विदर्भात 3523 शाळांना लागणार कुलूप..

हजारो विद्यार्थी

हजारो विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहण्याचा धोका..

राज्यातील जिल्हा परिषदांच्या, नगर परिषदांच्या

आणि खासगी मिळून सुमारे १५ हजार शाळा बंद पडण्याच्या मार्गावर आहेत.

Related News

एकट्या विदर्भात अशा शाळांची संख्या ३५२३ आहे.

या संदर्भात तातडीने पावले न उचलल्यास हजारो विद्यार्थी

शिक्षणापासून वंचित राहण्याचा धोका आहे.

सरकारी शाळांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील तळागाळात

शिक्षणाचा प्रवाह पोहचविला जातो.

या शाळाच बंद होत असल्याने शिक्षण व्यवस्था

धोक्यात येण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

बंद होणाऱ्या विभागनिहाय शाळांमध्ये मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर ३४७,

नांदेड ३९४, हिंगोली ९३, परभणी १२६, जालना १९०,

बीड ६३३, लातूर २०२, धाराशिव १७८, खान्देशमध्ये जळगाव १०७,

धुळे ९२, नंदुरबार १९२, पश्चिम महाराष्ट्रात सोलापूर ३४२, सातारा १४०,

रत्नागिरी १,३७५, सिंधुदुर्ग ८३५, कोल्हापूर ५०७, सांगली ४१५, पालघर ३१७,

मुंबई उपनगरांतील ८६, मुंबई-रमधील ३१, ठाणे ४४१, रायगड १,२९५,

पुणे १,१३२, पुणे १,१३२, नाशिक ३३१ आणि अहमदनगरमधील ७७५ शाळांचा समावेश आहे.

ही परिस्थिती बदलण्यासाठी

अकोल्यामध्ये शाळा बचाव समितीची स्थापना करण्यात आली.

शाळा बचाव समितीचे पदाधिकारी गावोगावी भेटी देऊन, जनजागृती करीत आहेत.

विद्यार्थी संख्या कशी वाढवली जाईल,

शाळा टिकवण्यासाठी काय करता येईल यासाठी प्रयत्न करीत आहेत.

प्रसंगी जनआंदोलन उभारण्याचाही इशारा देण्यात आला आहे.

Read also: https://ajinkyabharat.com/prakash-ambedkars-statement-discussed-will-definitely-benefit-uddhav-thackeray/

Related News