अकोला – वणी वारुळा फाट्यावर एस टी बस थांबा असूनही परतवाडा, अकोला, अकोट आगारातील बसेस थांबत नसल्याचे गंभीर प्रमाणात आढळले आहे. या मार्गावर धावणाऱ्या बसेसचे चालक व वाहक प्रवाशांना वणी वारुळा फाट्यावर उतरण्याची परवानगी न देता, तिकीट देवरी फाटा किंवा अकोटवर फाडून बस थांबवतात. यामुळे स्थानिक रहिवासी व प्रवाशांना मोठा त्रास होत असून, त्यांच्या सुरक्षेवरही प्रश्न निर्माण झाला आहे.
नारी शक्ती एकता संघर्ष फाऊंडेशनच्या वतीने अकोला विभाग प्रमुख विलास राठोड यांच्याकडे याबाबत लेखी तक्रार दाखल करण्यात आली आहे. तक्रारीत म्हटले आहे की, दि. ५ डिसेंबर रोजी बस क्र. एम एच ४० एक्यु ६४६७ आणि दि. ८ डिसेंबर रोजी बस क्र. एम एच ४० एक्यु ६३९९ या बसच्या चालकांनी वणी वारुळा फाट्यावर थांबण्यास नकार दिला, तसेच तक्रार करणाऱ्या मुलीला उद्धट व घाणेरडे शब्द वापरून धमकावले. महिला वाहक एम एन इंगळे यांनीही तिकीट पाडताना फाट्यावर थांबण्यास नकार दिला.
अकोला विभाग कार्यालयाने व अमरावती विभागीय एस टी कार्यालयाने वणी वारुळा फाट्यावर थांबा असल्याचे लेखी मान्य केले आहे. मात्र, प्रत्यक्षात चालक व वाहक बस थांबवत नसल्याने तक्रारी देण्याची वेळ आली. नारी शक्ती एकता संघर्ष फाऊंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी चेतावणी दिली आहे की, संबंधित चालक व वाहकांवर कारवाई न झाल्यास, ते अकोला विभाग प्रमुखांच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन व आमरण उपोषण करणार आहेत.
विभाग प्रमुख विलास राठोड यांनी या प्रकरणाची माहिती दिली आणि सांगितले की, ते दौऱ्यावर असल्यामुळे कार्यालयात परतल्यावर तक्रारींचा अभ्यास करून योग्य कारवाई केली जाईल.या तक्रारीमुळे प्रवाशांच्या सुरक्षेची आणि बस सेवेच्या नियमांची गंभीर दखल घेणे आवश्यक ठरले आहे, तसेच एस टी चालक व वाहकांनी नियमांचे पालन न केल्यास प्रशासनात्मक कारवाई करणे आवश्यक आहे.
Related News
एसटी बसचं चाक निखळलं, तरी अर्धा किलोमीटर धावली ; 50 प्रवाशांचा जीव धोक्यात!
“मोठा धक्कादायक खुलासा: मुंबई लोकल मयंक लोहार हत्या प्रकरणातील 7 गंभीर अपडेट्स आणि संपूर्ण घटनाक्रम”
एअर कॅनडाला धक्का ! 16 वर्षे परवान्याशिवाय 900 विमान उड्डाणे करणारा एअर कॅनडाचा पायलट अटकेत
Mumbra Accident 2026 : हृदयद्रावक! 4 वर्षांचा संसार अर्धवट, वाढदिवसाच्या आधीच रेल्वे पोलिसाचा मृत्यू; वर्षभरानंतरही पत्नी नोकरीच्या प्रतीक्षेत
सोलापूर रेल्वे स्थानकात धक्कादायक दुर्घटना टळली! पीओपी छताचा मोठा भाग कोसळला, 6 प्रवासी जखमी; सुरक्षेवर गंभीर प्रश्न
धक्कादायक! एका ‘BOMB’ शब्दामुळे 202 जणांचा जीव धोक्यात; विमानाने घेतला अटलांटिकवर यू-टर्न
30 मेपासून मनोज जरांगे पाटील यांचे कठोर आमरण उपोषण; सरकारला थेट अल्टिमेटम, ‘बळी गेल्यास जबाबदार कोण?’
मनोज जरांगे पाटील: 30 मेपासून टोकाचे आमरण उपोषण, मराठा समाजासाठी जीवाची आहुती!
-
By
Vivek Raut