नवी दिल्ली | प्रतिनिधी
पाहलगाम येथील भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तान व पाकव्याप्त
काश्मीरमधील दहशतवादी तळांवर निर्णायक हल्ले केले. या कारवाईनंतर पहिल्यांदाच दोन महिला लष्करी अधिकारी —
Related News
कर्नल सोफिया कुरेशी (सेना) आणि विंग कमांडर व्योमिका सिंग (हवाई दल) — यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन
भारताच्या लष्करी निर्णयाचे नेतृत्व केले. या ऐतिहासिक क्षणाने केवळ भारताचा
दहशतवादाविरोधातील निर्धार अधोरेखित केला नाही, तर महिलांच्या वाढत्या लष्करी सहभागाची साक्षही दिली.
कर्नल कुरेशी या भारतीय लष्करातील सिग्नल कोअरमध्ये अधिकारी असून, त्यांनी २०१६ मध्ये Force-18 या
आंतरराष्ट्रीय सैनिकी सरावात भारताचे प्रतिनिधित्व करत १८ देशांच्या प्रशिक्षणात नेतृत्व केले होते.
त्या भारतीय लष्करात १९९० पासून सेवा देत असून त्यांनी युएन पीसकीपिंग मिशन अंतर्गत काँगोमध्येही भारताचे प्रतिनिधित्व केले आहे.
त्याचवेळी, विंग कमांडर व्योमिका सिंग यांनी २००४ पासून भारतीय हवाई दलात सेवा दिली असून,
त्यांनी चेतक आणि चिटा हेलिकॉप्टरसह अनेक धोकादायक उड्डाण मोहिमा पार पाडल्या आहेत.
पूर्वोत्तर भारतातील पूर बचाव कार्यात त्यांच्या कामगिरीबद्दल त्यांना सिग्नल ऑफिसर-इन-चीफ यांचं गौरवप्रमाणपत्र मिळालं आहे.
२०१७ मध्ये त्या विंग कमांडर पदावर बढती मिळवणाऱ्या अग्रगण्य महिला अधिकाऱ्यांपैकी एक ठरल्या.
भारताच्या ऑपरेशन सिंदूर मोहिमेनंतर माध्यमांसमोर या दोन अधिकाऱ्यांनी संयमी, आत्मविश्वासपूर्ण आणि ठाम
भाषणातून केवळ देशाच्या लष्करी कारवाईचं स्पष्टीकरण दिलं नाही, तर जागतिक स्तरावर भारताच्या स्त्रीशक्तीचं दर्शन घडवलं.
हे नेतृत्व केवळ रणनीतीच नव्हे, तर लिंगसमानतेचं सशक्त प्रतीक बनलं आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/operation-sinduramaga-a-sasti-heroine-colonel-sophia-qureshi/
