खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या दाव्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)
पंतप्रधान नरेंद्र मोदींचे (Narendra Modi) वारसदार होणार का अशी चर्चा रंगली आहे.
भारतीय संस्कृतीत वडील जिवंत असताना मुलांचा विचार होत नाही आणि करायचाही नसतो
Related News
मनभा | २७ जून २०२५ –
२५ जूनच्या मध्यरात्रीपासून सुरू झालेल्या संततधार पावसामुळे मनभा परिसरातील शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावले आहे.
नद्या-नाले दुथडी भरून वाहत आहेत, तर अनेक...
Continue reading
मुंबई | २७ जून २०२५ – हिंदी सक्तीच्या जीआरवरून सरकारनं मागे हटल्याचा
दावा शिवसेना (ठाकरे गट) नेते संजय राऊत यांनी केला आहे.
"राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले, त्यामुळे मराठी म...
Continue reading
मुंबई | २७ जून २०२५ – महाराष्ट्रातील शाळांमध्ये हिंदी सक्तीच्या निर्णयावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे
यांनी कडाडून निषेध व्यक्त केला आहे. त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, "पहिली ते...
Continue reading
मुर्तिजापूर | २९ जून २०२५ – अकोला जिल्ह्याचे नवीन व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी म्हणून नियुक्त झालेल्या
संतोष एन. साळुंके यांचे Vocational Instructors Teachers Association (V...
Continue reading
अकोट
एम.आय.टी.कॉलेज पुणे द्वारा आयोजित वैश्विक मूल्यादिष्ठीत परीक्षेमध्ये श्री शिवाजी विद्यालय अकोटची गौरी
गोपाल मुंडोकार हि विदर्भातून प्रथम आल्याबद्दल तिला २५ हजार रुपये रो...
Continue reading
अकोट
अकोट तालुक्यातील ग्राम पंचायत बोर्डी गौणखनिज 32 लाख रुपये थकित दंड प्रकरणात अकोट तहसीलदार यांचे
कडून न्यायालयाच्या व वरिष्ठांच्या आदेशाला तहसीलसरांनी केराची टोपली दाखवली...
Continue reading
वाशिम, २९ :
वाशिम तालुक्यातील ऐतिहासिक आणि श्रद्धेचे केंद्र असलेल्या अनसिंग येथील शृंगऋषी मंदिरात २९ जून
रोजी सकाळी एक अद्भुत आणि अनपेक्षित घटना घडली. मंदिरातील प्राचीन कुंड...
Continue reading
पिजर प्रतिनिधी
पिंजर पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या ज्ञानप्रकाश विद्यालय , व्यंकटेश बालाजी इंग्लिश स्कूल,
महात्मा ज्योतिबा फुले विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांना जागतिक अमली प...
Continue reading
अकोला | २६ जून २०२५
जागतिक अंमली पदार्थविरोधी दिनानिमित्त अकोला जिल्हा पोलिसांच्या वतीने ‘MISSION उडान – व्यसनमुक्तीची एक संकल्प मोहिम’
या जनजागृती उपक्रमाचे भव्य आयोजन करण्य...
Continue reading
“खड्डे बुजवू शकले नाहीत, ते मंदिरासाठी काय निधी आणणार?” – गिरीश जोशी यांचा सवाल
अकोला | राजेश्वर मंदिराच्या 'ब' वर्ग दर्ज्यावरून अकोल्यात राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे.
भाजपाच...
Continue reading
दानापुर (वा)..
तेल्हारा तालुक्यातील क्रमांक एकची असलेली ग्राम पंचायत दानापुर येथे दिनांक26/06/2025 रोजी राजर्षी
शाहु महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.या क...
Continue reading
थरूर यांची "ऑपरेशन सिंदूर", भारत-रशिया संबंधांवर चर्चा; काँग्रेसमध्ये वाद शिगेला
कॉंग्रेस नेते शशि थरूर सध्या रशियात खासगी दौऱ्यावर असून त्यांनी मॉस्कोमध्ये रशियाचे परराष्ट्र मंत्...
Continue reading
असं विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केलं आहे.
संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलेल्या दाव्यावर प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीस यांनी हे विधान केलं आहे.
“मोदींचा वारसदार संघ ठरवेल असं दिसत आहे. संघाची चर्चा बंद दाराआड असते.
बंद दाराआड झालेली चर्चा बाहेर येत नाही. पण काही संकेत स्पष्ट असतात.
संघ पुढील नेता ठरवेल आणि तो बहुतेक महाराष्ट्रातील असेल,”
असा दावा संजय राऊत यांनी केला आहे.
संजय राऊतांनी नरेंद्र मोदींचा उत्तराधिकारी म्हणून तुमचं नाव घेतल्यासंबंधी विचारलं असता देवेंद्र फडणवीस म्हणाले की,
“नरेंद्र मोदींचा उत्तराधिकारी शोधण्याचं कोणतंही कारण नाही. नरेंद्र मोदी आमचे नेते आहेत.
अजून बरीच वर्षं नरेंद्र मोदी काम करणार आहेत. आमचा सर्वांचा आग्रह आहे.
आम्ही 2029 चे पंतप्रधान म्हणून मोदींकडेच पाहत आहोत.
त्यामुळे आता अशी चर्चा करणं योग्य नाही”.
पुढे ते म्हणाले की, “भारतीय संस्कृतीत वडील जिवंत असताना मुलांचा विचार होत नाही आणि करायचाही नसतो.
ही मुघली संस्कृती आहे. तिथे वडील जिवंत असताना मुलं अशा प्रकारचे विचार करतात.
सध्या कोणताही उत्तराधिकारी निवडण्याचा प्रश्न नाही”.
राज ठाकरेंच्या भाषणावर मांडली भूमिका
दरम्यान यावेळी त्यांनी राज ठाकरेंनी भाषणात मांडलेल्या मुद्यांवरही भाष्य केलं.
राज्य चांगलं चालवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
राज्य चालवताना सर्वांची मदत आणि विश्वासात घेऊन राज्य चालवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
राज्य चालवताना सर्वांना सोबत घेऊन चालवणे हे आमचं उद्दिष्ट आहे असं त्यांन सांगितलं.
मशिदीवरील भोंग्यांसंदर्भात विचारण्यात आलं असता ते म्हणाले, 100 टक्के जे नियमाच्या बाहेर
असतील आणि सुप्रीम कोर्टांचा जो आदेश आहे या आदेशाचे तंतोतंत पालन महाराष्ट्र सरकार करेल.
राज ठाकरेंनी औरगंजेबाच्या कबरीसंदर्भात मांडलेल्या भूमिकेवर ते म्हणाले, “ही जी कबर आहे
तिला एएसआयचं संरक्षण आहे. आम्हाला औरंगजेब आवडो ना आवडो,
कायद्याने 50-60 वर्षांपूर्वी त्या कबरीला संरक्षण दिलं आहे.
म्हणून त्या ठिकाणी कायद्याचं पालन करणं आमची जबाबदारी आहे.
पण कुठल्याही परिस्थितीत औरंगजेबाच्या कबरीचं उदात्तीकरण होऊ देणार नाही”.