पहलगाम | प्रतिनिधी
काश्मीरमधील पहलगामच्या बैसरन खोऱ्यात झालेल्या अतिरेकी हल्ल्यात २५ ते २८ पर्यटकांचा बळी गेला.
मात्र, या रक्तरंजित घटनेदरम्यान एक धाडसी प्रयत्न करणारा स्थानिक युवक आपल्या प्राणांची
Related News
अकोला शहरातील गुंटेवारी लेआउटचे काम लवकरच सुरू होणार; म.न.पा आयुक्तांचा विश्वास
बोरगाव मंजू येथे दोन गटात तुफान हाणामारी; तक्रार घेताना पोलिसांची एकतर्फी भूमिका?
बाळापूर ब्रेकिंग: मनारखेड दरोडा प्रकरणातील टोळी उखडली; उरळ पोलिसांची मोठी कारवाई
चित्र नगरी कोल्हापूरच्या राज्य सदस्य पदी निलेश जळमकर यांची नियुक्ती झाल्याबद्दल सत्कार
अकोला जिल्ह्यात पुन्हा अतिवृष्टीचा इशारा; 4 जुलैपर्यंत हवामान खात्याचा अलर्ट, प्रशासन सतर्क
हिंदी सक्तीचा निर्णय उद्धव ठाकरेंचा, आंदोलनात राज ठाकरेंची उडी – प्रतापराव जाधव यांची टीका
महामार्गावर भीषण अपघात, भला मोठा कंटेनर पलटी; अफवांमुळे लुटीचा प्रयत्न, परिसरात एकच खळबळ!
एलपीजी दरात कपात: कमर्शियल सिलेंडर ५८.५० रुपयांनी स्वस्त
भोपाल कोर्टमधून चित्रपटात शोभेल अशी घटना! शिक्षा ऐकताच आरोपी कोर्टातून पळाला
अकोल्यात सिटी कोतवाली पोलिसांची कारवाई; २४ तासांत दुचाकी चोरटे जेरबंद
मन नदीत आढळला अज्ञात व्यक्तीचा मृतदेह; बाळापूर शहरात खळबळ
मतदार यादी अचूकतेसाठी अकोट तहसील कार्यालयात बीएलओ व पर्यवेक्षकांना प्रशिक्षण
आहुती देऊन माणुसकीचा दीप तेवत ठेवून गेला — तो म्हणजे आदिल हुसैन शाह.
पर्यटकांचा खच्चरवाहक, पण धाडसाने झळकलेलं एक नाव
बैसरन परिसरात पर्यटकांना खच्चरवरून घेऊन जाण्याचं काम करणारा आदिल हुसैन शाह
याने मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यावेळी अतुलनीय धैर्य दाखवले. अतिरेक्यांनी अचानक गोळीबार सुरू केला,
तेव्हा आदिलने न थांबता त्यांच्याशी दोन हात केले. त्याने अतिरेक्याची बंदूक हिसकावण्याचा प्रयत्न केला,
पण या प्रयत्नात त्याच्यावरही गोळ्या झाडण्यात आल्या आणि त्याचा जागीच मृत्यू झाला.
घरचा आधार हरपलेलं कुटुंब
आदिलच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे. “आमचा आधार गेलाय,
त्याचं धाडस आमचं अभिमान आहे पण दुःखही अपरंपार आहे,” असं आदिलच्या कुटुंबीयांनी सांगितलं.
त्याच्या कुटुंबाची परिस्थिती बेताची असून, आदिल हा घरचा एकमेव कमावता सदस्य होता.
एक ‘अनसंग हिरो’ — शासनाकडून मदतीची अपेक्षा
स्थानिक पातळीवर आदिलच्या धैर्याचं कौतुक होत असलं, तरी आता सर्वसामान्य जनतेमध्ये एकच मागणी आहे —
“शासनाने आदिलच्या कुटुंबाला योग्य सन्मान आणि आर्थिक मदत करावी.”
देशाच्या सुरक्षेसाठी फौज फाटा असतोच, पण संकटाच्या क्षणी न थांबता लढणाऱ्या अशा सामान्य नागरिकांची नोंदही राष्ट्राने घ्यावी —
हीच या घटनेतून उमटणारी एक मोठी शिकवण आहे.
Read Also :https://ajinkyabharat.com/heartbroken-incident-is-%e0%a5%ad-varshani-jhalalam-baal/