चंद्रपूर | प्रतिनिधी
चंद्रपूर जिल्ह्यातील तापमानाने कहर केला असून, सध्या पारा ४६ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचला आहे.
त्यामुळे ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील जंगल सफारीच्या वेळेत बदल करण्यात आला आहे.
Related News
अकोला शहरातील गुंटेवारी लेआउटचे काम लवकरच सुरू होणार; म.न.पा आयुक्तांचा विश्वास
बोरगाव मंजू येथे दोन गटात तुफान हाणामारी; तक्रार घेताना पोलिसांची एकतर्फी भूमिका?
बाळापूर ब्रेकिंग: मनारखेड दरोडा प्रकरणातील टोळी उखडली; उरळ पोलिसांची मोठी कारवाई
चित्र नगरी कोल्हापूरच्या राज्य सदस्य पदी निलेश जळमकर यांची नियुक्ती झाल्याबद्दल सत्कार
अकोला जिल्ह्यात पुन्हा अतिवृष्टीचा इशारा; 4 जुलैपर्यंत हवामान खात्याचा अलर्ट, प्रशासन सतर्क
हिंदी सक्तीचा निर्णय उद्धव ठाकरेंचा, आंदोलनात राज ठाकरेंची उडी – प्रतापराव जाधव यांची टीका
महामार्गावर भीषण अपघात, भला मोठा कंटेनर पलटी; अफवांमुळे लुटीचा प्रयत्न, परिसरात एकच खळबळ!
एलपीजी दरात कपात: कमर्शियल सिलेंडर ५८.५० रुपयांनी स्वस्त
भोपाल कोर्टमधून चित्रपटात शोभेल अशी घटना! शिक्षा ऐकताच आरोपी कोर्टातून पळाला
अकोल्यात सिटी कोतवाली पोलिसांची कारवाई; २४ तासांत दुचाकी चोरटे जेरबंद
मन नदीत आढळला अज्ञात व्यक्तीचा मृतदेह; बाळापूर शहरात खळबळ
मतदार यादी अचूकतेसाठी अकोट तहसील कार्यालयात बीएलओ व पर्यवेक्षकांना प्रशिक्षण
दरवर्षी १ मेपासून करण्यात येणाऱ्या वेळेच्या बदलाची अंमलबजावणी यंदा आठवडाभर आधीच करण्यात आली आहे.
ताडोबा व्याघ्र प्रकल्पात उन्हाळ्यात वाघ व अन्य वन्यजीव नैसर्गिक किंवा कृत्रिम पाणवठ्यांवर पाणी पिण्यासाठी येतात.
त्यामुळे व्याघ्र दर्शनाची संधी वाढते. मात्र, वाढत्या उष्णतेमुळे पर्यटक त्रस्त होत असल्याने प्रशासनाने
दुपारच्या सत्रातील सफारीची वेळ २.३० ते ६.३० ऐवजी आता ३.०० ते ७.०० अशी निश्चित केली आहे.
सफारी बुकिंग रद्द, पर्यटकांचा कल थंड हवामानाकडे
गेल्या आठवड्यापासून चंद्रपुरात तापमान ४४ ते ४६ अंशांच्या दरम्यान आहे.
या तीव्र उष्णतेमुळे एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात आणि मेच्या पहिल्या आठवड्यातील अनेक सफारी बुकिंग्स रद्द करण्यात आली आहेत.
पूर्वी उन्हाळ्यातील शाळांच्या सुट्ट्यांमुळे पर्यटकांची गर्दी दिसायची, मात्र यंदा वाढलेल्या तापमानामुळे पर्यटक थंड हवामानाच्या ठिकाणी जाणं पसंत करत आहेत.
प्रशासनाकडून आरोग्यविषयक सूचना
पर्यटकांनी सफारीसाठी निघण्यापूर्वी हवामानाची माहिती घ्यावी, भरपूर पाणी प्यावं, टोपी, सनग्लासेस आणि हलके,
उन्हापासून संरक्षण करणारे कपडे वापरावेत, असे आरोग्यविषयक सल्ले प्रशासनाने दिले आहेत.
स्थानिक मार्गदर्शकांचा निर्णयाला पाठिंबा
ताडोबामधील स्थानिक मार्गदर्शक, वाहनचालक व पर्यटन व्यावसायिकांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.
“उन्हाळ्यात पर्यटन वाढतं, पण यंदाची गरमी खूपच लवकर जाणवतेय.
वेळ पुढे ढकलल्यामुळे पर्यटकांना थोडा दिलासा मिळेल,” असं एका मार्गदर्शकाने सांगितलं.
Read Also : https://ajinkyabharat.com/pahalgam-hallyanantar-santapachi-lat/