मंत्री अब्दुल सत्तार यांनी मध्यरात्री मनोज जरांगे यांची घेतली भेट
अंतरवाली सराटीमधून मोठी बातमी समोर येत आहे. शिवसेनेचे मंत्री
अब्दुल सत्तार यांनी बुधवारी मध्यरात्री मराठा आरक्षण आंदोलक मनोज
Related News
अकोल्यात काँग्रेसला मोठा धक्का…
बी जे पी चा नवा राष्ट्रीय अध्यक्ष कोण?
“पूर्णपणे बिनबुडाचे आरोप” — राहुल गांधींच्या ‘मॅच फिक्सिंग’ दाव्यावर…
उभ्या असलेल्या ट्रक ट्रॉली आग लागल्या प्रकरणी पातुर पोलिसात तक्रार
अवैध डिझेल वाहतूक करणाऱ्या व्हॅन व दुचाकीचा अपघात
अकोट नगर परिषद कृती आराखड्यात जिल्ह्यातून प्रथम
ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा जोमात!
दिल्लीत परतली उकाड्याची लाट; पारा ४० पार, उष्णतेच्या लाटेचा इशारा
पावसाने उघडीप दिल्याने शेतकऱ्यांना दिलासा
दुचाकी अपघातात पत्नीचा दुर्दैवी मृत्यू; दानापूर परिसरात शोककळा
अकोट-अंजनगाव रस्त्यावर भीषण अपघात; ट्रकने ट्रॅक्टर व विटांचा ढिगार उडवला, सुदैवाने जीवितहानी नाही
आदिवासी हक्कांसाठी अनुसूचित जमाती आयोग महत्त्वाचे पाऊल
जरांगे पाटील यांची भेट घेतली. दोघांमध्ये तब्बल तीन तास बैठक झाली,
या बैठकीनंतर दोघांनीही पत्रकार परिषद घेतली. जुळवाजुळव करण्याचा
प्रयत्न केला, मात्र जरांगे पाटील यांच्या मनात काय आहे? ओळखता येणे
कठीण आहे, अशी प्रतिक्रिया मंत्री अब्दुल सत्तार यांनी या बैठकीनंतर दिली आहे.
राज्याचे अल्पसंख्याक पणन मंत्री अब्दुल सत्तार आणि मनोज जरांगे पाटील
यांच्यात तीन तास बैठक झाली. ही बैठक पहाटे तीन वाजता संपली. मनोज जरांगे हे
तळागाळातील शेवटच्या माणसांचे प्रतिनिधित्व करीत आहेत. तीन तासात मी
विधानसभेत आपले काही जमते का म्हणून जुळवाजुळव करण्याचा प्रयत्न केला,
मात्र त्यांच्या मनात काय चालले आहे हे मी ओळखू शकलो नाही आणि जुळवू
सुद्धा शकलो नाही. भविष्यात बघू काय होते, असं सत्तार यांनी म्हटलं आहे.
दरम्यान पुढे बोलताना ते म्हणाले की, आज मनोज जरांगे पाटील यांनी शेतकऱ्यांचे
नुकसान पाहिले आहे. मी सुद्धा शेतकऱ्यांचे नुकसान पाहिले, नुकसान झालेले आहे.
त्यामुळे आज होणाऱ्या कॅबिनेट बैठकीमध्ये मी मनोज जरांगे पाटील यांची
सरसकट नुकसान भरपाई देण्याची मागणी मुख्यमंत्री आणि कॅबिनेट बैठकीत मांडणार
असल्याचं अब्दुल सत्तार यांनी म्हटलं आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/jaideep-aptela-malvan-police-station-area/