वृत्तसंस्था, नवी दिल्ली : उत्तराखंडात जंगलांमध्ये लागलेल्या आगीच्या घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी प्रशासनाला प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्या लागतील, असे सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी स्पष्ट केले. उत्तराखंडमधील आगीच्या संदर्भात दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने ही टिप्पणी केली. उत्तराखंड सरकारने जंगलातील आग आटोक्यात आणण्यासाठी उचललेल्या उपाययोजनांची माहिती सर्वोच्च न्यायालयाला दिली.
त्यावेळी राज्यातील वन्यजीव असलेल्या क्षेत्रापैकी केवळ ०.१ टक्के क्षेत्र आगीत नष्ट झाल्याचे सांगण्यात आले. गेल्या वर्षी नोव्हेंबरपासून राज्यात ३९८ जंगलांना आग लागली आहे, अशी माहिती उत्तराखंड सरकारने खंडपीठास दिली. तसेच या आगी नियंत्रणात याव्यात, यासाठी सरकारने केलेल्या उपाययोजना आणि उचललेल्या पावलांची माहिती देण्यात आली.
यापैकी अनेक आगी या मानवनिर्मित असल्याचे सांगितले. या आगीसंदर्भात ३५० फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यात ६२ जणांचा समावेश आहे, असे सरकारी वकिलांनी सांगितले. उत्तराखंडचा ४० टक्के भाग आगीच्या भक्ष्यस्थानी पडला आहे, अशी रहिवाशांची तक्रार आहे. मात्र उत्तराखंडमधील केवळ ०.१ टक्के वन्यजीव क्षेत्राला आग लागली आहे, असे वकिलांनी सांगितले. खंडपीठाने पुढील सुनावणी १५ मे रोजी ठेवली आहे.
Related News
देशभरात वाढत्या भटक्या कुत्र्यांच्या समस्येवर अखेर Supreme Court of India ने अत्यंत कठोर भूमिका घेतली आहे. सार्वजनिक ठिकाणी, रस्त्यांवर ...
Continue reading
नवी दिल्ली : दोन आठवड्यांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने इच्छामरणाची परवानगी दिल्यानंतर हरीश राणा (३१) याचा अखेरचा प्रवास मंगळवारी पूर्ण झाला. गेल्या १३ ...
Continue reading
‘मरणाने केली सुटका…’ १३ वर्षांच्या कोम्यानंतर Harish Rana यांचे निधन; भारतातील दयामरणाचा ऐतिहासिक क्षण
भारताच्या वैद्यकीय आणि न्यायव्यवस्थेच्या इतिहासात एक अत्यंत संवेदनशील आणि मह...
Continue reading
Philippines Fire मध्ये फिलिपाईन्सच्या बोंगाओ बेटावर भीषण आग लागली. 5000हून अधिक नागरिक बेघर झाले, हजारो घरे जळून खाक झाली. बचावकार्य सुरु, थरा...
Continue reading
"भावना हाताबाहेर जाऊ शकत नाहीत": Mamata Banerjee विरुद्ध ईडी प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयाचे गंभीर मत
पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री Mamata Banerjee
Continue reading
शारीरिक संबंधाला नकार दिल्यानंतर खिडकीतून घुसून तरुणाने केला अमानुष गुन्हा; Bengaluru मधील महिला सॉफ्टवेअर इंजिनिअरची हत्या, आरोपी अटकेत
Bengaluru ...
Continue reading
Mumbaiत मध्यरात्री हादरा: चांदिवलीतील नारायण प्लाझा इमारतीला भीषण आग, दोन तरुणांचा मृत्यू
Mumbai– शहरात एकच काळी रात्र झाली. एका बाजूला राज्यातील राजकी...
Continue reading
EPFO बाबत मोठी अपडेट: सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला पगार वाढवण्याबाबत निर्देश
केंद्रीय कर्मचारी भविष्य निधी संघटनेच्या (EPFO) योजनेत वेतन मर्यादेबा...
Continue reading
राज्य निवडणूक आयोगाची महत्त्वाची तयारी; जिल्हा परिषद निवडणुका दोन टप्प्यात घेण्याचा विचार
राज्यातील जिल्हा परिषद निवडणुकीच्या संदर्भात राज्य निवडणूक आ...
Continue reading