मुंबई | प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसमधून दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात.
मात्र, त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. अनेक एसटी बसमध्ये अग्निशमन यंत्र उपलब्ध नाही,
Related News
अकोला | प्रतिनिधी
राज्याचे उद्योग, आदिवासी विकास, मृद व जलसंधारण राज्यमंत्री इंद्रनील नाईक आज अकोला जिल्ह्यात राष्ट्रवादी
काँग्रेसच्या कलश यात्रे दरम्यान उपस्थित होते. त्यांनी अक...
Continue reading
नाशिक | प्रतिनिधी
नाशिक शहरातील भद्रकाली पोलीस ठाण्याच्या बाहेर मंगळवारी सायंकाळी एक धक्कादायक घटना घडली.
प्राणघातक हल्ल्याच्या गुन्ह्यात अटक केलेला आरोपी क्रिश शिंदे पोलिसांच्या...
Continue reading
बलिया | प्रतिनिधी
जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे.
या हल्ल्याला विरोध करत उत्तर प्रदेशातील बलिया जिल्ह्यातील एक शेतकरी
...
Continue reading
नवी दिल्ली | प्रतिनिधी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.
यामध्ये सर्वाधिक लक्षवेधी निर्णय ...
Continue reading
आजच्या सोशल मीडियाच्या युगात क्रिकेटपटू केवळ मैदानावरच नव्हे, तर इंस्टाग्रामसारख्या
प्लॅटफॉर्मवरही तितकेच लोकप्रिय ठरत आहेत. चाहत्यांना त्यांच्या खेळाबरोबरच लाइफस्टाइल,
फॅमिली मो...
Continue reading
मुंबई | प्रतिनिधी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कन्या दिवीजा फडणवीस हिने 10 वीच्या इंटरनॅशनल बोर्ड
परीक्षेत 92.60 टक्के गुण मिळवून यश मिळवलं आहे. ही माहिती तिची आई आणि प्रसिद...
Continue reading
पुणे | प्रतिनिधी
मराठा आरक्षणासाठी लढा देणारे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी पुन्हा एकदा सरकारविरुद्ध आंदोलनाची घोषणा केली आहे.
29 ऑगस्ट 2025 रोजी मुंबईत आमरण उपोषण करण्याचा इशारा ...
Continue reading
पुणे | प्रतिनिधी
साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षयतृतीयेच्या मंगलदिनी पुण्यातील
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात भक्तिभावाने भरलेला सोहळा पार पडला.
यानिमित्ताने बाप्पाल...
Continue reading
मेलबर्नमध्ये मार्च महिन्यात पार पडलेल्या नेहा कक्करच्या वादग्रस्त
कॉन्सर्ट प्रकरणावरून अजूनही नवा वाद निर्माण होत आहे.
सिडनी आणि मेलबर्नमध्ये सलग दोन दिवसांचे कार्यक्रम असतानाही,...
Continue reading
आज अक्षय्य तृतीया असल्यामुळे बाजारपेठेत चांगलीच खरेदीची चहलपहल दिसून येतेय.
पारंपरिकदृष्ट्या या दिवशी सोनं खरेदी करणं शुभ मानलं जातं.
गेल्या काही आठवड्यांपासून सोन्याचे दर उच्चां...
Continue reading
मुंबई: महाराष्ट्र दिनाच्या काही दिवस आधीच दादरच्या एका प्रतिष्ठित मराठी शाळेला कायमचं टाळं
लागणार असल्याची दुर्दैवी बातमी समोर आली आहे. इंडियन एज्युकेशन सो...
Continue reading
श्री परशूराम जयंती साजरी करण्यासाठी अकोला शहरात भव्य शोभायात्रा आयोजित करण्यात आली होती...
यात्रेच्या आयोजनात सामान्यतः स्थानिक शाळा, संस्था,
आणि धार्मिक संघटना सहभागी झाल्या...
Continue reading
तर काही बसमध्ये असलेली यंत्रे फक्त शोभेची वस्तू बनून राहिली आहेत.
सुरक्षा वाऱ्यावर?
एसटी बसमध्ये आग लागल्यास ती विझवण्यासाठी अग्निशमन यंत्र असणे अनिवार्य आहे.
पण प्रत्यक्षात काही बसगाड्यांमध्ये अग्निशमन यंत्र गायब आहेत, तर काही ठिकाणी ती निकामी किंवा चुकीच्या ठिकाणी ठेवलेली आहेत.
त्यामुळे आपत्कालीन परिस्थितीत प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो.
“अग्निशमन यंत्र बसमध्ये असलं तरी त्याची दुरवस्था झालेली आहे. काही ठिकाणी फक्त कागदापुरती पूर्तता केली जाते,”
— एसटी महामंडळातील एका चालकाची प्रतिक्रिया.
सरकारी नियमांची पायमल्ली
सरकारने सर्व सार्वजनिक वाहतूक वाहनांमध्ये अग्निशमन यंत्र असणे बंधनकारक केले आहे.
मात्र, एसटी महामंडळ याबाबत उपेक्षा करत असल्याचं चित्र दिसून येतं आहे.
काही बसस्थानकांवरील जुने बस पाहिल्यास कोणतीही आग प्रतिबंधक यंत्रणा नाही हे प्रकर्षाने जाणवतं.
मध्य प्रदेशच्या बसमध्ये आधुनिक यंत्रणा
दुसरीकडे, शेजारच्या मध्य प्रदेश राज्यातून येणाऱ्या बसमध्ये अत्याधुनिक अग्निशमन तंत्रज्ञान बसवलेलं पाहायला मिळतं.
अशा यंत्रणेमुळे अपघात किंवा आगीच्या प्रसंगी त्वरित प्रतिसाद देणे शक्य होते.
“आमच्या बसमध्ये सर्व सुरक्षा यंत्रणा आहेत, आणि त्या वेळोवेळी तपासल्या जातात,”
— सैय्यद इरफान, बस चालक, मध्य प्रदेश
उन्हाळ्यात अधिक धोका
सध्या उन्हाळ्याचे तीव्र दिवस सुरू आहेत. या काळात वाहनांना आग लागण्याच्या घटना वाढत आहेत.
त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी ही बाब अधिक गंभीर बनते. संबंधित विभागाने तातडीने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
एसटी महामंडळाने प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य देत सर्व बसगाड्यांमध्ये कार्यक्षम अग्निशमन यंत्र असावीत याची खात्री करावी,
अशी सर्वसामान्यांची अपेक्षा आहे. अन्यथा एक छोटीशी दुर्लक्षदेखील मोठ्या अपघाताचं कारण ठरू शकतं.
Read Also : https://ajinkyabharat.com/nashikamadhyay-accused-krishchi-thararak-escape/