पाणी फाउंडेशन स्पर्धेत पिलकवाडी येथील समता महिला शेतकरी गटाला दुसरा क्रमांक

पाणी फाउंडेशन स्पर्धेत पिलकवाडी येथील समता महिला शेतकरी गटाला दुसरा क्रमांक

महिलांची एकजूट आणि प्रयत्नांचा विजय

समता शेतकरी गटाच्या महिलांनी आपल्या मेहनतीच्या जोरावर तालुक्यातील

दुसरा क्रमांक मिळवत गावाचे नाव उज्ज्वल केले.

त्यांच्या या यशामागे जिल्हा परिषद शाळेतील आदर्श शिक्षक

Related News

श्री. संजय राणे सर आणि श्री. प्रमोद नाळे सर यांचे मार्गदर्शन

तसेच ग्रामपंचायतीचा सक्रिय पाठिंबा होता.

अकोट, अकोला: अकोट तालुक्यातील पिलकवाडी या लहानशा गावातील ‘समता

महिला शेतकरी गटाने’ पाणी फाउंडेशनच्या स्पर्धेत दुसरा क्रमांक पटकावला आहे.

या गटातील 12 महिलांनी एकत्र येऊन आपल्या गावाच्या

आणि समाजाच्या विकासासाठी महत्वपूर्ण कार्य केले.

मुख्य ठळक मुद्दे:

गावाच्या विकासासाठी 12 महिलांनी स्थापन केला समता महिला शेतकरी गट
पाणी फाउंडेशनच्या स्पर्धेत पहिल्याच वर्षी तालुक्यात दुसरा क्रमांक
ग्रामपंचायत व शिक्षकांचे उत्तम मार्गदर्शन, गावकऱ्यांचे सहकार्य
30 मे रोजी शिबिर समारोप कार्यक्रमात ‘मारोती व ब्रह्मचारी महाराज संस्थान पानेट’ तर्फे सन्मानचिन्ह देऊन गौरव

  महिलांच्या यशाचा गौरव!

या कर्तबगार महिलांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल गावकऱ्यांमध्ये आनंद आणि अभिमानाची भावना आहे.

गावाच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांच्या प्रयत्नांचे कौतुक होत आहे.

Related News