आम आदमी पार्टीने महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभेची
निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे. या दोन्ही राज्यांच्या
निवडणुकीत आप इंडिया आघाडीला पाठिंबा देणार असल्याचं
Related News
अकोट ग्रामीण पोलीसांची जलद कारवाई – विनयभंग प्रकरणातील आरोपीविरोधात २४ तासांत दोषारोपपत्र दाखल
शिवसेना (उबाठा) मध्ये नेतृत्वबदलामुळे पक्षातील अंतर्गत कलह आणखी गडद होणार
दोन कोटी विस लाखां च्या नावाखाली रुग्णसेवकाला सायबर गुंड्याकडून गंडवण्याचा प्रयत्न
शाळांचे परिसर एका महिन्यात तंबाखूमुक्त करण्याचे आदेश
अतिक्रमण हटाव मोहीम का फक्त दुर्बळांवरच? अपंगाचे दुकान तोडले –
जुन्या वादातून दोन गटात झालेल्या शस्त्रास्त्र हाणामारी
अकोल्यात विविध मागण्यांसाठी आज धरणे आंदोलन करणाऱ्यात आले
नवी दिल्लीतील भारत मंडपममध्ये पार पडलेल्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल
अखेर कातखेड,पिंपळखुटा गावात रस्त्याच्या कामाला सुरुवात
शेलुबाजार आरोग्य केंद्रात क्षयरुग्ण तपासणी शिबिर; डिजिटल एक्स-रेद्वारे ८७ संशयितांची तपासणी
पार्डी ताड–पिंपळखुटा रस्ता सहा महिन्यांतच खड्ड्यात! मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेवर प्रश्नचिन्ह
अखेर लेखी आश्वासनाने उपोषणाची मांघार!
सूत्रांनी सांगितलं. आम आदमी पार्टीच्या या खेळीमुळे दोन्ही
राज्यात भाजपला मोठा फटका बसू शकतो असं सांगितलं जात
आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आम आदमी पक्ष महाराष्ट्र
आणि झारखंडमध्ये विधानसभा निवडणूक लढवणार नाही.
दिल्लीतील आगामी विधानसभा निवडणुकीवर फोकस
करण्यासाठी आपने हा निर्णय घेतला आहे. आपने इंडिया
आघाडीत असतानाही काही राज्यांमध्ये निवडणूक लढवली होती.
मत विभागणी झाल्याने त्याचा फायदा भाजपला झाला होता. ही
मत विभागणी टाळण्यासाठी आता आपने मोठा निर्णय घेतल्याचं
सांगितलं जात आहे. मात्र. इंडिया आघाडीतील घटक पक्षांच्या
दबावामुळेच आपने हा निर्णय घेतल्याचंही बोललं जात आहे.
आम आदमी पार्टीचा सर्वात चांगला बेस दिल्लीत आहे. दिल्लीत
आपची सत्ता आहे. मात्र लोकसभा निवडणुकीत आपला दिल्लीत
मोठा पराभव पत्करावा लागला होता. त्यामुळे आपने इतर
राज्यांच्या निवडणुकीत गुंतून न राहण्याचा निर्णय घेतला आहे.
त्यांनी जास्तीत जास्त फोकस दिल्लीवर ठेवण्याचा निर्णय घेतला
आहे. दिल्लीत विधानसभेवर पुन्हा सत्ता आणण्यासाठी अरविंद
केजरीवाल हे खास रणनीती आखण्याची शक्यता वर्तवली जात
आहे.