मुंबई :
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ८
महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. ग्रामविकास, महसूल, जलसंपदा, गृहनिर्माण, कामगार व मत्स्यव्यवसाय
Related News
विभागांनी काही दूरगामी परिणाम करणाऱ्या योजनांवर शिक्कामोर्तब केलं आहे.
महत्त्वाचे निर्णय हायलाईट्स :
मासेमारीला कृषीचा दर्जा
मत्स्य व्यवसायाला आता शेतीप्रमाणे मान्यता
मच्छीमार बांधवांना पायाभूत सुविधांवर सवलती
कंत्राटी विधी अधिकाऱ्यांच्या पगारात वाढ
विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी कार्यालयातील विधी अधिकाऱ्यांचं मानधन आता ₹50,000
यापूर्वी ₹35,000 मानधन मिळत होतं
कामगार संहितेचे नवे नियम तयार होणार
महाराष्ट्रातील कामगार कायद्यात सुधारणा
‘महाराष्ट्र कामगार संहिता नियम’ लवकरच
जलसंपदा, ग्रामविकास विभागाचे निर्णय
ग्रामविकास योजनांसाठी मंजुरी
पाण्याच्या नियोजनासंदर्भात नवीन आराखडे
या निर्णयांचा परिणाम काय होणार?
मच्छीमारीस कृषीचा दर्जा दिल्याने मत्स्य व्यवसायात गुंतवणुकीस चालना
ग्रामीण भागात रोजगारनिर्मितीस हातभार
कंत्राटी विधी अधिकाऱ्यांसाठी आर्थिक सक्षमता
कामगार कायदे अधिक स्पष्ट व आधुनिक तत्त्वांवर आधारित होणार
या निर्णयांमुळे राज्याच्या ग्रामीण, औद्योगिक आणि सामाजिक विकासाला नवा वेग मिळणार आहे.
मासेमारीला कृषी क्षेत्राशी जोडल्यामुळे मच्छीमार समाजासाठी अनेक नवीन संधी उपलब्ध होतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/chhawa-jomat-veteran-komat-66-dinth-600-koti-crosses/
