अकोला-पातूर महामार्गावरील शिरला गावाजवळ कोंबड्यांनी भरलेल्या मालवाहू पिकअप वाहनाचा भीषण अपघात झाला. अकोल्याहून पातूरच्या दिशेने जात असताना वाहनाचा अचानक टायर फुटल्याने चालकाचे नियंत्रण सुटले आणि पिकअप रस्त्याच्या कडेला उलटली.
या अपघातात वाहनातील शेकडो कोंबड्यांचा मृत्यू झाला असून चालकाचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. वाहन चालक आणि त्याचा मदतनीस किरकोळ जखमी झाले असून त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना मदत केली तसेच अपघातग्रस्त वाहनातील कोंबड्या बाहेर काढण्याचे प्रयत्न केले. अपघातामुळे काही काळ अकोला-पातूर महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. नंतर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून वाहतूक सुरळीत केली.
Related News
राष्ट्रवादीच्या मिशन 2027 ची तयारी? प्रशांत किशोरांकडे सोपवणार निवडणुकीची कमान?
शिवसेना कुणाची? सुप्रीम कोर्टात डॉ. आंबेडकरांच्या विधानाचा उल्लेख; सुनावणीत मोठी टिप्पणी
शिवसेना चिन्ह वादावर सुप्रीम कोर्टाचे मोठे विधान; ‘आमचा निर्णय भविष्यासाठी लागू होईल’
शिवसेना कोणाची? सुप्रीम कोर्टात कपिल सिब्बल यांचा निवडणूक आयोगाला थेट सवाल
’50 रुग्णांचा जीव गेला तर परत आणणार का?’ हायकोर्टाचा डॉक्टरांना थेट सवाल
मनोज जरांगे पाटील यांचा लक्ष्मण हाकेंवर घणाघात; “ही कुठली पैदास?” म्हणत केला जोरदार हल्ला
मोठी घडामोड! प्रशांत किशोर थेट सुनेत्रा पवारांच्या भेटीला; राजकारणात नव्या समीकरणांची चर्चा
मनोज जरांगे यांच्या आरोपांवर बावनकुळे यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “माझी नार्को टेस्ट करा”
प्राथमिक माहितीनुसार, वाहनाचा टायर फुटल्याने हा अपघात घडल्याचे समोर आले असून, पुढील तपास सुरू आहे. चालकाचे मोठे आर्थिक नुकसान झाल्याने परिसरात या घटनेची चर्चा सुरू आहे.
