चोहोटा बाजार परिसरातील पाणीटंचाईवर तातडीने उपाययोजना – आमदार सावरकर
अकोट तालुक्यातील चोहोटा बाजार परिसर आणि आसपासच्या गावांमध्ये पाणीटंचाई गंभीर बनली असून,
नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. करोडी गावातील उपसरपंच
मंगेश घुले यांनी या समस्येची वारंवार तक्रार केली होती,
Related News
तेल्हारा येथे शिवसेनेची आढावा बैठक संपन्न; स्थानिक स्वराज्य निवडणुकांची जोरदार तयारी सुरू
आठवड्यातून तीन दिवस अमरावती-मुंबई विमानसेवा सुरु
नगर परिषद शिक्षक सहकारी पत संस्था अकोटच्या अध्यक्षपदी तसलीम ताहेर पटेल यांची अविरोध निवड
शतकानुशिक परंपरेची साक्ष — आसरा माता यात्रा भक्तिभावात पार
ज्ञानेश्वर वरघट पेडगाव वार्ताहर कळंबा बोडखे येथील जनतेचा पाण्यासाठी आक्रोश
अकोला रेल्वे स्टेशन परिसरात अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपी जेरबंद
शेतकरी आत्महत्या ग्रस्त निराधार बालकांना शिक्षणासाठी मदतीचा हात; माजी खासदार राजू शेट्टी यांच्या हस्ते आर्थिक मदत वाटप
शेकडो तरुणांचा शिवसेनेत प्रवेश; अकोट तालुका आढावा बैठक उत्साहात पार
सुरत कलकत्ता हायवे क्रमांक त्रेपन्न वर भीषण अपघात; कार चालक गंभीर जखमी
गौण खनिज प्रकरणात पेंडींग असलेल्या दंडाची वसुली रखडली; तहसीलदारांवर टिका
परप्रांतीय कंपन्यांची मुजोरी मोडत स्थानिकांना मिळवून दिला रोजगार….
अकोटात सद्भावना आरोग्य तपासणी व उपचार शिबिराचे आयोजन
मात्र अद्याप समाधानकारक तोडगा निघालेला नाही.
ग्रामस्थ आणि सरपंचांच्या तक्रारीची दखल घेत आमदार रणधीर सावरकर यांनी बुधवारी
जीवन प्राधिकरण विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली.
या बैठकीत त्यांनी अधिकाऱ्यांना तातडीने पाणीपुरवठ्याच्या समस्येचे निराकरण करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या.
अकोट वरून होणारा पाणीपुरवठा कमी दाबाने होत असल्याने
अनेक गावांमध्ये आवश्यक प्रमाणात पाणी पोहोचत नाही.
चोहोटा बाजार परिसरातील नागरिक संपूर्णतः
जीवन प्राधिकरणच्या पाणीपुरवठ्यावर अवलंबून आहेत.
त्यामुळे हा प्रश्न तातडीने सोडवण्याची मागणी नागरिकांनी केली असून,
आमदार सावरकर यांनीही जलसंपत्ती विभागाला तातडीने कार्यवाही करण्यास सांगितले आहे.