अकोला जिल्ह्यातील कारंजा (रमजानपूर) आणि नया अंदुरा येथील
शेतकऱ्यांसाठी नवीन संकट उभे राहिले आहे.
लघु पाटबंधारे विभागामार्फत कारंजा (रम) धरण (बॅरेज) बांधण्यात आले, परंतु या प्रकल्पामुळे
Related News
अकोला जिल्हा ॲडॉक स्केटिंग कमेटी चा सलग ९ तास स्केटिंग उपक्रम यशस्वी
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 वर संध्याकाळी साडेचार च्या सुमारास भीषण अपघात
पिंजर पोलिसांनी दोन दिवसातच इलेक्ट्रिक तार चोरांना केली मुद्देमालासह अटक
अकोल्यात एका एका सेवानिवृत्त 60 वर्षीय अभियातांची हत्या…
कुरणखेड जवळ अपघात एक युवक जागेवर ठार.
श्रीच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान – सलग 56वे वर्ष, 700 हून अधिक वारकरी सहभागी
बाळापूरमधील तीन रहिवाशांचा मृत्यू.
ज्वारी काढणीच्या कामात नागाचा साक्षात्कार
कुणाल किशोर कमलाकर प्रकरणात काका वर खुनाचा गुन्हा दाखल.
बोरगाव मंजू येथे गोवंशाला जीवनदान.
उन्हाळी क्रिकेट शिबिराचा समारोप.
अकोट शहरात एकास ट्रकने चिरडले, घटनास्थळावरच दुर्दैवी मृत्यू
शेतकऱ्यांचे शेतरस्ते पूर्णतः पाण्याखाली गेले आहेत.
त्यामुळे शेतीची मशागत आणि पेरणी करणे कठीण झाले आहे.
नवीन रस्त्यांसाठी शेतकऱ्यांचे आमरण उपोषण
या गंभीर परिस्थितीमुळे कारंजा-रमजानपूर आणि नया अंदुरा येथील सुमारे २० शेतकऱ्यांनी धरणाच्या
भिंतीजवळ बेमुदत आमरण उपोषण सुरू केले आहे.
शेतात जाण्यासाठी पर्यायी रस्त्यांची त्वरित सोय व्हावी, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.
शेतकऱ्यांनी यापूर्वी अनेक वेळा अकोला जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी,
तहसीलदार बाळापूर, लघु पाटबंधारे विभाग तसेच स्थानिक आमदार आणि खासदार
यांच्याकडे निवेदने सादर केली होती. मात्र, प्रशासनाने अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही केली नाही.
त्यामुळे अखेर शेतकऱ्यांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे.
शासनाच्या उदासीनतेमुळे शेतकऱ्यांमध्ये संताप
या प्रश्नावर प्रशासनाने त्वरित उपाययोजना न केल्यास आंदोलन अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.
शेतकऱ्यांच्या मागण्यांची दखल घेऊन नवीन रस्त्यांची सोय केली नाही,
तर त्याचा मोठा परिणाम शेतीवर आणि स्थानिक अर्थव्यवस्थेवर होणार आहे.
शासन आणि संबंधित विभागाने या आंदोलनाची दखल घेऊन त्वरित शेतकऱ्यांच्या
समस्या सोडवण्याच्या दृष्टीने ठोस पावले उचलण्याची गरज आहे.
शेतकऱ्यांनी आपल्या न्याय्य हक्कांसाठी सुरू केलेले हे आंदोलन
त्यांच्या जीवनावश्यक गरजा भागवण्याचे एक महत्त्वाचे पाऊल आहे.