राज्य मराठी पत्रकार परिषद, महाराष्ट्र प्रदेश संघटनेतर्फे अकोट SDPO यांना निवेदन
विशाल आग्रे, विशेष प्रतिनिधी – अकोट
अकोट : दैनिक अजिंक्य भारत या वृत्तपत्राचे पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर 19 मार्च रोजी रात्री 11:00 वाजता
प्राणघातक हल्ला करण्यात आला. पत्रकारांवरील अशा प्रकारच्या हल्ल्यांमुळे
Related News
उभ्या असलेल्या ट्रक ट्रॉली आग लागल्या प्रकरणी पातुर पोलिसात तक्रार
अवैध डिझेल वाहतूक करणाऱ्या व्हॅन व दुचाकीचा अपघात
अकोट नगर परिषद कृती आराखड्यात जिल्ह्यातून प्रथम
ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा जोमात!
दिल्लीत परतली उकाड्याची लाट; पारा ४० पार, उष्णतेच्या लाटेचा इशारा
पावसाने उघडीप दिल्याने शेतकऱ्यांना दिलासा
दुचाकी अपघातात पत्नीचा दुर्दैवी मृत्यू; दानापूर परिसरात शोककळा
अकोट-अंजनगाव रस्त्यावर भीषण अपघात; ट्रकने ट्रॅक्टर व विटांचा ढिगार उडवला, सुदैवाने जीवितहानी नाही
आदिवासी हक्कांसाठी अनुसूचित जमाती आयोग महत्त्वाचे पाऊल
अकोल्यात रस्ते सुरक्षेसाठी आरटीओचा नवा फंडा; रोड सेफ्टी व्हॅनच्या माध्यमातून जनजागृती आणि त्वरित कारवाई
अपघाताच्या ठिकाणी वेळेवर धावले आरटीओचे फिरते पथक; तीन जणांना वाचवले, बालक सुखरूप
बकरी ईद पार्श्वभूमीवर अकोला पोलिसांचे पथसंचलन; शांतता व सुव्यवस्थेसाठी पोलिसांचा सज्ज बंदोबस्त
लोकशाहीचा चौथा स्तंभ धोक्यात येत आहे, असे मत पत्रकार संघटनेने व्यक्त केले आहे.
🔹 हल्ल्याचा घटनाक्रम
विठ्ठल महल्ले यांनी अवैध धंद्यांविरोधात एक वृत्त प्रकाशित केले होते.
संबंधित गावगुंडांनी पूर्वनियोजित कट रचून त्यांच्यावर हल्ला केला.
या हल्ल्यात महल्ले गंभीर जखमी झाले असून, त्यांचा परिवार दहशतीत आहे.
🔹 पत्रकार संघटनेची मागणी
पत्रकार संरक्षण कायदा अंतर्गत हल्लेखोरांवर कठोर कारवाई करण्यात यावी.
पत्रकारांचा सुरक्षिततेचा प्रश्न शासनाने गांभीर्याने घ्यावा.
अशा घटना रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने ठोस उपाययोजना कराव्यात.
राज्य मराठी पत्रकार परिषद, महाराष्ट्र प्रदेश संघटनेच्या वतीने
मा. उपविभागीय पोलीस अधिकारी अनमोल मित्तल यांना निवेदन सादर करण्यात आले.
🔹 निवेदन देताना उपस्थित पत्रकार
विशाल अग्रे, गणेश वाकोडे, सरफराज अली, सारंग कराडे, स्वप्निल सरकटे, निलेश वानखडे, गोपाल शिरसाट,
लक्ष्मी गावंडे, महादेव वाघ, सय्यद शकील यांच्यासह अनेक पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पत्रकारांच्या सुरक्षिततेसाठी आणि हल्लेखोरांना तातडीने अटक करण्यासाठी
प्रशासन योग्य ती पावले उचलते का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.