नवी दिल्ली | प्रतिनिधी –
भारतीय रेल्वेने चारधाम यात्रा आता अधिक सोपी आणि आरामदायक करण्याचा निर्णय घेतला आहे.
दिल्लीच्या सफदरजंग रेल्वे स्टेशनवरून २७ मेपासून ‘भारत गौरव डीलक्स टुरिस्ट ट्रेन’ सुरु होणार आहे.
Related News
“ही कारवाई थांबू नये…” – ऑपरेशन सिंदूरवर शहीद लेफ्टनंट विनय नरवाल यांच्या पत्नी हिमांशी यांची भावुक प्रतिक्रिया
ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताची निर्णायक कारवाई;
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारताच्या लष्करी प्रतिउत्तराचे नेतृत्व महिलांच्या हाती…
‘ऑपरेशन सिंदूर’मागे एक सळसळती नायिका – कर्नल सोफिया कुरेशी!
पंतप्रधान मोदींकडून ‘ऑपरेशन सिंदूर’च्या यशस्वीतेसाठी तीनही सैन्यदलांचे कौतुक
‘ऑपरेशन सिंदूर’: पल्लनगाम हल्ल्याचा सूड, मोदींच्या प्रतिशोधाने दहशतवादाला हादरा
ऑपरेशन सिंदूरनंतर आणखी कारवाईची शक्यता?
“मीही मेलो असतो तर…”; मसूद अजहरची कुटुंबहानीनंतर पहिली प्रतिक्रिया
ऑपरेशन सिंदूरनंतर भारताची स्पष्ट भूमिका; “मुंबई २६/११ नंतरचा सर्वात मोठा हल्ला”
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पाकिस्तानींचा गुगलवर सर्च: “ये सिंदूर होता क्या है?”
पहलगाम हल्ल्याला सडेतोड प्रत्युत्तर; अकोल्यात विश्व हिंदू परिषदेचा जल्लोष
भारताच्या एअर स्ट्राईकनंतर चीनची टरकली; पाकिस्तानला संयम बाळगण्याचा सल्ला
ही ट्रेन १७ दिवसांत बद्रीनाथ, जगन्नाथ पुरी, रामेश्वरम आणि द्वारका या चारही धामांची यात्रेची संधी भाविकांना देणार आहे.
१७ दिवसांत ८४२५ किमीचा प्रवास
या प्रवासात भाविकांना बद्रीनाथ, जोशीमठ, मानागाव, नरसिंह मंदिर, ऋषिकेश, पुरीतील जगन्नाथ मंदिर,
कोणार्क सूर्य मंदिर, रामेश्वरममधील रामनाथस्वामी मंदिर, द्वारकाधीश मंदिर, तसेच काशी विश्वनाथ,
भीमाशंकर आणि त्र्यंबकेश्वर मंदिरांचा समावेश असलेली यात्रा घडवून आणली जाईल.
एकूण ८४२५ किलोमीटरचा प्रवास या ट्रेनने पूर्ण होणार आहे.
ट्रेनमध्ये उत्तम सोयी-सुविधा
भारत गौरव डीलक्स ट्रेनमध्ये दोन डायनिंग रेस्टॉरंट्स, मॉडर्न किचन, स्नानासाठी क्यूबिकल बाथरूम,
बायो टॉयलेट्स यासारख्या आधुनिक सुविधा उपलब्ध आहेत.
याशिवाय फुट मसाजर, सीसीटीव्ही कॅमेरे, सुरक्षा रक्षक यांचीही सोय करण्यात आली आहे.
बुकिंग प्रक्रिया कशी?
ही ट्रेन पूर्णपणे एसी असून फर्स्ट एसी, सेकंड एसी आणि थर्ड एसीमध्ये प्रवास करता येतो.
बुकिंगसाठी IRCTC च्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन टिकीट आरक्षित करता येईल.
बुकिंगसाठी “पहिले या, पहिले मिळवा” तत्वावर १५० जागा उपलब्ध आहेत.
पॅकेजमध्ये जर्नी, ३-स्टार हॉटेलमध्ये निवास, तिन्ही वेळचं जेवण, साइटसीइंग, ट्रॅव्हल इन्शुरन्स आणि टूर मॅनेजर यांचा समावेश आहे.
रेल्वे अधिकाऱ्यांचे मत
रेल्वेचे कार्यकारी संचालक (प्रचार) दिलीप कुमार यांनी सांगितले की, देशातील
महत्त्वाच्या धार्मिक आणि पर्यटन स्थळांना जोडण्यासाठी भारत गौरव ट्रेनचे संचालन करण्यात येत आहे.
यामुळे नागरिकांना एका प्रवासात अनेक तीर्थक्षेत्रे पाहण्याची सुवर्णसंधी मिळते आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/taminaduti-machhimaranwar-sri-lankan-lootarunancha-halla/