अकोला: अकोल्यातील मूर्तिजापूर तालुक्यातील रसुलपूर येथील एका अल्पभूधारक युवा शे तकऱ्याने कर्जाच्या ओझ्याखाली दबून आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. योगेश हरणे (वय ३५) असे या शेतकऱ्याचे नाव असून, त्यांनी शेतात विष प्राशन करून आपले जीवन संपवले. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
योगेश हरणे हे शेतकरी चळवळीत सक्रिय होते. त्यांनी शेतकऱ्यांच्या न्यायहक्कांसाठी अनेक आंदोलने केली होती. मात्र, शेतीतील नापिकी, वाढते कर्ज, आणि कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची जबाबदारी यामुळे ते सतत तणावाखाली होते. विशेष म्हणजे, चार महिन्यांपूर्वी त्यांच्या पत्नीचे कर्करोगाने निधन झाले होते, त्यामुळे त्यांच्यावर कुटुंबाच्या पालनपोषणाची जबाबदारी आणखी वाढली होती. दोन लहान मुलांचे शिक्षण, वृद्ध आई-वडिलांची देखभाल आणि शेतीवरील कर्ज यामुळे ते प्रचंड मानसिक तणावात होते.
३ पट वाढलेले कर्ज ठरले आत्महत्येचे कारण
Related News
अकोट: अकोट तालुक्यातील लाडेगाव येथील शेतकऱ्याला, देवीदास येऊल यांना शेतात जाण्यासाठी रस्ता नव्हता. त्यामुळे पेरणी रखडली होती आणि शेतीचे नियोजन कोलमडले होते.शिकायत मिळाल्यावर अकोटचे...
Continue reading
मुंबईमध्ये श्री गणेश विसर्जन सोहळ्यासाठी चोख बंदोबस्त
Continue reading
अकोट (ता. २० जुलै २०२५): अकोट ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत एका महिलेसोबत विनयभंग करणाऱ्या आरोपीविरोधात पोलिसांनी अवघ्या २४ तासांत दोषारोपपत्र दाखल करत जलद आणि ठोस कारवाई केली आहे.
...
Continue reading
लोणार - प्रतिनिधी
दिनांक - १८ जुलै २०२५
लोणार तालुक्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) मध्ये अलीकडेच झालेल्या नेतृत्वबदलामुळे पक्षातील अंतर्गत कलह आणखी गडद होत असल्याचे स्पष्...
Continue reading
प्रतिनिधी |विवरादेशात सायबर गुन्हेगारीचे जाळे दिवसेंदिवस अधिकच विस्तारित होत आहे. नागरिकांना सरकारी अधिकाऱ्यांच्या नावे खोट्या हुलकावण्या देत, त्यांच्यावर गंभीर गुन्ह्यांचे...
Continue reading
शाळांचे परिसर एका महिन्यात तंबाखूमुक्त करण्याचे आदेश अकोला जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी दिले आहेय..केवळ कागदावर नको तर प्रत्यक्षात कार्यवाही करा अशा सूचना यावेळी जिल्हाधिकारी अजि...
Continue reading
मूर्तिजापूर,
शहरात सुरू असलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेचा फटका आता अधिक गंभीर पातळीवर पोहोचला आहे. या कारवाईत एका अपंग व्यक्तीचे छोटं दुकान तोडून टाकण्यात आल्याने त्याच्यासमोर उपासम...
Continue reading
जुन्या वादातून दोन गटात झालेल्या शस्त्रास्त्र हाणामारीत आठ जण जखमी झाल्याची धक्कादायक घटना अकोल्यातील कृषी नगर भागात घडली आहे. दोन गटात झालेल्या या वादात गोळीबार झाल्याची माहिती आह...
Continue reading
राज्यातील शासकीय रुग्णालयातील परिचारिकांच्या विविध मागण्यांबाबत कोणताही अंतिम निर्णय न झाल्याने त्यांनी आज गुरूवारी काम बंद आंदोलन केलेये. या आंदोलनात अकोला येथील शासकीय वैद्यकीय म...
Continue reading
‘एक जिल्हा, एक उत्पादन - 2024’ मध्ये महाराष्ट्राला ‘अ’ श्रेणीत सुवर्णपदक मिळालाय..तर अकोल्याच्या कापूस उत्पादनांना राष्ट्रीय ओळख मिळाली आहेय..कापूस प्रक्रिया उद्योगासाठीअकोल्या...
Continue reading
अकोट : अजिंक्य भारत ने 10 जुलै रोजी पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या
Continue reading
शेलुबाजार वार्ता :-बुधवार दि16/07/25 रोजी ता मंगरूळपिर मधून प्राथमिक आरोग्य केंद्र
Continue reading
योगेश यांच्या शेतीवर सुरुवातीला ९० हजार रुपयांचे कर्ज होते. मात्र, व्याज वाढत गेल्याने हे कर्ज तब्बल २ लाख ७० हजारांपर्यंत पोहोचले. कर्ज फेडण्याची कोणतीही शक्यता दिसत नसल्याने त्यांनी आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलले. विषप्राशन केल्यानंतर उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात दोन लहान मुले, वृद्ध आई-वडील आणि दोन भाऊ आहेत.
शेतकरी चळवळीला मोठा धक्का
योगेश हरणे हे शेतकरी संघटनेचे निष्ठावान कार्यकर्ता होते. त्यांनी प्रशासनावर वारंवार दबाव टाकून शेतकऱ्यांचे प्रश्न उपस्थित केले होते. त्यांच्या निधनामुळे शेतकरी चळवळीला मोठा धक्का बसला आहे.
सरकारवर टीका
या घटनेनंतर शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी सरकारवर तीव्र शब्दांत टीका केली आहे. “सरकार शेतकऱ्यांच्या समस्यांकडे दुर्लक्ष करत आहे. अल्पभूधारक शेतकऱ्यांना मदत करण्याऐवजी त्यांच्या अडचणी वाढत चालल्या आहेत. सरकार संवेदनशील असते, तर असे प्रकार थांबले असते,” असे ते म्हणाले.
शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे सत्र थांबवण्यासाठी सरकारने तातडीने ठोस उपाययोजना करण्याची मागणी केली जात .