहरात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस;
भारत-पाकिस्तान दरम्यान तात्काळ शस्त्रसंधी लागू; संध्याकाळी ५ वाजल्यापासून गोळीबार थांबणार
सर्व यंत्रणांनी सजग राहून सातत्यपूर्ण समन्वय ठेवावा – जिल्हाधिकारी अजित कुंभार
भारत-पाकिस्तान सीझफायरवर सहमत? ट्रम्प यांचा मोठा दावा,
भारताचा दहशतवादाविरुद्ध ऐतिहासिक निर्णय;
वंचित बहुजन युवक आघाडीच्या वतीने रक्तदान शिबिर
ओवैसींचा पाकिस्तानवर घणाघात; ‘हुकूमत तर सोडा
भारताचा पहिला हायड्रोजन फ्यूल सेल ट्रक अदानी इंटरप्रायजेसकडून लाँच;
पाकिस्तानी कॉलवरून अमरावतीतील कंपनीला बॉम्बने उडवण्याची धमकी
भारत-पाकिस्तान तणावावर चीनची चिंता वाढली ;
फक्त 4700 लोकसंख्या असलेल्या या गावातील 500 हून अधिक लोक सैन्यात आहेत,
तर 300 जवान सध्या प्रत्यक्ष सीमेवर मिशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तानच्या नापाक कारवायांना प्रत्युत्तर देत आहेत.
या गावाच्या प्रत्येक घराचा कोणत्या ना कोणत्या प्रकारे भारतीय लष्कराशी संबंध आहे. कोण नेव्हीत आहे,
कोण एअरफोर्समध्ये, तर कोण स्पेशल कमांडो युनिटमध्ये कार्यरत आहे. इथल्या मातांचे स्वप्न मुलांना वर्दीत
पाहण्याचं असतं आणि मुलंही “भारत माता की जय” च्या घोषणांमध्ये देशभक्तीने मोठी होतात.
सात पिढ्यांची शौर्यपरंपरा
चूंद गावाच्या मातीला वीरांचा सुगंध लाभला आहे. दुसऱ्या महायुद्धापासून कारगिल युद्ध आणि आता मिशन सिंदूरपर्यंत,
या गावाने सात पिढ्यांतून सैन्यात सेवा दिली आहे. गावात शहीद समर बहादुर सिंह, शहीद कन्हैया लाल सिंह
आणि शहीद बाबूलाल सिंह यांचे स्मारक आजही त्यांच्या बलिदानाची साक्ष देतात.
मिशन सिंदूर सुरु होताच जवान पुन्हा मोर्चावर
अलीकडेच काही जवान सुट्टीवर गावात आले होते. पण मिशन सिंदूर सुरु झाल्याचे आदेश मिळताच,
त्यांनी एकही क्षण न गमावता सरळ मोर्चाकडे प्रस्थान केलं. गावातील महिलाही आपल्या पती,
भाऊ आणि मुलांच्या शौर्यावर अभिमान बाळगतात. त्यांच्या डोळ्यात चिंता असली तरी हृदयात देशासाठीची निष्ठा कायम असते.
निवृत्त जवानांचा देखील जोश कायम
गावातील निवृत्त जवान देखील आजही म्हणतात, “जर सरकारने पुकारा दिला,
तर आम्ही पुन्हा बंदूक उचलायला तयार आहोत.” ही देशभक्तीच चूंद गावाला ‘वीर सपूतांची भूमी’ बनवते.
Read Also : https://ajinkyabharat.com/india-pakistan-ceasefire-agreed-trump-yancha-motha-claim/