पुणे | प्रतिनिधी
मराठा आरक्षणासाठी लढा देणारे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी पुन्हा एकदा सरकारविरुद्ध आंदोलनाची घोषणा केली आहे.
29 ऑगस्ट 2025 रोजी मुंबईत आमरण उपोषण करण्याचा इशारा त्यांनी दिला असून,
Related News
जय बजरंग व्यायाम शाळेचा ग्रामीण क्रांतीचा यशस्वी प्रवास!
नुकसान ग्रस्त ठिकाणी आमदार नितीन देशमुख यांची सदिच्छा भेट
बच्चू कडूंचे आंदोलन स्थगित; २ ऑक्टोबरपर्यंत मागण्या मान्य झाल्या नाहीत तर मंत्रालयात घुसणार
पावसाळ्यामुळे तीन महिन्यांचे रेशन मिळणार….
अहमदाबाद एअर इंडिया विमान अपघात: टेकऑफनंतर 650 फूटवरच ‘मेडे कॉल’, ATC शी संपर्क अपयशी; ब्लॅक बॉक्स हस्तगत
PM किसान योजनेची २०वी हप्ताची प्रतीक्षा संपणार! २० जूनला येऊ शकतो २००० रुपयांचा हप्ता
प्रवाशी वाहनात माल वाहतूक
मुंडगाव येथील अण्णाभाऊ साठे आठवडी बाजार मार्केट मध्ये घाणीच साम्राज्य!
अकोल्यात ‘रोड सेफ्टी व्हिजन’ मोहिमेच्या माध्यमातून वाहतूक जनजागृतीला जोर
बोर्डी,रामापूर,शिवपूर,परीसरात गारपिटमुळे हजारो क्षेत्र बाधित
आयाची तत्परता आणि देवाची कृपा,विमान अपघातातून चिमुकली बचावली
हेरिटेज हॉटेलमधील लग्नसोहळ्यात चोरी! – 2 लाख 43 हजारांचा ऐवज लंपास; चोरटा सीसीटीव्हीत कैद
“फक्त मला सोडायला या, एवढंच पुरे आहे” असं ते भावनिक आवाहन करताना म्हणाले.
“सरकारकडून फसवणूक, आता संयम नाही”
माध्यमांशी बोलताना मनोज जरांगे म्हणाले,
“सरकारने चार मागण्या मान्य केल्याचं सांगितलं होतं.
मात्र तीन महिने झाले तरी कुठलीच अंमलबजावणी नाही.
समाजाच्या मुलांचे प्रश्न पाहून आता संयम सुटत आहे.”
1 ऑगस्टला आंदोलनाच्या पुढील टप्प्याची घोषणा
“29 ऑगस्ट रोजी मुंबईत आझाद मैदान किंवा मंत्रालयासमोर आमरण उपोषण करणार आहे.
त्याआधी 1 ऑगस्टला आंदोलनाच्या पुढील दिशेची घोषणा करणार आहे,” असं त्यांनी स्पष्ट केलं.
“कामं आटपून घ्या, आता माघारी यायचं नाही,” असा संदेश त्यांनी मराठा समाजाला दिला.
मुख्यमंत्री फडणवीस आणि भुजबळांवर हल्लाबोल
जरांगेंनी यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि छगन भुजबळ यांच्यावरही जोरदार टीका केली.
“फडणवीस साहेब, सत्ता जात असते, पण खुन्नस डोक्यात गेली तर लोक बदला घेतात. गर्वात राहू नका. काँग्रेसची ५० वर्षांची सत्ता गेली, तुमचीही जाईल.”
“आता गॅझेट, केसेस आणि मराठा-कुणबी एक आहेत याचे अध्यादेश तातडीने काढा. प्रमाणपत्र वाटप सुरु करा,” अशी मागणी त्यांनी ठामपणे केली.
“शांततेत उपोषणच आता शेवटचा पर्याय”
“माझ्या समाजाला शांततेत उपोषण केल्याशिवाय न्याय मिळणार नाही. तुम्ही रुसू नका, माझ्यासोबत उभं राहा.
हे तुमच्या लेकरा-बाळांसाठी आहे,” असं आवाहन त्यांनी केलं.
सात कोटी मराठा समाज जरांगेंच्या पाठीशी असल्याचा दावा करत, त्यांनी आता
निर्णायक टप्प्याकडे पावले टाकली आहेत. येत्या काही दिवसांत आंदोलनाची दिशा आणि सरकारची प्रतिक्रिया याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/fancha-king-ganaraya-charani/