भारतात सर्वाधिक लोकप्रिय ठरलेली ट्रेन म्हणून वंदे भारत
ट्रेनची ओळख झाली आहे. यामुळे ही ट्रेन आपआपल्या
भागातून सुरु करण्याची मागणी वाढत आहे. नवीन तंत्रज्ञानाने
Related News
अकोल्यात काँग्रेसला मोठा धक्का…
बी जे पी चा नवा राष्ट्रीय अध्यक्ष कोण?
“पूर्णपणे बिनबुडाचे आरोप” — राहुल गांधींच्या ‘मॅच फिक्सिंग’ दाव्यावर…
उभ्या असलेल्या ट्रक ट्रॉली आग लागल्या प्रकरणी पातुर पोलिसात तक्रार
अवैध डिझेल वाहतूक करणाऱ्या व्हॅन व दुचाकीचा अपघात
अकोट नगर परिषद कृती आराखड्यात जिल्ह्यातून प्रथम
ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा जोमात!
दिल्लीत परतली उकाड्याची लाट; पारा ४० पार, उष्णतेच्या लाटेचा इशारा
पावसाने उघडीप दिल्याने शेतकऱ्यांना दिलासा
दुचाकी अपघातात पत्नीचा दुर्दैवी मृत्यू; दानापूर परिसरात शोककळा
अकोट-अंजनगाव रस्त्यावर भीषण अपघात; ट्रकने ट्रॅक्टर व विटांचा ढिगार उडवला, सुदैवाने जीवितहानी नाही
आदिवासी हक्कांसाठी अनुसूचित जमाती आयोग महत्त्वाचे पाऊल
बनवण्यात आलेले वंदे भारत ट्रेनचे इंजिन फेल झाल्याची घटना
घडली. त्यानंतर मालगाडीचे इंजिन लावून वंदे भारत ट्रेनला नेण्यात आले.
त्यासंदर्भातील व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
नवी दिल्ली ते बनारस जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनच्या इंजिनामध्ये बिघाड
निर्माण झाला. इटावामधील भरनथा रेल्वे स्टेशनवर ही ट्रेन थांबली.
त्यामुळे रेल्वे कर्मचाऱ्यांमध्ये गोंधळ निर्माण झाला. रेल्वेचे तंत्रज्ञ घटनास्थळी
दाखल झाले. परंतु त्यांना ट्रेनमधील बिघाड दूर करता आला नाही. या ट्रेनमध्ये
750 प्रवाशी होते. त्यात अनेक राजकीय नेतेही होते. ट्रेमधील प्रवाशांनी गोंधळ
सुरु केला. त्यानंतर रेल्वे प्रशासनाने शताब्दी एक्सप्रेस आणि अयोध्या जाणारी
वंदे भारत एक्स्प्रेस थांबवून प्रवाशांना त्या गाड्यांमध्ये बसवण्यात आले.
वंदे भारत ट्रेन बराच वेळ भरनथा येथे पडून होती. अखेर तिला नेण्यासाठी
मालगाडीचे इंजिन बोलवण्यात आले. त्यानंतर ती गाडी नेण्यात आली.
सोशल मीडियावर वंदे भारतला मालगाडीचे इंजिन नेत असल्याचा व्हिडिओ
व्हायरल झाला आहे. त्यानंतर लोकांच्या प्रतिक्रिया सुरु झाल्या आहेत.
Read also: https://ajinkyabharat.com/harbor-railway-in-mumbai-dismantled/