“वादळी वारे, मुसळधार पाऊस आणि रेड अलर्ट:

"वादळी वारे, मुसळधार पाऊस आणि रेड अलर्ट:

मुंबई : संपूर्ण महाराष्ट्रावर निसर्गाचा प्रचंड तडाखा बसण्याची शक्यता वर्तवण्यात आली असून,

हवामान विभागाने (IMD) राज्यातील अनेक जिल्ह्यांसाठी मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.

मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरीसह १४ जिल्ह्यांमध्ये अति मुसळधार पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे,

Related News

तर दोन जिल्ह्यांमध्ये ‘रेड अलर्ट’ देण्यात आला आहे.

किनारी जिल्ह्यांमध्ये धोक्याची घंटा

कोकणातल्या पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यांसह

मुसळधार पावसाचा तडाखा बसणार आहे.

विशेषतः २३ ते २५ मेदरम्यान मुंबई आणि ठाणे जिल्ह्यांना जोरदार इशारा देण्यात आला आहे.

समुद्र किनारी राहणाऱ्या नागरिकांनी सतर्क राहण्याचे आणि शक्य असल्यास

सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

घाटमाथ्यावर दरडी कोसळण्याचा धोका

पुणे, नाशिक, कोल्हापूर आणि सातारा घाटमाथ्यांमध्ये अतिमुसळधार पावसाची

शक्यता असल्याने दरडी कोसळण्याचा धोका निर्माण झाला आहे.

विशेषतः प्रवाशांनी घाटमार्गांचा प्रवास टाळावा आणि हवामानाचा अंदाज लक्षात घेऊनच मार्गक्रमण करावं, असं आवाहन करण्यात आलं आहे.

विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातही पावसाचा कहर

उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, जळगाव तसेच विदर्भातील अकोला, बुलढाणा,

नागपूर, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोलीसह इतर जिल्ह्यांमध्ये वादळी वारे, विजांचा कडकडाट

आणि मुसळधार पावसाची शक्यता आहे. यामुळे शेतीचे मोठे नुकसान

होण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांनी काळजी घेण्याचे आवाहन हवामान विभागाने केलं आहे.

वाहतूक आणि दैनंदिन व्यवहार ठप्प होण्याची शक्यता

या पावसामुळे शहरांत वाहतुकीस अडथळा निर्माण होण्याची शक्यता असून, विजेच्या तारा,

झाडं पडण्याचे प्रसंग वाढू शकतात. नागरिकांनी झाडाखाली उभं राहणं टाळावं,

विजेच्या खांबांपासून दूर रहावं आणि सुरक्षिततेचे सर्व उपाय योजावेत, असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.

Read Also : https://ajinkyabharat.com/pakistanchaya-panyachaya-threaters-bharata-bharatacha-sangat/

Related News