वर्षभर नो टेन्शन

मुंबईकरांसाठी दिलासा

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! शहराला पाणीपुरवठा करणारी सात धरणे आता ९९% किंवा त्याहून अधिक भरली आहेत, ज्यामुळे जून २०२६ पर्यंत मुंबईकरांची पाण्याची गरज पूर्ण होईल.

मुंबईला सात धरणांमधून पाणीपुरवठा केला जातो. यामध्ये अप्पर वैतरणा, तानसा, मिडल वैतरणा आणि मोडक सागर या चार प्रमुख धरणे पूर्ण क्षमतेने भरली आहेत. उर्वरित तीन धरणांमध्येही पाणीसाठा ९९% पेक्षा अधिक आहे.

चार प्रमुख धरणांमधून गुरुत्वाकर्षणाच्या मदतीने पाणी थेट भांडुप पंपिंग स्टेशनला पोहोचते, जिथे पाण्यावर शुद्धीकरण प्रक्रिया केली जाते.

या धरणांतून मुंबईच्या एकूण पाणीपुरवठ्याचा ५०% पाणी मिळते, तर उर्वरित ५०% पाणी भातसा धरणातून येते.

भांडुप पंपिंग स्टेशनपासून सुमारे ६० किलोमीटर अंतरावर असलेल्या तानसा धरणातून पाणी मिडल वैतरणा आणि मोडक सागर धरणात येते. तिथून शुद्धीकरणानंतर पाणी मलबार हिलपासून शहरातील घराघरात पोहोचवले जाते. मुंबईकरांना दररोज सुमारे ४,००० दशलक्ष लिटर (MLD) पाणी उपलब्ध होते.

मुंबई महानगरपालिकेचे जल अभियंता पुरुषोत्तम माळवदे यांनी सांगितले की, पाणी व्यवस्थापन अधिक प्रभावी करण्यासाठी काही उपाययोजना सुरू आहेत:

पाण्याची गळती रोखण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर.

सिमेंट काँक्रिट वापरून रस्त्यांवरील गळती कमी करणे.

गारगाई धरण लवकरच बांधले जाणार, ज्यामुळे दररोज अतिरिक्त ४४० MLD पाणी उपलब्ध होईल.

आतापर्यंत २२,००० जलजोडण्या अधिकृत केल्या गेल्या, ज्यामुळे पाणी चोरी कमी झाली आहे.

पुरुषोत्तम माळवदे म्हणाले,“मुंबईकरांनी पाण्याची चिंता करू नये. धरणे पूर्ण क्षमतेने भरली असल्याने पुढील वर्षभर पाण्याची गरज सुनिश्चित आहे.”

read also :http://ajinkyabharat.com/jhubin-gargchi-shewatchi-wish/