बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करण्यात आली.
त्यांची हत्या करणाऱ्या आरोपींना कठोर शिक्षा व्हावी यासाठी त्यांचे बंधू धनंजय देशमुख पाठपुरावा करत आहेत.
अशातच आमिर खानने नुकतीच धनंजय यांची भेट घेतली.
Related News
Shivsena Supreme Court Hearing : ‘आमच्याकडे अधिकार आहेत’, शिवसेना खटल्याच्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाचं मोठं वक्तव्य
महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात महत्त्वाच्या आणि बहुचर्च...
Continue reading
लखनऊत पत्नी आणि बहिणीवर दिवसाढवळ्या गोळीबार; ICICI बँकेबाहेर दुहेरी हत्याकांड
लखनऊ : उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमधील गोमतीनगर परिसरात गुरुवारी दिवसाढवळ्य...
Continue reading
ब्लॅक कॉफी आणि लिंबाचा रस एकत्र पिणे फायदेशीर की नुकसानकारक? वजन कमी करण्याच्या दाव्यांमागचं सत्य जाणून घ्या
चहा आणि कॉफी हे भारतीयांच्या दैनंदिन...
Continue reading
अरुणाचलमधील चीनच्या हालचालींवर किरेन रिजिजूंचे मोठे विधान; 60 किलोमीटर घुसखोरीचा दावा फेटाळला
अरुणाचल प्रदेशातील भारत-चीन सीमेवर चीनच्या हालचालींबाबत ...
Continue reading
शिवसेना कोणाची? आज पुन्हा सुप्रीम कोर्टात सुनावणी; ही दोन कलमं संपूर्ण गेम फिरवणार? असीम सरोदे यांनी सांगितलं गणित
महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्...
Continue reading
Vinod Tawde : बिहारनंतर आता उत्तर प्रदेशात ‘खेला होबे’; विनोद तावडे यांच्यासमोर काय आव्हाने असणार? भाजप नेता काय जादू करणार?
बिहार : बिहार विधानसभा निवड...
Continue reading
Sergio Gor On Kashmir : भारताला जे अपेक्षित नाही ते घडलं; सर्जियो गोर यांचा लडाख दौरा रद्द, काश्मीरच्या मुद्द्यावर अमेरिका पाकिस्तानच्या बाजूने का?
सर्जियो गोर यांच्या वक्तव्यानंत...
Continue reading
गृहकर्ज फेडलं? मग झटपट करा हे काम; बँकेकडून मागा ही 9 कागदपत्रं, यादीच पाहा
Home Loan Foreclosure : स्वतःचं घर असावं हे प्रत्येकाचं स्वप...
Continue reading
SBI ग्राहकांना मोठा झटका! BSBD खात्याच्या नियमांत बदल; महिन्यात 4 पेक्षा जास्त पैसे काढल्यास द्यावे लागणार अतिरिक्त शुल्क
भारतीय स्टेट बँक म्हणजेच SBI च्य...
Continue reading
नारायण राणेंचं नाव खासदारकीसाठी सूचवलं अन् धमक्या आल्या; दीपक केसरकरांच्या गौप्यस्फोटाने राजकीय वर्तुळात खळबळ
रत्नागिरी-सिंधुदुर्ग : रत्न...
Continue reading
मराठी चाचणीच्या अंमलबजावणीवरून आरटीओ यंत्रणेतच संभ्रम? प्रत्यक्ष कारवाई कधी सुरू होणार?
राज्यातील रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषेचे ज्ञान असणे आण...
Continue reading
थरारक! महिला मुख्याध्यापकावर 27 वेळा चाकूने वार; दहावीच्या दोन विद्यार्थ्यांना अटक
नलगोंडा : तेलंगणातील नलगोंडा जिल्ह्यातून शिक्षणक्षेत्राला हादरवून ट...
Continue reading
बीडच्या मस्साजोग इथले सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येनं संपूर्ण राज्याला हादरवून सोडलं.
त्यांच्या मारेकऱ्यांना शिक्षा मिळवून देण्यासाठी संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख पाठपुरावा करत आहेत.
गेल्या काही दिवसांत अनेक राजकीय नेत्यांनी धनंजय देशमुख आणि कुटुंबीयांची भेट घेतली.
आता अभिनेता आमिर खानने सुद्धा धनंजय देशमुख यांची भेट घेतल्याचं कळतंय.
पाणी फाऊंडेशनच्या कार्यक्रमात आमिरने धनंजय यांची भेट घेतली. यावेळी संतोष देशमुख यांचा मुलगा विराज देशमुखसुद्धा उपस्थित होता.
या भेटीचा व्हिडीओ समोर आला असून त्यात आमिर हा धनंजय आणि विराज देशमुख यांच्याशी चर्चा करताना दिसून येत आहे.
यावेळी आमिरची पूर्व पत्नी किरण रावसुद्धा तिथे उपस्थित होती.
9 डिसेंबर 2024 रोजी बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करण्यात
आल्यानंतर त्यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. या हत्या प्रकरणात मुख्य सूत्रधार म्हणून माजी मंत्री धनंजय मुंडे यांचा
निकटवर्तीय समजला जाणारा वाल्मिक कराड याचं नाव समोर आलं. तेव्हापासून संतोष देशमुख यांच्या
कुटुंबीयांकडून आणि विरोधकांकडून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची आणि या प्रकरणातील आरोपींना कठोर
शिक्षा करण्याची मागणी जोर धरू लागली होती. त्यानंतर मुंडेंना त्यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला.
3 मार्चच्या रात्री संतोष देशमुख यांच्या क्रूरपणे केलेल्या हत्येचे फोटो समोर आले होते. त्यानंतर संपूर्ण राज्यातत संतापाची लाट उसळली.
या फोटोंमध्ये आरोपी देशमुख यांना अमानुष मारहाण करताना दिसला. हे फोटो पोलिसांनी त्यांच्या चार्जशीटमध्ये जोडले आहेत.
या क्रूर हत्येचे फोटो समोर आल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला. त्यामुळेच धनंजय मुंडे यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला.
संतोष देशमुख यांची हत्या पवनचक्कीच्या वादातून झाल्याचं धनंजय देशमुख यांनी सांगितलं होतं.
पोलिसांनी सादर केलेल्या दोषारोपपत्रातदेखील याचा उल्लेख आहे. “6 डिसेंबर रोजी खंडणी मागण्यासाठी आलेल्या काही जणांनी
मस्साजोग इथल्या पवनचक्की प्रकल्पाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याची घटना घडली होती.
त्या प्रकल्पावर काम करणारे सुरक्षा रक्षक हे मस्साजोग इथले असल्यानं सरपंच संतोष देशमुख यांनी या प्रकरणात मध्यस्थी केली होती.
तसंच मारहाण करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी देखील केली होती.
त्याचा राग मनात धरून अपहरणकर्त्यांनी संतोष देशमुख यांची हत्या केली”, असा आरोप धनंजय देशमुखांनी केला.