महानगरपालिकेचे नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन
अकोला (15 एप्रिल 2025) –
अकोला शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या काटेपूर्णा जलप्रकल्पातील साठा दिवसेंदिवस कमी होत चालला आहे.
त्यामुळे महानगरपालिकेने आजपासून (१५ एप्रिल) शहरात दर पाचव्या दिवशी पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे.
Related News
कुरणखेड जवळ अपघात एक युवक जागेवर ठार.
श्रीच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान – सलग 56वे वर्ष, 700 हून अधिक वारकरी सहभागी
बाळापूरमधील तीन रहिवाशांचा मृत्यू.
ज्वारी काढणीच्या कामात नागाचा साक्षात्कार
कुणाल किशोर कमलाकर प्रकरणात काका वर खुनाचा गुन्हा दाखल.
बोरगाव मंजू येथे गोवंशाला जीवनदान.
उन्हाळी क्रिकेट शिबिराचा समारोप.
अकोट शहरात एकास ट्रकने चिरडले, घटनास्थळावरच दुर्दैवी मृत्यू
बांगलादेश यांची भारतातून रवानगी…
डीडीए रिक्वायरमेंट 2005 दिल्ली विकास प्राधिकरण मध्ये सरकारी नोकरी…
अकोल्यात ऑफ्रोह संघटनेचे धरणे आंदोलन;
बोर्डी येथील घोगा नाल्यावरील संरक्षण भिंतीचे काम अर्धवट
याआधी दर तिसऱ्या दिवशी पाणीपुरवठा केला जात होता.
सध्या प्रकल्पात २२.८३ दलघमी जलसाठा उपलब्ध असून, ही आकडेवारी गेल्या
वर्षीपेक्षा थोडी जास्त (०.५४%) असली तरी, उन्हाळ्याचे वाढते तापमान
लक्षात घेता आगामी काळात जलसाठा लवकरच आटण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
गतवर्षी १५ एप्रिल रोजी २६.४५% जलसाठा होता, तर यंदा तो २६.९९% आहे.
मात्र पाण्याची मागणी वाढत असल्याने नगरपालिकेने नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन केले आहे.
महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, “पाणी पुरवठ्याचे वेळापत्रक लवकरच प्रसिद्ध केले जाणार आहे.
सार्वजनिक ठिकाणी पाण्याचा अपव्यय टाळण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.”
नागरिकांनी पुढील सूचना आणि वेळापत्रकासाठी महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर लक्ष ठेवावे,
तसेच पाण्याचा काटकसरीने वापर करून पाणीटंचाईच्या संकटाला सामोरे जाण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/nashikamadhyay-satpir-darga-hatavinyavarun-violence/