उद्धव ठाकरेंचा जनाधार संपला आहे अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस यांनी केली. मुंबईत अमित शाह यांच्या उपस्थितीत
झालेल्या भाजपा पदाधिकारी मेळाव्यात देवेंद्र फडणवीस यांनी हे
Related News
ऋषी सुनकांनी पंतप्रधान मोदींसमोर दिल्लीत वाहतुकीवर केले ‘ट्रोल’, AI वर भारताचा आत्मविश्वास अधोरेखित
दिल्ली - ब्रिटनचे माजी पंतप्रधान आणि काँर्जर्व्हेटि...
Continue reading
मायक्रोसॉफ्टची भारतासाठी ऐतिहासिक गुंतवणूक: AI मध्ये 50 अब्ज डॉलर्स, मध्यमवर्गीयांसाठी काय बदलणार?
भारतीय AI तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात मोठा टर्निंग पॉइंट य...
Continue reading
प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेत निर्बंधांचा आरोप चुकीचा; महावितरणकडून ग्राहकांचे संरक्षण
सौरऊर्जा क्षेत्रातील काही प्रकल्प पुरवठादारांनी
Continue reading
गव्हाच्या पिठाऐवजी कोणते पीठ खाल्ल्यास वजन कमी होईल? तज्ज्ञांचा सल्ला
आजकाल वजन नियंत्रण हा सर्वांसाठी मोठा विषय बनला आहे. सततच्या गोंधळात, ताणतण...
Continue reading
अमेरिका-इराण संघर्ष: युद्ध झाले तर कोण जिंकणार? कोणाची ताकद जास्त?
सध्या जागतिक स्तरावर मध्यपूर्वेतील परिस्थिती तणावपूर्ण झाली आहे. अमेरिका आणि इराण य...
Continue reading
कोल्ड ड्रिंक पिण्याने गॅस आणि अॅसिडिटीवर आराम मिळतो का? तज्ज्ञांचा स्पष्ट सल्ला
गॅस आणि अॅसिडिटीची समस्या आजकाल खूप सामान्य झाली ...
Continue reading
अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर अमोल कोल्हेंचा मोठा गौप्यस्फोट
अमोल कोल्हेंचा मोठा गौप्यस्फोट: माजी उप...
Continue reading
गावातील वडिलोपार्जित जमिनीवर अधिकार मिळवण्याची सोपी मार्गदर्शिका – पीएम स्वामित्व योजना
ग्रामीण भागात वडिलोपार्जित जमिनी वर कागदपत्रांचा अभ...
Continue reading
अलेक्झांडर वांग: एआय इम्पॅक्ट समिटमध्ये मोदींसोबत दिसला तरुण अब्जाधीश
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोबत एआय इम्पॅक्ट समिट २०२६ मध्ये ...
Continue reading
BSNL 5G सेवा: दिल्लीपासून सॉफ्ट लाँच, पुढील 6 महिन्यांत सुरू होणार
देशातील दूरसंचार क्षेत्रात मोठा बदल घडवून आणणार्या BSNL ची 5G सेवा लवकरच सुरू होणार आ...
Continue reading
चंद्रपूर: कारल्याच्या भाजीसाठी ६५ वर्षीय आईवर मुलाने केले अमानुष हल्ला, दारूच्या नशेने झाली माणुसकी हरवली
चंद्रपूर शहराजवळील डोंगरगावात एक भयंकर घटना समोर आली आहे, ज्याने संपूर्ण ...
Continue reading
विधान केलं आहे. आपले सगळे विरोधक एकत्र आले आहेत.
निवडणूक जिंकण्यासाठी ते कुठलीही तडजोड करायला तयार
आहेत. त्यामुळे अतिआत्मविश्वास ठेवू नका आणि गाफील राहू
नका, असा सल्ला देवेंद्र फडणवीस यांनी कार्यकर्त्यांना दिला.
राज्यातील ३ कोटींपेक्षा जास्त लोक हे सरकारी योजनांचे लाभार्थी
आहेत. सरकारने जी कामं केली त्यामुळे लोक आपल्याबरोबर
आहेत. या सगळ्यांची मतं आपल्याला मिळाली तर राज्यात
महायुतीचं सरकार पुन्हा येईल असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं
आहे. उद्धव ठाकरेंचा जनाधार संपला आहे. त्यामुळेच त्यांच्या
रॅलीत हिरवे झेंडे नाचवले जात आहेत. मराठी आणि हिंदू मतं
त्यांच्या बरोबर नाहीत. राज्यात आपलंच सरकार येईल ही स्थिती
आहे. मात्र अति आत्मविश्वासामुळे विकेट पडू देऊ नका, असंही
आवाहन देवेंद्र फडणवीस यांनी केलं.
Read also: https://ajinkyabharat.com/malaika-aroracha-shines-in-yek-number/