बदलापुरातील एका नामांकित शाळेत शिकणाऱ्या दोन चिमुकल्यांवर
लैंगिक अत्याचार झाल्याच्या घटनेने महाराष्ट्र हादरला आहे.
यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे.
Related News
धामणा बुद्रुक येथे कॉलऱ्याचा शिरकाव; एकाचा मृत्यू, ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण
अकोल्यातील शेतकऱ्याचा मुलगा बनला ‘क्रिकेट पंच’
धोंडा आखर येथे ‘प्रधानमंत्री धरती आबा’ अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद
परशुराम नाईक विद्यालयाचे तंबाखू मुक्त अभियान कौतुकास्पद – न्यायाधीश आर. एन. बंसल यांची प्रशंसा
बोर्डी ग्रामपंचायतीचा भोंगळ कारभार : सांडपाण्यामुळे नागरिक त्रस्त
इंझोरी महसूल मंडळात २०० एकरांवर दुबार पेरणीचे संकट
“आपके नाम से हर शख्स…” शिंदेंचा शेर आणि ‘जय गुजरात’ घोषणेने चर्चांना उधाण!
सेंट पॉल्स अकॅडमी ,अकोट येथे शाळेचा स्थापना दिवस उत्साहात साजरा
गजानन नागरी पतसंस्थेत मोठा आर्थिक गैरव्यवहार? ठेवीदारांची गर्दी, उपनिबंधकांकडे तक्रार
शाळेचा पहिला ‘आनंददायी’ दिवस !
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात :
नागपूरमध्ये वैद्यकक्षेत्राची क्रांती : कॅन्सरमुळे लिंग गमावलेल्या रुग्णावर यशस्वी शस्त्रक्रिया
गेल्या 8 तासांपासून बदलापूरहून कर्जतच्या दिशेने जाणारी रेल्वे वाहतूक
ठप्प आहे. आता जिल्हाधिकाऱ्यांपासून अनेक बड्या अधिकाऱ्यांनी
बदलापूर रेल्वे स्थानकावरील आंदोलकांना आंदोलन मागे घेण्याचं आवाहन केलं.
पण आंदोलक ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नाहीत. आंदोलकांचा आक्रोश
पाहता राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी आंदोलकांची समजूत
काढण्याचा प्रयत्न केला. यावेळी गिरीश महाजन यांनी याप्रकरणी एक मोठं वक्तव्य केलं.
“बदलापुरात झालेल्या घटनेबद्दल जेवढा तुमच्या मनात राग आहे.
तेवढा आमच्या मनातही आहे. चर्चेतून विषय सुटत असतो. इथे कुणाची लीडरशीप नाहीये.
कुणी कुणाचं ऐकत नाही. तरुण आहेत. त्यांचा राग योग्य आहे.
पण रेल्वे बंद करणं हा पर्याय नाही. एसआयटी नेमली आहे. फार्स्ट ट्रॅकमध्ये
खटला चालवणार आहेत. उज्ज्वल निकम यांना आम्ही हा खटला चालवायला देणार आहोत”,
अशी माहिती गिरीश महाजन यांनी दिली. “पीआयला निलंबित केलं.
मुख्याध्यापकाला निलंबित केलं. कुणाची लीडरशीप नाहीये. एका गावचेही नाही.
स्थानिकही नाही. त्यामुळे कुणाशी बोलावं. कुणाला कोण समजावणार हे कठिण झालं आहे.
लोक आरोपीला फाशी द्या असं म्हणत आहेत. पण आपल्याकडे तसा कायदा नाही.
जे शक्यच नाही अशी मागणी मान्य करता येत नाही. घटना संतापजनक आहे.
आमच्या मनातही तेवढाच राग आहे. पण ही शिक्षा कायद्याने द्यावी लागेल.
कसाबने एवढी माणसे मारली. पण त्यालाही आपण कायद्यानेच शिक्षा दिली”,
असेही गिरीश महाजन म्हणाले.
Read also: https://ajinkyabharat.com/vinesh-phogat-utarnar-rajyastakhya-akhadyat/