राज्य मराठी पत्रकार परिषद, महाराष्ट्र प्रदेश संघटनेतर्फे अकोट SDPO यांना निवेदन
विशाल आग्रे, विशेष प्रतिनिधी – अकोट
अकोट : दैनिक अजिंक्य भारत या वृत्तपत्राचे पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर 19 मार्च रोजी रात्री 11:00 वाजता
प्राणघातक हल्ला करण्यात आला. पत्रकारांवरील अशा प्रकारच्या हल्ल्यांमुळे
Related News
अकोट ग्रामीण पोलीसांची जलद कारवाई – विनयभंग प्रकरणातील आरोपीविरोधात २४ तासांत दोषारोपपत्र दाखल
शिवसेना (उबाठा) मध्ये नेतृत्वबदलामुळे पक्षातील अंतर्गत कलह आणखी गडद होणार
दोन कोटी विस लाखां च्या नावाखाली रुग्णसेवकाला सायबर गुंड्याकडून गंडवण्याचा प्रयत्न
शाळांचे परिसर एका महिन्यात तंबाखूमुक्त करण्याचे आदेश
अतिक्रमण हटाव मोहीम का फक्त दुर्बळांवरच? अपंगाचे दुकान तोडले –
जुन्या वादातून दोन गटात झालेल्या शस्त्रास्त्र हाणामारी
अकोल्यात विविध मागण्यांसाठी आज धरणे आंदोलन करणाऱ्यात आले
नवी दिल्लीतील भारत मंडपममध्ये पार पडलेल्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल
अखेर कातखेड,पिंपळखुटा गावात रस्त्याच्या कामाला सुरुवात
शेलुबाजार आरोग्य केंद्रात क्षयरुग्ण तपासणी शिबिर; डिजिटल एक्स-रेद्वारे ८७ संशयितांची तपासणी
पार्डी ताड–पिंपळखुटा रस्ता सहा महिन्यांतच खड्ड्यात! मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेवर प्रश्नचिन्ह
अखेर लेखी आश्वासनाने उपोषणाची मांघार!
लोकशाहीचा चौथा स्तंभ धोक्यात येत आहे, असे मत पत्रकार संघटनेने व्यक्त केले आहे.
🔹 हल्ल्याचा घटनाक्रम
विठ्ठल महल्ले यांनी अवैध धंद्यांविरोधात एक वृत्त प्रकाशित केले होते.
संबंधित गावगुंडांनी पूर्वनियोजित कट रचून त्यांच्यावर हल्ला केला.
या हल्ल्यात महल्ले गंभीर जखमी झाले असून, त्यांचा परिवार दहशतीत आहे.
🔹 पत्रकार संघटनेची मागणी
पत्रकार संरक्षण कायदा अंतर्गत हल्लेखोरांवर कठोर कारवाई करण्यात यावी.
पत्रकारांचा सुरक्षिततेचा प्रश्न शासनाने गांभीर्याने घ्यावा.
अशा घटना रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने ठोस उपाययोजना कराव्यात.
राज्य मराठी पत्रकार परिषद, महाराष्ट्र प्रदेश संघटनेच्या वतीने
मा. उपविभागीय पोलीस अधिकारी अनमोल मित्तल यांना निवेदन सादर करण्यात आले.
🔹 निवेदन देताना उपस्थित पत्रकार
विशाल अग्रे, गणेश वाकोडे, सरफराज अली, सारंग कराडे, स्वप्निल सरकटे, निलेश वानखडे, गोपाल शिरसाट,
लक्ष्मी गावंडे, महादेव वाघ, सय्यद शकील यांच्यासह अनेक पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पत्रकारांच्या सुरक्षिततेसाठी आणि हल्लेखोरांना तातडीने अटक करण्यासाठी
प्रशासन योग्य ती पावले उचलते का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.