अनिल देशमुखांचा गौप्यस्फोट : “राज्यात जातीय सलोखा बिघडवण्याचे काम सुरू”
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मोठा गौप्यस्फोट करत
राज्यातील सध्याच्या परिस्थितीवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
नागपूर येथील घटनेला भाजप नेते नितेश राणे आणि बजरंग दलच्या वक्तव्याला जबाबदार धरत त्यांनी गंभीर आरोप केले आहेत.
Related News
“अंबाजोगाईत वकिल महिला बळी ठरली एका कटाचा?
माय ममता झाली काळी!
स्वारगेट बलात्कार प्रकरणाचा समरी अहवाल उघड!
शिक्षण क्षेत्रात नवचैतन्य! इंझोरी केंद्रातील मुख्याध्यापक
चर्चगेट स्थानकाबाहेर बेस्ट बसला आग;
गुलजारपुरा स्मशानभूमी मोजते अखेरच्या घटका
भारताला जपानकडून बुलेट ट्रेनची भेट! मुंबई-अहमदाबाद उच्चगती रेल्वे
अकोल्यात केंद्र सरकारविरोधात काँग्रेसचे तीव्र आंदोलन!
मेरठमध्ये धक्कादायक प्रकार : तरुणाची २५ वर्षांनी मोठ्या विधवा महिलेशी फसवून लग्न
राजस्थानमध्ये भीषण अपघात; वरात घेऊन जाणारी बस आणि ट्रकची समोरासमोर धडक….
अकोल्यात पाणी प्रश्न पेटला; शिवसेनेचा जलप्रदाय विभागात घागर मोर्चा, तोडफोड
कोल्हापुरात फुटबॉल सामन्यादरम्यान आयोजकांना पाच हजारांचा दंड
जातीय सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न
अनिल देशमुख यांनी म्हटले की, “राज्यात काही नेते जाणूनबुजून जातीय सलोखा बिघडवण्याचे काम करत आहेत.
नागपूर घटनेप्रकरणी नितेश राणे आणि बजरंग दलाच्या वक्तव्यांमुळे तणाव निर्माण झाला आहे.“
प्रशांत कोलटकरच्या वक्तव्यावर नाराजी
प्रशांत कोलटकरने छत्रपती शिवाजी महाराजांविषयी आक्षेपार्ह विधान केल्यानेही देशमुख यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
“राज्यात अशा वक्तव्य करणाऱ्या लोकांना सरकार सुरक्षा पुरवते, मात्र पोलिसांना योग्य ती सुरक्षा मिळत नाही.
हा गंभीर प्रश्न आहे,” असे ते म्हणाले.
धनंजय मुंडेंविरोधात गौप्यस्फोट
देशमुख यांनी धनंजय मुंडे यांच्यावरही मोठा आरोप केला आहे.
“मी गृहमंत्री असताना धनंजय मुंडे यांनी बीडच्या पोलीस अधीक्षकांना हटवून आपल्या मर्जीतील अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यासाठी दबाव टाकला होता.
मी त्यास नकार दिला, त्यामुळे त्यांनी थेट मुख्यमंत्र्यांकडे माझी तक्रार केली होती,” असा खुलासा देशमुख यांनी केला.
सुप्रिया सुळे यांचे समर्थन
राष्ट्रवादी नेत्या सुप्रिया सुळे यांनी धनंजय मुंडे यांच्याबाबत केलेल्या विधानाचे समर्थन करत,
“राज्यात गुंडांना संरक्षण दिले जात आहे,” असा आरोप केला आहे.
🔹 राजकीय वातावरण तापणार?
🔹 सरकारकडून यावर काय उत्तर येणार?
या आरोप-प्रत्यारोपांमुळे राज्यातील राजकीय वातावरण अधिक तापण्याची शक्यता .