अकोट | प्रतिनिधी
अकोट फाईल येथील भारत नगर परिसरात शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग लागली,
ज्यात तीन घरे जळून खाक झाली. या आगीत लाखो रुपयांचे घरगुती साहित्य,
विवाहासाठी आणलेले सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम पूर्णतः भस्मसात झाली.
Related News
मार्क झुकरबर्ग यांनी खरेदी केला २०० वर्षे जुना किल्ला; किंमत ऐकून बसेल धक्का!
RSS On CJP Protest : जंतर-मंतरवरील आंदोलन का झालं? RSS ने सांगितलं नेमकं कारण
गोविंदाचं दुसरं लग्न? सुनिता अहुजांच्या दाव्यावर मॅनेजरने सोडलं मौन; म्हणाले, ‘असं काहीही नाही’
दादा भुसे यांच्या राजीनाम्याची मागणी; छगन भुजबळांचं थेट विधान, म्हणाले ‘हजारो शाळा आहेत अन्…’
तुकाराम मुंढेंचा नोकरशाहीला आरसा; म्हणाले, ‘जर मी नाही, तर कोण?’
Supriya Sule : ‘निवडणूक आयोगात चुकीच्या पद्धतीने जिंकले असतील, पण कोर्टात नाही’; राष्ट्रवादीच्या केसवर सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
सीजेपी कार्यकर्त्यांना पळवून पळवून मारलं? भाजपवर आरोप, आमदार म्हणाले- ‘घरात कॉकरोचचं काय काम?’
Railway Online Luggage Booking: ट्रेनमध्ये लगेज घेऊन जाणं झालं सोपं! घरबसल्या करा बुकिंग, जाणून घ्या संपूर्ण प्रोसेस
Jio चा स्वस्तात मस्त प्लॅन! फक्त 239 रुपयांत कॉलिंगसह मिळणार 33GB डेटा
“गोविंदाला कड्यावरून ढकललं असतं…”; सुनितासाठी राखी सावंतने काय काय सांगितलं?
‘लागिरं झालं जी 2’ येणार? शीतल-अजिंक्य पुन्हा एकत्र; शिवानी बावकरने सांगितलं खरं कारण
Koffee With Karan 9 : करण जोहरच्या काउचवर दिसणार तगडी स्टारकास्ट? व्हायरल गेस्ट लिस्टने उडवली खळबळ!
घरं जळून खाक, सिलेंडरचा स्फोट
ही आग वसीम शाह बीराम शाह, शेख हसन शेख बिस्मिल्लाह
आणि शादाब खान यांच्या घरांना लागल्याची माहिती मिळाली आहे.
विशेष म्हणजे, घटनेदरम्यान दोन गॅस सिलेंडरचा स्फोट झाला,
ज्यामुळे आगीने उग्र रूप धारण केले. मात्र, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
अग्निशमन दलाची तत्काळ कारवाई
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या तत्काळ घटनास्थळी दाखल झाल्या आणि
आगीवर नियंत्रण मिळवले. तसेच, अकोट फाईल पोलीसही तातडीने घटनास्थळी पोहोचले.
पीडित कुटुंबांची मदतीची मागणी
या दुर्घटनेत मोठे आर्थिक नुकसान झाले असून, आपले संपूर्ण संसार
उद्ध्वस्त झाल्याने पीडित कुटुंबांनी प्रशासनाकडे मदतीची मागणी केली आहे.
🔥 नागरिकांना सतर्कतेचा इशारा
या घटनेनंतर, शॉर्ट सर्किट आणि घरातील विद्युत उपकरणांच्या सुरक्षिततेबाबत
अधिक सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

