उंबर्डा बाजार : (वार्ताहर)
उंबर्डाबाजारसह परिसरात शेती मशागतीची कामे जवळपास पुर्ण झाली असल्याने तथा गेल्या
दोन दिवसाच्या पावसामुळे कपाशीच्या लागवडीला सुरुवात केली आहे.
Related News
वारीसाठी मध्य रेल्वेची तयारी; ८० विशेष गाड्यांची सोय, कर्नाटकहूनही रेल्वे
सोयाबीनपेक्षा कपाशीला पसंती दहिगाव गावंडे येथे पेरणीला वेग : शेतशिवारात लगबग
एअर इंडिया विमान दुर्घटनेत तरुण क्रिकेटपटू दीर्ध पटेलचा मृत्यू; इंग्लंडला जात असताना अपघात
कोच्चीहून दिल्लीला जाणाऱ्या इंडिगो विमानाला बॉम्बची धमकी; नागपूरात आपत्कालीन लँडिंग
भेंडीमहाल ते पिंजर रस्त्यावर खड्डे! अपघाताची शक्यता
विराट कोहलीचं मॅचदरम्यान ‘स्पेशल चॉकलेट’; किंमत तब्बल ५ हजार रुपये!
कामरगावात ज्यादा दराने बी बियाणे व रासायनिक खताचा काळा बाजार करून शेतकऱ्यांना विक्री करून आर्थिक लूट ;
नाशिकमध्ये उद्धव सेनेला आणखी एक हादरा; चार माजी नगरसेवक शिंदे गटात
वाई फाट्यावर उभ्या ट्रकला दुचाकीची धडक,एक जागीच ठार
अज्ञात वाहनाच्या धडकेत माकडाचे दुर्दैवी निधन
विनंती अर्ज देऊनही मोखा ग्रामपंचायत चा कारभार नियोजन शून्य
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत शिवसेनेचा भगवा फडकवा – शिवसेना उपनेते आ.नितीन देशमुख
यावर्षी पावसाळा वेळेवर येणार असल्याचे हवामान खात्याचे भाकित लक्षात घेवुन शेतकऱ्यांनी पैशाची चणचण
असतांना सुध्दा जुळवाजुळव करून शेतीच्या मशागतीची कामे उरकून घेण्याच्या कामाला प्राधान्य दिले आहे.
अशातच गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या समाधानकारक पावसाने उंबर्डाबाजार परिसरात अनेक
शेतकऱ्यांनी शेतात कपाशीच्या लागवडीला सुरूवात केल्याने उन्हाळा सुरू झाल्यापासून शेत मजूरांना रोजगार उपलब्ध
नसल्याने ऐन वेळेवर रोजगार मिळाल्याने मजूर वर्गाला दिलासा मिळाला आहे.
त्यामुळे शेतकरी वर्गाने मृग नक्षत्राच्या मुहूर्तावर कपाशी लागवडीला सुरुवात केली आहे.
शेतकऱ्यांचा कापूस, सोयाबीनकडे कल
यावर्षी काही भागात पेरणी योग्य पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांनी कापूस पिकाची लागवड सुरू केली आहे.
तर आणखी दमदार पाऊस झाल्या नंतर शेतकरी सोयाबीन
पिकाची पेरणी करतात कापूस व सोयाबीन हे नगदी पीक असल्यामुळे शेतकरी या पिकाकडे वळला आहे.