अकोला: अकोल्यातील मूर्तिजापूर तालुक्यातील रसुलपूर येथील एका अल्पभूधारक युवा शे तकऱ्याने कर्जाच्या ओझ्याखाली दबून आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. योगेश हरणे (वय ३५) असे या शेतकऱ्याचे नाव असून, त्यांनी शेतात विष प्राशन करून आपले जीवन संपवले. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
योगेश हरणे हे शेतकरी चळवळीत सक्रिय होते. त्यांनी शेतकऱ्यांच्या न्यायहक्कांसाठी अनेक आंदोलने केली होती. मात्र, शेतीतील नापिकी, वाढते कर्ज, आणि कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची जबाबदारी यामुळे ते सतत तणावाखाली होते. विशेष म्हणजे, चार महिन्यांपूर्वी त्यांच्या पत्नीचे कर्करोगाने निधन झाले होते, त्यामुळे त्यांच्यावर कुटुंबाच्या पालनपोषणाची जबाबदारी आणखी वाढली होती. दोन लहान मुलांचे शिक्षण, वृद्ध आई-वडिलांची देखभाल आणि शेतीवरील कर्ज यामुळे ते प्रचंड मानसिक तणावात होते.
३ पट वाढलेले कर्ज ठरले आत्महत्येचे कारण
Related News
कुणाल किशोर कमलाकर प्रकरणात काका वर खुनाचा गुन्हा दाखल.
बोरगाव मंजू येथे गोवंशाला जीवनदान.
उन्हाळी क्रिकेट शिबिराचा समारोप.
अकोट शहरात एकास ट्रकने चिरडले, घटनास्थळावरच दुर्दैवी मृत्यू
बांगलादेश यांची भारतातून रवानगी…
डीडीए रिक्वायरमेंट 2005 दिल्ली विकास प्राधिकरण मध्ये सरकारी नोकरी…
अकोल्यात ऑफ्रोह संघटनेचे धरणे आंदोलन;
बोर्डी येथील घोगा नाल्यावरील संरक्षण भिंतीचे काम अर्धवट
अकोट शहरात अकोला नाक्यावरील रेल्वे ब्रिजवर पथदिवे लागणार
अकोला जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक संदर्भात पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न
पावसाचा तब्ब्बल ३ हजार ७६ हेक्टरवरील पिकांना फटका बसला असून, २२ घराचे अंशतः नुकसान
अकोला शहरातील नऊ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश नुकतेच जारी करण्यात आले
योगेश यांच्या शेतीवर सुरुवातीला ९० हजार रुपयांचे कर्ज होते. मात्र, व्याज वाढत गेल्याने हे कर्ज तब्बल २ लाख ७० हजारांपर्यंत पोहोचले. कर्ज फेडण्याची कोणतीही शक्यता दिसत नसल्याने त्यांनी आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलले. विषप्राशन केल्यानंतर उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात दोन लहान मुले, वृद्ध आई-वडील आणि दोन भाऊ आहेत.
शेतकरी चळवळीला मोठा धक्का
योगेश हरणे हे शेतकरी संघटनेचे निष्ठावान कार्यकर्ता होते. त्यांनी प्रशासनावर वारंवार दबाव टाकून शेतकऱ्यांचे प्रश्न उपस्थित केले होते. त्यांच्या निधनामुळे शेतकरी चळवळीला मोठा धक्का बसला आहे.
सरकारवर टीका
या घटनेनंतर शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी सरकारवर तीव्र शब्दांत टीका केली आहे. “सरकार शेतकऱ्यांच्या समस्यांकडे दुर्लक्ष करत आहे. अल्पभूधारक शेतकऱ्यांना मदत करण्याऐवजी त्यांच्या अडचणी वाढत चालल्या आहेत. सरकार संवेदनशील असते, तर असे प्रकार थांबले असते,” असे ते म्हणाले.
शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे सत्र थांबवण्यासाठी सरकारने तातडीने ठोस उपाययोजना करण्याची मागणी केली जात .