आम आदमी पार्टीने महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभेची
निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे. या दोन्ही राज्यांच्या
निवडणुकीत आप इंडिया आघाडीला पाठिंबा देणार असल्याचं
Related News
आठवड्यातून तीन दिवस अमरावती-मुंबई विमानसेवा सुरु
नगर परिषद शिक्षक सहकारी पत संस्था अकोटच्या अध्यक्षपदी तसलीम ताहेर पटेल यांची अविरोध निवड
शतकानुशिक परंपरेची साक्ष — आसरा माता यात्रा भक्तिभावात पार
ज्ञानेश्वर वरघट पेडगाव वार्ताहर कळंबा बोडखे येथील जनतेचा पाण्यासाठी आक्रोश
अकोला रेल्वे स्टेशन परिसरात अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपी जेरबंद
शेतकरी आत्महत्या ग्रस्त निराधार बालकांना शिक्षणासाठी मदतीचा हात; माजी खासदार राजू शेट्टी यांच्या हस्ते आर्थिक मदत वाटप
शेकडो तरुणांचा शिवसेनेत प्रवेश; अकोट तालुका आढावा बैठक उत्साहात पार
सुरत कलकत्ता हायवे क्रमांक त्रेपन्न वर भीषण अपघात; कार चालक गंभीर जखमी
गौण खनिज प्रकरणात पेंडींग असलेल्या दंडाची वसुली रखडली; तहसीलदारांवर टिका
परप्रांतीय कंपन्यांची मुजोरी मोडत स्थानिकांना मिळवून दिला रोजगार….
अकोटात सद्भावना आरोग्य तपासणी व उपचार शिबिराचे आयोजन
भगवान महावीर जयंतीनिमित्त अकोल्यात भव्य रॅलीचे आयोजन
सूत्रांनी सांगितलं. आम आदमी पार्टीच्या या खेळीमुळे दोन्ही
राज्यात भाजपला मोठा फटका बसू शकतो असं सांगितलं जात
आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आम आदमी पक्ष महाराष्ट्र
आणि झारखंडमध्ये विधानसभा निवडणूक लढवणार नाही.
दिल्लीतील आगामी विधानसभा निवडणुकीवर फोकस
करण्यासाठी आपने हा निर्णय घेतला आहे. आपने इंडिया
आघाडीत असतानाही काही राज्यांमध्ये निवडणूक लढवली होती.
मत विभागणी झाल्याने त्याचा फायदा भाजपला झाला होता. ही
मत विभागणी टाळण्यासाठी आता आपने मोठा निर्णय घेतल्याचं
सांगितलं जात आहे. मात्र. इंडिया आघाडीतील घटक पक्षांच्या
दबावामुळेच आपने हा निर्णय घेतल्याचंही बोललं जात आहे.
आम आदमी पार्टीचा सर्वात चांगला बेस दिल्लीत आहे. दिल्लीत
आपची सत्ता आहे. मात्र लोकसभा निवडणुकीत आपला दिल्लीत
मोठा पराभव पत्करावा लागला होता. त्यामुळे आपने इतर
राज्यांच्या निवडणुकीत गुंतून न राहण्याचा निर्णय घेतला आहे.
त्यांनी जास्तीत जास्त फोकस दिल्लीवर ठेवण्याचा निर्णय घेतला
आहे. दिल्लीत विधानसभेवर पुन्हा सत्ता आणण्यासाठी अरविंद
केजरीवाल हे खास रणनीती आखण्याची शक्यता वर्तवली जात
आहे.