रांची: देशभरात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु असताना झारखंडची राजधानी रांचीमध्ये सक्तवसुली संचलनालयाचं (ईडी) धाडसत्र सुरु आहे. मंत्री आलमगीर आलम यांच्या स्वीय सचिवाच्या नोकऱ्याच्या घरावर छापा टाकण्यात आला. त्यात मोठ्या प्रमाणात रोकड हाती लागली आहे. प्राथमिक माहितीनुसार, ईडीच्या हाती जवळपास २५ कोटी रुपयांची रोख रक्कम लागली आहे. मनी लॉण्ड्रिंग प्रकरणात आलमगीर आलम यांचं नाव समोर आलं होतं. त्यानंतर ईडीनं तपास सुरु केला.
आलमगीर आलम यांच्या मंत्रालयात भ्रष्टाचार सुरु असल्याची माहिती ईडीला मिळाली होती. भ्रष्टाचाराचा पैसा नोकरांच्या घरी जात असल्याची टिप ईडीच्या अधिकाऱ्यांना मिळाली. त्यानंतर मंत्र्यांच्या स्वीय सहायकाच्या नोकराच्या घरी छापा टाकण्यात आला. या नोकराला दरमहा १५ हजार रुपये पगार मिळतो. पण त्याच्या घरी कुबेराचा खजिना सापडला. घरात सापडलेली रोकड मोजण्यासाठी नोटा मोजण्याच्या मशीन मागवण्यात आल्या.
गेल्या वर्षीच्या मे महिन्यात मुख्य अभियंत्याच्या घरावर १० हजारांच्या लाच प्रकरणी छापा टाकला होता. त्यावेळी त्याचा जबाब नोंदवण्यात आला. मंत्र्यांकडे लाचेचा पैसा कसा पोहोचवला जातो याची इंत्यभूत माहिती त्यानं दिली. त्यानंतर झारखंडचे ग्राम विकास मंत्री आलमगीर आलम यांचं नाव पहिल्यांदा भ्रष्टाचार प्रकरणात समोर आलं. या प्रकरणाचा तपास सुरु असताना आलमगीर यांचे स्वीय सचिव संजीव लाल यांचं नाव समोर आलं. संजीव लाल यांच्याकडे घरकाम करणाऱ्या नोकराच्या घरावर धाड टाकण्यात आली. तेव्हा तिथे कोट्यवधींची रोकड सापडली.
Related News
Maharashtra नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणूक 2025 निकाल : नेत्यांची प्रतिष्ठा, मुलगा-बायको-शिलेदारांची लढत आणि टेन्शन
Maharashtra तील नगर परिषद आण...
Continue reading
काँग्रेसमध्ये खळबळ! एकनाथ Shindeनी बडा नेता फोडला, थेट पक्ष प्रवेशाने राजकीय समीकरणे बदलणार
एकनाथ Shinde हे महाराष्ट्रातील एक प्रमुख राजकीय नेते आहेत. ...
Continue reading
ऑपरेशन सिंदूरवरून तापले महाराष्ट्राचे राजकारण, शिंदे यांनी काँग्रेसच्या विधानांचा निषेध केला
महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा तीव्र वादाला तोंड फुटले असून
Continue reading
नवी दिल्ली – महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा (एमजीएनआरईजीए) हा देशातील ग्रामीण भागातील कामगारांसाठी सर्वात महत्वाचा रोजगार हमी योजना मानली जाते. या योजनेच्या माध्य...
Continue reading
शिवसेना–मनसे युतीवर शिक्कामोर्तब? ठाकरे बंधू पुन्हा एकत्र येणार? पण काँग्रेसचं काय होणार – ठाकरे गटाच्या नेत्याचं सूचक वक्तव्य
महापालिका निवडणुकांच्या तोंडावर राज्याच्या राजकारणात...
Continue reading
छत्तीसगढमधील डीएसपी-उद्योगपती लव्ह ट्रॅप प्रकरण: पैसे, प्रेम आणि फसवणूक
छत्तीसगढमधील एका डीएसपी कल्पना वर्मा आणि स्थानिक कोट्यवधी उद्योगपती ...
Continue reading
रोहित पवारांच्या निकटवर्तीयावर ईडीची मोठी कारवाई; बारामती–पुण्यात ५ ठिकाणी धाड, १०८ कोटी फसवणूक प्रकरणात हालचाल वेगवान
बारामती–पुण्यात ईडीचा सक्त वसुलीचा शिकंजा अधिक घट्ट; राजकीय ...
Continue reading
"२०१४ ते २०२५ पर्यंत PMLA अंतर्गत ६,३१२ प्रकरणे नोंदवली गेली, मात्र फक्त १२० लोकांना दोषी ठरवण्यात आले. जाणून घ्या ईडीच्या तपासातील महत्वाच्या आकडेवारीबद्...
Continue reading
उद्धव ठाकरेंनी मुंबईत वाढलेल्या प्रदूषणावर भाष्य केले: भ्रष्टाचार आणि नियोजनशून्य विकास हे मुख्य कारण
मुंबई : महाराष्ट्रचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना प्रमुख
Continue reading
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत उमेदवारी अर्जासाठी पक्षांकडून शुल्क, इच्छुकांची नाराजी
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या रणधुमाळीत आता...
Continue reading
भाजपने सोडली साथ, शिंदे गटाचा काँग्रेससोबत अचानक युती; चोपडा नगरपालिकेतील राजकीय समीकरणावर राज्यात चर्चा
जळगाव जिल्ह्यातील चोपडा नगरपालिका निवडणुकीच्या ...
Continue reading
सत्याच्या मोर्चातून महाविकास आघाडीपर्यंत: मुंबई महापालिका निवडणुकीतील राजकीय समीकरणांचा सविस्तर आढावा
मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्...
Continue reading
कोण आहेत आलमगीर आलम?
आलमगीर आलम पाकुड विधानसभेचे काँग्रेसचे आमदार आहेत. ते चार टर्मचे आमदार आहेत. सध्या त्यांच्याकडे झारखंड सरकारमध्ये संसदीय कार्य आणि ग्राम विकास मंत्रालयाची जबाबदारी आहे. त्याआधी २० ऑक्टोबर २००६ ते १२ डिसेंबर २००९ या कालावधीत ते विधानसभेचे अध्यक्ष राहिले आहेत. सरपंच पदाची निवडणूक जिंकून त्यांनी राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. २००० मध्ये ते पहिल्यांदा आमदार झाले. आतापर्यंत ते चारवेळा विधानसभा निवडणूक जिंकले आहेत.