निवडणूक आयोगाच्या सूचनेनंतर राज्य सरकारचा निर्णय
केंद्रीय निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकीच्या पूर्व
तयारीसाठी 3 दिवसांचा महाराष्ट्र दौरा केला होता. या दौऱ्याच्या
Related News
अकोट ग्रामीण पोलीसांची जलद कारवाई – विनयभंग प्रकरणातील आरोपीविरोधात २४ तासांत दोषारोपपत्र दाखल
शिवसेना (उबाठा) मध्ये नेतृत्वबदलामुळे पक्षातील अंतर्गत कलह आणखी गडद होणार
दोन कोटी विस लाखां च्या नावाखाली रुग्णसेवकाला सायबर गुंड्याकडून गंडवण्याचा प्रयत्न
शाळांचे परिसर एका महिन्यात तंबाखूमुक्त करण्याचे आदेश
अतिक्रमण हटाव मोहीम का फक्त दुर्बळांवरच? अपंगाचे दुकान तोडले –
जुन्या वादातून दोन गटात झालेल्या शस्त्रास्त्र हाणामारी
अकोल्यात विविध मागण्यांसाठी आज धरणे आंदोलन करणाऱ्यात आले
नवी दिल्लीतील भारत मंडपममध्ये पार पडलेल्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल
अखेर कातखेड,पिंपळखुटा गावात रस्त्याच्या कामाला सुरुवात
शेलुबाजार आरोग्य केंद्रात क्षयरुग्ण तपासणी शिबिर; डिजिटल एक्स-रेद्वारे ८७ संशयितांची तपासणी
पार्डी ताड–पिंपळखुटा रस्ता सहा महिन्यांतच खड्ड्यात! मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेवर प्रश्नचिन्ह
अखेर लेखी आश्वासनाने उपोषणाची मांघार!
शेवटी निवडणूक आयोगाने मुंबईत पत्रकार परिषद घेतली. या
पत्रकार परिषदेतून निवडणूक आयोगाने 3 वर्षांपेक्षा जास्त सेवा
झालेल्या अधिकाऱ्यांच्या ताबडतोब बदल्या करा, अशा सूचना
दिल्या होत्या. राज्य सरकारने या सूचनांचे पालन करत 111
पोलीस निरीक्षकांच्या बदल्या केल्या आहेत. आगामी विधानसभा
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर 111 पोलीस निरीक्षकांच्या बदल्या
करण्यात आल्या आहेत. यापैकी 11 पोलीस निरीक्षकांची बदली
मुंबईत बदली झाली आहे. निवडणूक आयोगाने मुंबईतील पोलीस
अधिकार्यांच्या बदल्यांची सूचना राज्य पोलीस दलाला केली होती.
मुंबईतील वरिष्ठ पोलीस निरीक्षक व पोलीस निरीक्षक यांच्या
बदल्या मुंबईबाहेर करण्यात आल्या आहेत. लोकसभा
निवडणुकीवेळी निवडणूक आयोगाने राज्य सरकारला
अधिकाऱ्यांच्या बदल्यांच्या अनुषंगाने सूचना दिल्या होत्या. त्या
सूचना राज्य सरकारने पाळल्या नव्हत्या. त्यामुळे काही दिवसांपूर्वी
निवडणूक आयोगाने नाराजी व्यक्त केली होती. केंद्रीय निवडणूक
आयोगाचे मुख्य आयुक्त राजीव कुमार यांनी लोकसभा
निवडणुकीवेळी महाराष्टासह इतर 4 राज्यांच्या मुख्य सचिवांना
पत्र लिहिले होते. या पत्रात 3 वर्षांपेक्षा ज्सत सेवा झालेल्या
अधिकाऱ्यांच्या बदल्या करा, अशा सूचना दिल्या होत्या. मात्र,
राज्य सरकारने याकडे दुर्लक्ष केले होते. त्यामुळे काही दिवसांपूर्वी
आयोगाने राज्य सरकारवर ताषेरे ओढले होते.
Read also: https://ajinkyabharat.com/congress-mp-chandrakant-handores-son-stuck/