श्रीकांत पाचकवडे, अकोला |
ता. १७ एप्रिल — ग्रामीण विकासाचा मेरूमणी समजल्या जाणाऱ्या अकोला
जिल्हा परिषदेचा कारभार सध्या अक्षरशः रामभरोसे झाल्याचे चित्र दिसून येत आहे.
Related News
अकोला जिल्हा नियोजन समितीची बैठक जिल्ह्यातील विकासकामांच्या आढाव्यासाठी आयोजित करण्यात आली होती.
मात्र, ही बैठक विकासाच्या चर्चा करण्याऐवजी राजकीय कलगीतुराच्या वादात रंगली. पालक...
Continue reading
पातुर तालुका प्रतिनिधी चानी पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या पिंपळ डोळी फाट्या नजीक वन
विभागाच्या विश्रामगृहासमोर अवैध गौण खनिज विना रायल्टी वाहतूक करून निदर्शनास आल्यानंतर
...
Continue reading
अकोल्यातील बार्शीटाकळी शहरात आज एक भीषण अपघात घडला आहे.
या अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला असून,
अपघातामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
घटना बार्शीटाकळीतील नवीन ...
Continue reading
पुणे |
हिंजवडीतील 'द क्राऊन ग्रीन' सोसायटीमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
25 वर्षीय आयटी अभियंता अभिलाषा कोथंबिरे हिने 21व्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्य...
Continue reading
पातूर : संत गजानन महाराजांची पालखी ७ जून रोजी पातूरला पोहचणार असून स्वागतासाठी
जय्यत तयारी करण्यात आली आहे.श्री गजानन महाराज संस्थानच्यावतीने श्रींच्या पालखीचे श्रीक्षेत्र
पं...
Continue reading
नवी दिल्ली: भारत आणि फ्रान्समध्ये राफेल विमान निर्मितीसंदर्भात ऐतिहासिक करार झाला असून,
यानुसार राफेल जेटचा संपूर्ण ढाचा आता भारतातच तयार होणार आहे.
टाटा अॅडव्...
Continue reading
जालना मधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे ती म्हणजे अशी की रुग्णांवरती
चक्क फरशीवर गादी टाकून सलाईन द्वारे उपचार करण्यात येत आहे.
जालना जिल्ह्यामधील सामान्य रुग्णालयातील एक...
Continue reading
नवी दिल्ली |
पर्यावरण दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 7, लोक कल्याण मार्ग, दिल्ली येथील
आपल्या निवासस्थानी ‘सिंदूर’ वनस्पतीचे (Bixa orellana) रोपण केले.
हे रोप त्यांना ...
Continue reading
शेगावच्या संत श्रेष्ठ श्री गजानन महाराज यांची पालखीने छोट्या छोट्या व्यावसायिकांना
व्यापाराचा आधार दिल्याचं पाहायला मिळालंय. पंढरपूरकडे निघालेल्या पालखी
सोबत हे किरकोळ विक्रे...
Continue reading
अकोला जिल्ह्यातील अकोट शहरात स्थानिक देवपूरा सोमवार वेस येथे शॉट सर्किट झाल्याने
घराला लागली आग घराने प्रचंड नुकसान झाले आहे.
या दरम्यान आगीच्या धुराने सर्व परिसरात एकच खळबळ ...
Continue reading
देशभरात पुन्हा एकदा कोविड-19 विषाणूने चिंतेचे सावट निर्माण केले आहे.
सध्या अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 4,866 वर पोहोचली असून, गेल्या २४ तासांत 564 नवीन रुग्णांची...
Continue reading
पातूर :
तालुक्यातील सुकळी येथे कार्यरत असलेल्या महिला तलाठ्याकडून पीक नुकसानीचे पंचनामे करण्यास नकार
दिल्याने तलाठी व शेतकऱ्यांमध्ये चांगलाच गोंधळ झाल्याची घटना ३ जून रोजी घड...
Continue reading
सोमवारी (ता. ७) जिल्हा परिषदेच्या विविध विभागांना दिलेल्या अचानक भेटीत अनेक अधिकारी व कर्मचारी
कार्यालयीन वेळेत त्यांच्या कक्षात अनुपस्थित असल्याचे उघड झाले.
यामुळे आपल्या कामांसाठी जिल्हा परिषदेच्या दारात ताटकळत बसणाऱ्या ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
शिक्षण, आरोग्य, समाजकल्याण, बांधकाम, लघुसिंचन, कृषी,
पाणीपुरवठा व पशुसंवर्धन आदी विभागांतील काही कर्मचारी नेहमीच गैरहजर असल्याच्या तक्रारी आहेत.
सीईओंची बदली, शिस्त गडगडली
गेल्या काही महिन्यांत तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी बी.
वैष्णवी यांनी वेळकाढूपणा करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर वचक ठेवत प्रशासन रुळावर
आणण्याचा प्रयत्न केला होता. अचानक भेटी, दंडात्मक कारवाई आणि स्पष्ट धोरणामुळे कर्मचारी
वेळेवर कार्यालयात हजर राहू लागले होते. मात्र, नुकतीच
त्यांची नागपूर महापालिकेत अप्पर आयुक्त पदावर बदली
झाल्यानंतर काही कर्मचाऱ्यांनी पुन्हा दांडगी शिस्त दाखवायला सुरुवात केली आहे.
टपऱ्यांवर अधिकाऱ्यांची गर्दी
अनेक कर्मचारी बायोमॅट्रिक हजेरी लावून कार्यालयात बसण्याऐवजी जिल्हा परिषद परिसरात फिरताना,
तर काहीजण चहाच्या टपऱ्या व पानपट्टीवर आढळून येतात.
त्यामुळे कामासाठी आलेल्या ग्रामस्थांना त्यांच्या शोधात भटकावे लागते.
कक्षात कर्मचारी नसल्यास “साहेब आत्ताच गेलेत”,
“जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयात गेलेत” अशा स्वरूपाची थातूरमातूर उत्तरे देऊन दिशाभूल केली जाते.
विजेचा अपव्ययही सुरूच
अधिकारी व कर्मचारी अनुपस्थित असतानाही त्यांच्या कक्षांतील लाईट व पंखे सुरू ठेवले जात
असल्यामुळे मोठ्या प्रमाणात विजेचा अपव्यय होत आहे. ही बाब देखील वरिष्ठ प्रशासनासाठी गंभीर चिंतेचा विषय आहे.
जनतेचा सवाल : जबाबदार कोण?
कार्यालयात वेळेवर उपस्थित राहणे ही किमान जबाबदारी असतानाही अनेक कर्मचारी
ती पार पाडताना अपयशी ठरत आहेत. परिणामी ग्रामीण भागातील लाभार्थ्यांचे प्रश्न अनुत्तरीत राहतात.
याबाबत संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने दखल घेऊन शिस्तीचे धोरण पुन्हा लागू करावे,
अशी मागणी आता जनतेकडून होऊ लागली आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/sudaiwane-jeevhani-tali/