पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव कमालीचा वाढला आहे.
या हल्ल्यात २६ निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाल्यानंतर भारतानं आक्रमक पवित्रा घेतला
असून पाकिस्तानविरोधात कठोर पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे.
Related News
अकोला शहरातील गुंटेवारी लेआउटचे काम लवकरच सुरू होणार; म.न.पा आयुक्तांचा विश्वास
बोरगाव मंजू येथे दोन गटात तुफान हाणामारी; तक्रार घेताना पोलिसांची एकतर्फी भूमिका?
बाळापूर ब्रेकिंग: मनारखेड दरोडा प्रकरणातील टोळी उखडली; उरळ पोलिसांची मोठी कारवाई
चित्र नगरी कोल्हापूरच्या राज्य सदस्य पदी निलेश जळमकर यांची नियुक्ती झाल्याबद्दल सत्कार
अकोला जिल्ह्यात पुन्हा अतिवृष्टीचा इशारा; 4 जुलैपर्यंत हवामान खात्याचा अलर्ट, प्रशासन सतर्क
हिंदी सक्तीचा निर्णय उद्धव ठाकरेंचा, आंदोलनात राज ठाकरेंची उडी – प्रतापराव जाधव यांची टीका
महामार्गावर भीषण अपघात, भला मोठा कंटेनर पलटी; अफवांमुळे लुटीचा प्रयत्न, परिसरात एकच खळबळ!
एलपीजी दरात कपात: कमर्शियल सिलेंडर ५८.५० रुपयांनी स्वस्त
भोपाल कोर्टमधून चित्रपटात शोभेल अशी घटना! शिक्षा ऐकताच आरोपी कोर्टातून पळाला
अकोल्यात सिटी कोतवाली पोलिसांची कारवाई; २४ तासांत दुचाकी चोरटे जेरबंद
मन नदीत आढळला अज्ञात व्यक्तीचा मृतदेह; बाळापूर शहरात खळबळ
मतदार यादी अचूकतेसाठी अकोट तहसील कार्यालयात बीएलओ व पर्यवेक्षकांना प्रशिक्षण
भारताने सिंधू जल करार तात्पुरता स्थगित केला असून व्यापारासह सर्व प्रकारचे संबंध तुटवले आहेत.
भारताच्या या निर्णयांना जागतिक पातळीवर मोठा पाठिंबा मिळत आहे. विशेषतः क्वाड देश — अमेरिका, जपान,
ऑस्ट्रेलिया आणि भारत — यांचे एकत्रित समर्थन भारताच्या बाजूने दिसून येत आहे.
ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बनीज यांच्यासोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची टेलिफोनवर चर्चा झाली.
यात त्यांनी भारत-ऑस्ट्रेलिया कूटनीती भागीदारी आणखी बळकट करण्याचे ठरवले.
अल्बनीज यांनी प्रत्येक पावलावर भारतासोबत उभं राहण्याचा विश्वास दिला.
या पार्श्वभूमीवर, चीनलाही पाकिस्तानला मदत करताना आता अनेक वेळा विचार करावा लागणार आहे.
कारण क्वाडमधील चारही देश भारताच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून दहशतवादविरोधी भूमिका अधिक आक्रमक झाली आहे.
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनीही जपानी शिष्टमंडळाशी चर्चा करून संरक्षण सहकार्य अधिक घट्ट करण्याचा प्रयत्न केला आहे.
त्यामुळे आंतरराष्ट्रीय राजकारणात भारताची भूमिका आता अधिक प्रभावी होताना दिसत आहे.