नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तानदरम्यान निर्माण झालेल्या युद्धजन्य स्थितीच्या पार्श्वभूमीवर
बलुचिस्तानमधून एक मोठा घडामोड समोर आली आहे. बलुचिस्तान लिब्रेशन आर्मी (BLA) आणि बलुचिस्तान
आर्मीने पाकिस्तान आणि चीनला थेट इशारा दिला आहे. “पाकिस्तानने बलुचिस्तानमधून सैन्य हटवावे
Related News
लोहारा पोलिसांच्या कारवाईत दोन पिस्तुलांसह दोन हिस्ट्रीशीटर अटकेत
‘ऑपरेशन सिंदूर’वर फिल्म घोषणेनंतर वाद; निर्मात्यांकडून माफी
अकोला शहरात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस;
भारत-पाकिस्तान दरम्यान तात्काळ शस्त्रसंधी लागू; संध्याकाळी ५ वाजल्यापासून गोळीबार थांबणार
सर्व यंत्रणांनी सजग राहून सातत्यपूर्ण समन्वय ठेवावा – जिल्हाधिकारी अजित कुंभार
मिशन सिंदूरमध्ये 300 जवान सरहद्दीवर
भारत-पाकिस्तान सीझफायरवर सहमत? ट्रम्प यांचा मोठा दावा,
भारताचा दहशतवादाविरुद्ध ऐतिहासिक निर्णय;
वंचित बहुजन युवक आघाडीच्या वतीने रक्तदान शिबिर
ओवैसींचा पाकिस्तानवर घणाघात; ‘हुकूमत तर सोडा
भारताचा पहिला हायड्रोजन फ्यूल सेल ट्रक अदानी इंटरप्रायजेसकडून लाँच;
पाकिस्तानी कॉलवरून अमरावतीतील कंपनीला बॉम्बने उडवण्याची धमकी
आणि चीनने बीआरआय प्रकल्पाचे काम थांबवावे, अन्यथा आम्हाला हल्ले
करण्यावाचून पर्याय उरणार नाही,” असा इशारा या गटांनी दिला आहे.
बलुचिस्तानकडून स्पष्ट करण्यात आले आहे की, ग्वादर पोर्टवर चीन आणि पाकिस्तानला नियंत्रण मिळवू देणार नाही.
त्याचबरोबर बीआरआय (बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह) प्रकल्पाचा तीव्र विरोध करण्यात येत असून,
त्या अंतर्गत सुरू असलेल्या बांधकामांना लक्ष्य केले जाईल, असा इशारा देण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बलुचिस्तान लिब्रेशन आर्मीने अलीकडच्या काळात पाकिस्तानवर
जोरदार हल्ले केले असून, काही अहवालानुसार त्यांनी प्रदेशातील एक तृतीयांश
भागावर नियंत्रण मिळविल्याचा दावा केला आहे. पाकिस्तानमध्ये अंतर्गत असंतोष वाढत
असतानाच या घडामोडींमुळे त्याच्या आंतरराष्ट्रीय प्रकल्पांवरही संकट निर्माण झाले आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/operation-vermilion/