मूर्तिजापूर: मूर्तिजापूर येथील दर्यापूर मार्गावरील उड्डाण पुलाखाली गुरुवारी (दि. ३ एप्रिल)
दुपारी एका ३० वर्षीय युवकाने धावत्या रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली.
अक्षय सुनीलराव देशमुख (वय ३०, रा. जामठी बु.) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे.
Related News
कुणाल किशोर कमलाकर प्रकरणात काका वर खुनाचा गुन्हा दाखल.
बोरगाव मंजू येथे गोवंशाला जीवनदान.
उन्हाळी क्रिकेट शिबिराचा समारोप.
अकोट शहरात एकास ट्रकने चिरडले, घटनास्थळावरच दुर्दैवी मृत्यू
बांगलादेश यांची भारतातून रवानगी…
डीडीए रिक्वायरमेंट 2005 दिल्ली विकास प्राधिकरण मध्ये सरकारी नोकरी…
अकोल्यात ऑफ्रोह संघटनेचे धरणे आंदोलन;
बोर्डी येथील घोगा नाल्यावरील संरक्षण भिंतीचे काम अर्धवट
अकोट शहरात अकोला नाक्यावरील रेल्वे ब्रिजवर पथदिवे लागणार
अकोला जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक संदर्भात पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न
पावसाचा तब्ब्बल ३ हजार ७६ हेक्टरवरील पिकांना फटका बसला असून, २२ घराचे अंशतः नुकसान
अकोला शहरातील नऊ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश नुकतेच जारी करण्यात आले
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई-नागपूर रेल्वे मार्गावर रेल्वे पोल क्रमांक ६२१/९ ते ६२२
दरम्यान गाडी क्रमांक १२८३३ डाऊन अहमदाबाद सुपरफास्ट एक्सप्रेस समोर उडी घेऊन त्याने आपले जीवन संपवले.
अक्षय नुकताच रेल्वे ए.सी. कोच अटेंडंट म्हणून नागपूर येथे कंत्राटी पद्धतीने नोकरीस लागला होता.
गुरुवारी दुपारी २ वाजता त्याचे वडील सुनील देशमुख यांनी त्याला रेल्वे स्थानकावर सोडले होते.
मात्र काही वेळातच अपघाताची माहिती मिळाल्याने कुटुंबीयांवर शोककळा पसरली.
अक्षयचे काही वर्षांपूर्वीच लग्न झाले होते आणि त्याला अवघ्या एक महिन्याचा मुलगा आहे.
आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट नसले तरी, कुटुंबाच्या वडिलोपार्जित जमिनीचा वाद न्यायप्रविष्ट होता.
तसेच, काही दिवसांपूर्वी शासनाने त्यांच्या दाताळा येथील शेतातील पिकांवर आणि राहत्या
घरावर बुलडोझर चालवला होता. या तणावातूनच अक्षयने टोकाचे पाऊल उचलल्याचा
प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.