Eknath Khadse : नातीची छेडछाड, एकनाथ खडसे म्हणाले, इथल्या आकांचं फरार आरोपींना पाठबळ, 3 आरोपी अजून फरार कसे?
Eknath Khadse, Jalgaon : केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या कन्येच्या छेडखानी प्रकरणात सात पैकी
तीन आरोपी अद्यापही फरार आहेत. या संदर्भात शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Related News
इंझोरी | ता. १७ एप्रिल २०२५ –
जिल्हा परिषद शिक्षण विभाग आणि ओपन लिंक्स फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या
आचार्य विनोबा भावे शिक्षक सहाय्यक कार्यक्रमात इंझ...
Continue reading
मुंबई | ता. १७ एप्रिल २०२५ —
चर्चगेट रेल्वे स्थानकाबाहेर उभ्या असलेल्या बेस्टच्या एका बसला आज दुपारी अचानक
भीषण आग लागल्याने एकच खळबळ उडाली. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे ...
Continue reading
अकोला. गळंकी रोड गुलजारपूर वस्तीत अमरधाम स्मशानभूमीची अवस्था अत्यंत दयनीय अवस्थेत आली
असून ही स्मशानभूमी सद्यस्थितीत शेवटच्या घटका मोजत असल्याचा दिसत आहे.
अकोला शहरातील डाबकी...
Continue reading
मुंबई | ता. १७ एप्रिल २०२५ —
भारतातील पहिल्या उच्चगती रेल्वे मार्गासाठी एक मोठी आणि महत्त्वपूर्ण घोषणा नुकतीच करण्यात आली आहे.
जपान सरकारकडून भारताला दोन शिंकान्सेन बुलेट ट्रेन स...
Continue reading
अकोला | ता. १७ एप्रिल २०२५ —
अकोल्यामध्ये केंद्र सरकारविरोधात काँग्रेसची निदर्शने !
केंद्र सरकारने नॅशनल हेरॉल्ड संबंधित मालमत्ता जप्त करून
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या खासदार स...
Continue reading
मेरठ (उत्तर प्रदेश) | ता.
१६ एप्रिल २०२५ — उत्तर प्रदेशातील मेरठ शहरातील ब्रह्मपुरी पोलीस ठाणे हद्दीतून एक
धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. अजीम नावाच्या एका तरुणाने
आपल्या भावाक...
Continue reading
राजसमंद (राजस्थान) | ता.
१६ एप्रिल — राजस्थानच्या राजसमंद जिल्ह्यातील देलवाडा परिसरात आज एक भीषण अपघात झाला.
वरात घेऊन जाणारी एक खासगी बस आणि ट्रक यांच्यात समोरासमोर धडक झाली.
...
Continue reading
अकोला | ता. १७ एप्रिल —
अकोल्यात पाणी प्रश्नाने उग्र रूप घेतलं असून शिवसेना (ठाकरे गट) आक्रमक झाली आहे.
शहरात सुरु असलेल्या पाण्याच्या टंचाईविरोधात आज महापालिकेच्या जलप्रदाय विभा...
Continue reading
कोल्हापूर | ता. १७ एप्रिल —
"नाद करा पण कोल्हापूरकरांचं कुठं!" म्हणत कोल्हापूरकर फुटबॉलप्रेमींनी आपल्या
जल्लोषाचा अनोखा अंदाज दाखवला; मात्र यावेळी हा नाद थेट आयोजकांनाच महागात पड...
Continue reading
राजकोट | ता. १७ एप्रिल —
शहरातील इंदिरा सर्कलजवळ आज सकाळी घडलेल्या एका भीषण अपघातात शहर बसने अनेक
वाहनांना जोरदार धडक दिल्याने चौघांचा जागीच मृत्यू झाला.
या दुर्दैवी घटनेने संपू...
Continue reading
श्रीकांत पाचकवडे, अकोला |
ता. १७ एप्रिल — ग्रामीण विकासाचा मेरूमणी समजल्या जाणाऱ्या अकोला
जिल्हा परिषदेचा कारभार सध्या अक्षरशः रामभरोसे झाल्याचे चित्र दिसून येत आहे.
सोमवारी (त...
Continue reading
अकोला, ता. १७ एप्रिल — अकोला जिल्ह्यातील उरळ पोलीस स्टेशनच्या जवळच काल सायंकाळी
एक ट्रक अचानक पेट घेतल्याची घटना घडली.
संबंधित ट्रक एका खाजगी पाणी बॉटल उत्पादन करणाऱ्या कंपनीचा अ...
Continue reading
छेडछाड प्रकरणात जे आरोपी फरार आहेत, त्यांना स्थानिक नेत्याचे संरक्षण आहे.
त्याच बरोबर पोलिसांशी यांचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. त्यामुळे पोलिस त्यांना जाणीवपूर्वक
अटक करण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप एकनाथ खडसे यांनी केलाय. ते एबीपी माझाशी बोलत होते.
पोलीस जाणीवपूर्वक आरोपींना पकडण्यात टाळाटाळ करत आहेत- खडसे
एकनाथ खडसे म्हणाले, छेडछाडीच्या घटनेला 10 दिवस झाले. घटना घडल्यानंतर
आत्तापर्यंत पोलिसांना फरार आरोपींचा शोध घेता आलेला नाही. चार जणांना अटक केलेली आहे.
तीन प्रमुख आरोपी आहेत, ते फरार आहेत. ते फरार झालेले नाहीत, इथले जे आका आहेत.
राजकीय व्यक्ती आहेत. त्यांच्या पंखाखाली ते लपलेले आहेत. याच्या पाठिमागे राजकीय शक्तीच आहे.
मी पूर्वी देखील म्हटलं होतं. पोलीस जाणीवपूर्वक आरोपींना पकडण्यात टाळाटाळ करत आहेत.
केंद्रीय मंत्री सत्तेत असल्या तरी राज्याचं गृह खात राज्याकडे आहे. याठिकाणी गृहखात्याने पूर्ण प्रयत्न
करुन सुद्धा आरोपी मिळत नाहीत, याचा अर्थ असा की, स्थानिक पोलीस अपयशी आहेत.
सर्व आरोपींची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. अनेक गुन्हे त्यांच्यावर दाखल आहेत.
पोलीस आणि त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. राज्यातील चित्र पाहिलं तर राजकारणाचं गुन्हेगारीकरण होतं आहे की,
काय असं वाटतंय. पोलीस यंत्रणा अपयशी ठरल्याचे दिसत आहे, अशी टीका खडसेंनी केली.
पुढे बोलताना एकनाथ खडसे म्हणाले, निवडणुकीच्या कालखंडात सरकारने अनेक आश्वासनं दिली होती.
लाडक्या बहीणांना 2100 रुपये तातडीने देणार असल्याचं सांगितलं होतं. मात्र,
आता पैसे देण्यासाठी टाळाटाळ करत आहेत. नुकताच जाहीर झालेला अर्थ संकल्प हा जनतेच्या दृष्टीने हिताचा नाही.
शेतकऱ्यांसाठी यामध्ये कोणतीही तरतूदी नाही. शेतकरी कर्ज माफी आणि लाडकी बहीण योजना या निवडणुकीत
जिंकून येण्यासाठीच्या योजना होत्या. मात्र अर्थ संकल्पात चाळीस हजार रुपयांची तूट आहे. हे जनतेसाठी योग्य नाही.
राज्यावर आठ लाख कोटींचं कर्ज आहे. अनेकांचे देणे थकलेले आहेत. पगार देण्यासाठी सुद्धा पैसे नाहीत.
Read more news here : https://ajinkyabharat.com/rangamapachanmichya-divashi-ashi-gya-case-tvchechi-kaji-tagna-kay-sangatatat/