राज्य मराठी पत्रकार परिषद, महाराष्ट्र प्रदेश संघटनेतर्फे अकोट SDPO यांना निवेदन
विशाल आग्रे, विशेष प्रतिनिधी – अकोट
अकोट : दैनिक अजिंक्य भारत या वृत्तपत्राचे पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर 19 मार्च रोजी रात्री 11:00 वाजता
प्राणघातक हल्ला करण्यात आला. पत्रकारांवरील अशा प्रकारच्या हल्ल्यांमुळे
Related News
शालेय शिक्षण राज्यमंत्र्यांनी घेतला विभागाचा आढावा
सालासर बालाजी मंदिरात भव्य हनुमान जन्मोत्सव; प्रयागराज कुंभमेळ्याचा देखावा विशेष आकर्षण
तेल्हारा येथे शिवसेनेची आढावा बैठक संपन्न; स्थानिक स्वराज्य निवडणुकांची जोरदार तयारी सुरू
आठवड्यातून तीन दिवस अमरावती-मुंबई विमानसेवा सुरु
नगर परिषद शिक्षक सहकारी पत संस्था अकोटच्या अध्यक्षपदी तसलीम ताहेर पटेल यांची अविरोध निवड
शतकानुशिक परंपरेची साक्ष — आसरा माता यात्रा भक्तिभावात पार
ज्ञानेश्वर वरघट पेडगाव वार्ताहर कळंबा बोडखे येथील जनतेचा पाण्यासाठी आक्रोश
अकोला रेल्वे स्टेशन परिसरात अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपी जेरबंद
शेतकरी आत्महत्या ग्रस्त निराधार बालकांना शिक्षणासाठी मदतीचा हात; माजी खासदार राजू शेट्टी यांच्या हस्ते आर्थिक मदत वाटप
शेकडो तरुणांचा शिवसेनेत प्रवेश; अकोट तालुका आढावा बैठक उत्साहात पार
सुरत कलकत्ता हायवे क्रमांक त्रेपन्न वर भीषण अपघात; कार चालक गंभीर जखमी
गौण खनिज प्रकरणात पेंडींग असलेल्या दंडाची वसुली रखडली; तहसीलदारांवर टिका
लोकशाहीचा चौथा स्तंभ धोक्यात येत आहे, असे मत पत्रकार संघटनेने व्यक्त केले आहे.
🔹 हल्ल्याचा घटनाक्रम
विठ्ठल महल्ले यांनी अवैध धंद्यांविरोधात एक वृत्त प्रकाशित केले होते.
संबंधित गावगुंडांनी पूर्वनियोजित कट रचून त्यांच्यावर हल्ला केला.
या हल्ल्यात महल्ले गंभीर जखमी झाले असून, त्यांचा परिवार दहशतीत आहे.
🔹 पत्रकार संघटनेची मागणी
पत्रकार संरक्षण कायदा अंतर्गत हल्लेखोरांवर कठोर कारवाई करण्यात यावी.
पत्रकारांचा सुरक्षिततेचा प्रश्न शासनाने गांभीर्याने घ्यावा.
अशा घटना रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने ठोस उपाययोजना कराव्यात.
राज्य मराठी पत्रकार परिषद, महाराष्ट्र प्रदेश संघटनेच्या वतीने
मा. उपविभागीय पोलीस अधिकारी अनमोल मित्तल यांना निवेदन सादर करण्यात आले.
🔹 निवेदन देताना उपस्थित पत्रकार
विशाल अग्रे, गणेश वाकोडे, सरफराज अली, सारंग कराडे, स्वप्निल सरकटे, निलेश वानखडे, गोपाल शिरसाट,
लक्ष्मी गावंडे, महादेव वाघ, सय्यद शकील यांच्यासह अनेक पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पत्रकारांच्या सुरक्षिततेसाठी आणि हल्लेखोरांना तातडीने अटक करण्यासाठी
प्रशासन योग्य ती पावले उचलते का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.