अनिल देशमुखांचा गौप्यस्फोट : “राज्यात जातीय सलोखा बिघडवण्याचे काम सुरू”
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मोठा गौप्यस्फोट करत
राज्यातील सध्याच्या परिस्थितीवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
नागपूर येथील घटनेला भाजप नेते नितेश राणे आणि बजरंग दलच्या वक्तव्याला जबाबदार धरत त्यांनी गंभीर आरोप केले आहेत.
Related News
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत शेकडो युवकांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश
महावितरणने केली मान्सूनपूर्व कामांना सुरुवात
आर्यन मेश्राम ने मैन ऑफ द मैच बनकर NECO मास्टर ब्लास्टर को नागपुर टाइटंस पर 9 विकेट से दिलाई शानदार जीत
विदर्भ प्रो T20 लीगमध्ये NECO मास्टर ब्लास्टरच्या 9 गडी राखून विजयात आर्यन मेश्राम चमकदार – सामना विजेता घोषित
वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान; मात्र विमा कंपनीचे दुर्लक्ष
डाॅ. प्रतिमा इंगोले यांच्या तेराव्या कथासंग्रहांचे प्रकाशन संपन्न
अकोल्यात काँग्रेसला मोठा धक्का…
बी जे पी चा नवा राष्ट्रीय अध्यक्ष कोण?
“पूर्णपणे बिनबुडाचे आरोप” — राहुल गांधींच्या ‘मॅच फिक्सिंग’ दाव्यावर…
उभ्या असलेल्या ट्रक ट्रॉली आग लागल्या प्रकरणी पातुर पोलिसात तक्रार
अवैध डिझेल वाहतूक करणाऱ्या व्हॅन व दुचाकीचा अपघात
अकोट नगर परिषद कृती आराखड्यात जिल्ह्यातून प्रथम
जातीय सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न
अनिल देशमुख यांनी म्हटले की, “राज्यात काही नेते जाणूनबुजून जातीय सलोखा बिघडवण्याचे काम करत आहेत.
नागपूर घटनेप्रकरणी नितेश राणे आणि बजरंग दलाच्या वक्तव्यांमुळे तणाव निर्माण झाला आहे.“
प्रशांत कोलटकरच्या वक्तव्यावर नाराजी
प्रशांत कोलटकरने छत्रपती शिवाजी महाराजांविषयी आक्षेपार्ह विधान केल्यानेही देशमुख यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
“राज्यात अशा वक्तव्य करणाऱ्या लोकांना सरकार सुरक्षा पुरवते, मात्र पोलिसांना योग्य ती सुरक्षा मिळत नाही.
हा गंभीर प्रश्न आहे,” असे ते म्हणाले.
धनंजय मुंडेंविरोधात गौप्यस्फोट
देशमुख यांनी धनंजय मुंडे यांच्यावरही मोठा आरोप केला आहे.
“मी गृहमंत्री असताना धनंजय मुंडे यांनी बीडच्या पोलीस अधीक्षकांना हटवून आपल्या मर्जीतील अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यासाठी दबाव टाकला होता.
मी त्यास नकार दिला, त्यामुळे त्यांनी थेट मुख्यमंत्र्यांकडे माझी तक्रार केली होती,” असा खुलासा देशमुख यांनी केला.
सुप्रिया सुळे यांचे समर्थन
राष्ट्रवादी नेत्या सुप्रिया सुळे यांनी धनंजय मुंडे यांच्याबाबत केलेल्या विधानाचे समर्थन करत,
“राज्यात गुंडांना संरक्षण दिले जात आहे,” असा आरोप केला आहे.
🔹 राजकीय वातावरण तापणार?
🔹 सरकारकडून यावर काय उत्तर येणार?
या आरोप-प्रत्यारोपांमुळे राज्यातील राजकीय वातावरण अधिक तापण्याची शक्यता .