चोहोटा बाजार परिसरातील पाणीटंचाईवर तातडीने उपाययोजना – आमदार सावरकर
अकोट तालुक्यातील चोहोटा बाजार परिसर आणि आसपासच्या गावांमध्ये पाणीटंचाई गंभीर बनली असून,
नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. करोडी गावातील उपसरपंच
मंगेश घुले यांनी या समस्येची वारंवार तक्रार केली होती,
Related News
धामणा बुद्रुक येथे कॉलऱ्याचा शिरकाव; एकाचा मृत्यू, ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण
अकोल्यातील शेतकऱ्याचा मुलगा बनला ‘क्रिकेट पंच’
धोंडा आखर येथे ‘प्रधानमंत्री धरती आबा’ अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद
परशुराम नाईक विद्यालयाचे तंबाखू मुक्त अभियान कौतुकास्पद – न्यायाधीश आर. एन. बंसल यांची प्रशंसा
बोर्डी ग्रामपंचायतीचा भोंगळ कारभार : सांडपाण्यामुळे नागरिक त्रस्त
इंझोरी महसूल मंडळात २०० एकरांवर दुबार पेरणीचे संकट
“आपके नाम से हर शख्स…” शिंदेंचा शेर आणि ‘जय गुजरात’ घोषणेने चर्चांना उधाण!
सेंट पॉल्स अकॅडमी ,अकोट येथे शाळेचा स्थापना दिवस उत्साहात साजरा
गजानन नागरी पतसंस्थेत मोठा आर्थिक गैरव्यवहार? ठेवीदारांची गर्दी, उपनिबंधकांकडे तक्रार
शाळेचा पहिला ‘आनंददायी’ दिवस !
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात :
नागपूरमध्ये वैद्यकक्षेत्राची क्रांती : कॅन्सरमुळे लिंग गमावलेल्या रुग्णावर यशस्वी शस्त्रक्रिया
मात्र अद्याप समाधानकारक तोडगा निघालेला नाही.
ग्रामस्थ आणि सरपंचांच्या तक्रारीची दखल घेत आमदार रणधीर सावरकर यांनी बुधवारी
जीवन प्राधिकरण विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली.
या बैठकीत त्यांनी अधिकाऱ्यांना तातडीने पाणीपुरवठ्याच्या समस्येचे निराकरण करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या.
अकोट वरून होणारा पाणीपुरवठा कमी दाबाने होत असल्याने
अनेक गावांमध्ये आवश्यक प्रमाणात पाणी पोहोचत नाही.
चोहोटा बाजार परिसरातील नागरिक संपूर्णतः
जीवन प्राधिकरणच्या पाणीपुरवठ्यावर अवलंबून आहेत.
त्यामुळे हा प्रश्न तातडीने सोडवण्याची मागणी नागरिकांनी केली असून,
आमदार सावरकर यांनीही जलसंपत्ती विभागाला तातडीने कार्यवाही करण्यास सांगितले आहे.