मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अमरावती विमानतळ आणि सेवा लोकार्पण; 18 एप्रिलपासून नियमित सेवा सुरू
अमरावती (18 एप्रिल 2025):
विदर्भातील नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी आहे.
Related News
अखेर कातखेड,पिंपळखुटा गावात रस्त्याच्या कामाला सुरुवात
शेलुबाजार आरोग्य केंद्रात क्षयरुग्ण तपासणी शिबिर; डिजिटल एक्स-रेद्वारे ८७ संशयितांची तपासणी
पार्डी ताड–पिंपळखुटा रस्ता सहा महिन्यांतच खड्ड्यात! मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेवर प्रश्नचिन्ह
अखेर लेखी आश्वासनाने उपोषणाची मांघार!
दहीहंडा रोडवर मोठमोठे खड्डे; नागरिकांच्या सहकार्यातून काही खड्ड्यांची भर घाल
अकोल्यात पुन्हा रिमझिम पाऊस; ९० टक्के पेरणी पूर्ण, शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित
अकोट बस स्टॅन्ड परिसरात घडलेले चोरीचे ०४ गुन्हे महिला आरोपी कडुन उघडकीस
अकोल्यात २८०० जन्म प्रमाणपत्रे रद्द; “बांगलादेशी” ठरवलेल्यांवर वाद, अबू आझमी यांची सरकारकडे चौकशीची मागणी
भारताचा लॉर्ड्सवर दारूण पराभव; जयस्वाल-नायरच्या फ्लॉप कामगिरीवर चाहत्यांचा संताप
काटेपूर्णा धरणाची जलपातळी दीड फूट वाढली;
घोडेगाव येथे तेरवीच्या दिवशी संपूर्ण गाव स्वच्छ करून वडिलांना आगळी वेगळी श्रदांजली
दानापूर येथे लईत यात्रा महोत्सव साजरा.
मुंबई-अमरावती-मुंबई विमानसेवा अखेर सुरू झाली असून,
आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या सेवेचे उद्घाटन करण्यात आले.
यामुळे विदर्भातून मुंबईकडे किंवा मुंबईहून विदर्भात येणाऱ्या प्रवाशांना एक
सुलभ, जलद आणि आरामदायी प्रवासाचा पर्याय उपलब्ध झाला आहे.
आज झालेल्या उद्घाटन सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे,
अजित पवार, केंद्रीय मंत्री किंजरापू राममोहन नायडू, मुरलीधर मोहोळ,
पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री गिरीश महाजन आणि खासदार नवनीत राणा आदी मान्यवर उपस्थित होते.
विमानसेवेचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे:
-
सेवा चालू दिवस: सोमवार, बुधवार, शुक्रवार (आठवड्यातून तीन दिवस)
-
मुंबई ते अमरावती: दुपारी 2:30 वाजता प्रस्थान, 4:15 वाजता आगमन
-
अमरावती ते मुंबई: संध्याकाळी 4:40 वाजता प्रस्थान, 6:25 वाजता आगमन
-
सेवा संचालक: अलायन्स एअर
-
नाईट लँडिंगला परवानगी नाही – त्यामुळे केवळ दिवसा सेवा उपलब्ध
अमरावती विमानतळावर लँडिंग करणारे पहिले व्यावसायिक विमान:
आज उद्घाटनप्रसंगी “72 आसनी” अलायन्स एअरचे विमान अमरावती विमानतळावर यशस्वीरीत्या उतरले.
यासोबतच दक्षिण आशियातील सर्वात मोठे पायलट प्रशिक्षण केंद्रही इथे सुरू होणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
भविष्यातील योजना:
खासदार रवी राणा यांनी सांगितले की, “लवकरच अमरावतीहून दिल्ली
आणि पुण्यासाठीही विमानसेवा सुरू केली जाईल”, असे नियोजन सुरू आहे.
या सेवेमुळे अमरावती जिल्हा आणि संपूर्ण विदर्भासाठी नव्या विकासद्वारांचे दरवाजे उघडणार असून,
पर्यटन, व्यापार आणि शिक्षण क्षेत्राला मोठा लाभ होणार आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/akola-shaharat-comes-5-divasad-panipurwatha/