इंझोरी | ता. १७ एप्रिल २०२५ –
जिल्हा परिषद शिक्षण विभाग आणि ओपन लिंक्स फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या
आचार्य विनोबा भावे शिक्षक सहाय्यक कार्यक्रमात इंझोरी केंद्रातील जिल्हा परिषद प्राथमिक उर्दू शाळा,
Related News
अकोट ग्रामीण पोलीसांची जलद कारवाई – विनयभंग प्रकरणातील आरोपीविरोधात २४ तासांत दोषारोपपत्र दाखल
शिवसेना (उबाठा) मध्ये नेतृत्वबदलामुळे पक्षातील अंतर्गत कलह आणखी गडद होणार
दोन कोटी विस लाखां च्या नावाखाली रुग्णसेवकाला सायबर गुंड्याकडून गंडवण्याचा प्रयत्न
शाळांचे परिसर एका महिन्यात तंबाखूमुक्त करण्याचे आदेश
अतिक्रमण हटाव मोहीम का फक्त दुर्बळांवरच? अपंगाचे दुकान तोडले –
जुन्या वादातून दोन गटात झालेल्या शस्त्रास्त्र हाणामारी
अकोल्यात विविध मागण्यांसाठी आज धरणे आंदोलन करणाऱ्यात आले
नवी दिल्लीतील भारत मंडपममध्ये पार पडलेल्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल
अखेर कातखेड,पिंपळखुटा गावात रस्त्याच्या कामाला सुरुवात
शेलुबाजार आरोग्य केंद्रात क्षयरुग्ण तपासणी शिबिर; डिजिटल एक्स-रेद्वारे ८७ संशयितांची तपासणी
पार्डी ताड–पिंपळखुटा रस्ता सहा महिन्यांतच खड्ड्यात! मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेवर प्रश्नचिन्ह
अखेर लेखी आश्वासनाने उपोषणाची मांघार!
उंबर्डा येथील मुख्याध्यापक दानिश इकबाल अजिमोद्दीन यांचा प्रेरणादायी कार्यासाठी ‘पोस्ट ऑफ द मंथ’ या विशेष पुरस्काराने गौरव करण्यात आला.
मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे यांच्या हस्ते हा सन्मान प्रदान करण्यात आला.
याप्रसंगी प्राथमिक शिक्षणाधिकारी विठ्ठल भुसारे, उपशिक्षणाधिकारी गजानन डाबेराव यांची प्रमुख उपस्थिती होती.
शिक्षण क्षेत्रात नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी झटणाऱ्या शिक्षकांचा सन्मान करण्यासाठी
‘पोस्ट ऑफ द मंथ’ हा पुरस्कार दरमहा दिला जातो.
यंदाचा मान इंझोरी केंद्रातील दानिश इकबाल यांना मिळाल्याने त्यांच्या कार्याची पावतीच मानली जात आहे.
कार्यक्रमात FLN (Foundational Literacy & Numeracy), अध्ययन निष्पत्ती, शिष्यवृत्ती सराव परीक्षा,
आणि महावाचन या महत्त्वपूर्ण उपक्रमांत उत्कृष्ट योगदान देणाऱ्या शिक्षक, शाळा आणि केंद्रप्रमुख यांचाही गौरव करण्यात आला.
मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे यांनी आपल्या भाषणात सांगितले की,
“शिक्षकांचे समर्पित कार्य विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी प्रेरणास्थान ठरते.
ज्ञानदान हे एक पवित्र कार्य असून, ते अधिक निष्ठेने आणि समर्पणाने करणे ही काळाची गरज आहे.”
या प्रेरणादायी सोहळ्यात ओपन लिंक्स फाऊंडेशनचे प्रतिनिधी रघुनाथ वानखडे, विजय वावगे यांच्यासह
जिल्ह्यातील विविध शाळांचे केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाने संपूर्ण परिसरात शिक्षण क्षेत्रातील सकारात्मक ऊर्जा आणि नवचैतन्याचा संचार केला.
Read Also : https://ajinkyabharat.com/churchgate-sthankabaher-best-basla-fire/