मुसळधार पावसाने राज्यातील अनेक भागात दाणादाण उडवली.
गेल्या तीन दिवसांपासून काही भागात कोसळधार सुरू आहे. या
परतीच्या पावसाने शेतीचे आणि पिकांचे मोठे नुकसान झाल्याचे
Related News
अलीगढमधील हॉटेलमध्ये देवतांच्या चित्रांसह नॅपकिन दिल्याने गोंधळ;
पाच वर्षांनंतर कैलास-मानसरोवर यात्रेला पुन्हा सुरूवात;
चंदननगरमध्ये तरुणाचा निर्घृण खून
पातूर शहरात ‘रान कसायांची’ टोळी सक्रिय
अकोल्यात गुड फ्रायडे भाविकतेने साजरा;
एका महिन्याच्या चिमुरडीची निर्घृणपणे हत्या….
काही सेकंदांची चूक आणि आयुष्य संपलं…
जय श्री राम ग्रुप द्वारा गौसेवा कार्य
ईस्टर संडेच्या तयारीने धार्मिक वातावरण भारावले
बीअरच्या बाटलीने ३६ वार:
चित्तौडगडमध्ये ‘द बर्निंग कार’! कलेक्ट्रेटजवळ उभी असलेली कार पेटली
“अंबाजोगाईत वकिल महिला बळी ठरली एका कटाचा?
दिसून आले आहे. उभी पीकं आडवी झाली आहेत. तर काही
पिकांवर रोगराईचा प्रादुर्भाव दिसून आला आहे. या आस्मानी
संकटामुळे शेतकऱ्याचा हाता तोंडाशी आलेला घास हिरावला गेला
आहे. बळीराजा पुन्हा एकदा संकटात सापडला आहे.
नांदेड जिल्ह्यात सततच्या पाऊसामुळे पपई पिकांवर रोगांचा
प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे फळबागांचं मोठं नुकसान होत आहे.
मुदखेड तालुक्यातील पपईच्या बागांचे नुकसान झाले आहे.
जिल्ह्यात सलग गेल्या काही दिवसांपासून झालेल्या पावसाने पपई
पिकावर रोंगाचा प्रादुर्भाव झाल्याने पपईची उगवन क्षमता कमी
झाली. पपई पिकत नसल्याने पपई बागेचं प्रचंड नुकसान झालं
आहे. शेकडो एकरवरील पपईच्या बांगा संकटात आल्या आहेत.
जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून विजेच्या कडकडाटासह आणि
वादळी वाऱ्यासह पाऊस सुरू आहे. त्याचा फटका पपई पिकाला
बसला आहे. ठाणे जिल्ह्यातील शहापूर येथील भातसा नगरमध्ये
काल रात्री मुसळधार पावसामुळे शेतीची मोठे नुकसान झाले आहे.
त्यामूळे हात तोंडाशी आलेल्या भात पिकाचे मोठे नुसकान झाले
आहे. गोंदिया जिल्ह्यात आज सकाळपासूनच पावसाने जोरदार
हजेरी लावली. पारतीच्या पावसाचे जिल्ह्यात जोरदार हजेरी
लावल्याने शेतकऱ्यांच्या शेतात असलेल्या हलक्या स्वरूपाच्या
धान पिकांना यामुळे धोका निर्माण झाला आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/tremendous-trailer-of-yek-number-released/