दोन जवान शहीद, तीन दहशतवादी ठार
जम्मू-काश्मीरमध्ये शनिवारी पंतप्रधान मोदींच्या रॅलीपूर्वी दोन ठिकाणी
सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. बारामुल्लामध्ये
Related News
अकोट ग्रामीण पोलीसांची जलद कारवाई – विनयभंग प्रकरणातील आरोपीविरोधात २४ तासांत दोषारोपपत्र दाखल
शिवसेना (उबाठा) मध्ये नेतृत्वबदलामुळे पक्षातील अंतर्गत कलह आणखी गडद होणार
दोन कोटी विस लाखां च्या नावाखाली रुग्णसेवकाला सायबर गुंड्याकडून गंडवण्याचा प्रयत्न
शाळांचे परिसर एका महिन्यात तंबाखूमुक्त करण्याचे आदेश
अतिक्रमण हटाव मोहीम का फक्त दुर्बळांवरच? अपंगाचे दुकान तोडले –
जुन्या वादातून दोन गटात झालेल्या शस्त्रास्त्र हाणामारी
अकोल्यात विविध मागण्यांसाठी आज धरणे आंदोलन करणाऱ्यात आले
नवी दिल्लीतील भारत मंडपममध्ये पार पडलेल्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल
अखेर कातखेड,पिंपळखुटा गावात रस्त्याच्या कामाला सुरुवात
शेलुबाजार आरोग्य केंद्रात क्षयरुग्ण तपासणी शिबिर; डिजिटल एक्स-रेद्वारे ८७ संशयितांची तपासणी
पार्डी ताड–पिंपळखुटा रस्ता सहा महिन्यांतच खड्ड्यात! मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेवर प्रश्नचिन्ह
अखेर लेखी आश्वासनाने उपोषणाची मांघार!
तीन दहशतवादी ठार झाले आहेत. काल किश्तवाडमध्ये दोन जवान शहीद
झाले होते. तर अन्य दोघे जखमी झाले आहेत. दोन्ही ठिकाणी लष्कर आणि
पोलिसांची संयुक्त कारवाई सुरू आहे. बारामुल्ला जिल्ह्यातील क्रेरी येथील
चक टापर भागात शुक्रवारी (13 सप्टेंबर) रात्री 11 वाजण्याच्या सुमारास ही
चकमक सुरू झाली. रात्री उशिरा ही कारवाई थांबवण्यात आली. आज
सकाळी सुरक्षा दलांनी तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला. त्यांची अद्याप ओळख
पटलेली नाही. किश्तवाडच्या चत्रू पट्ट्यातील नैदघम गावात शुक्रवारी दुपारी
साडेतीनच्या सुमारास चकमक सुरू झाली. जैश-ए-मोहम्मदच्या 3 दहशतवाद्यांच्या
उपस्थितीची गुप्त माहिती लष्कराला मिळाली होती. शोध मोहिमेदरम्यान चकमक
सुरू झाली. नायब सुभेदार विपिन कुमार आणि कॉन्स्टेबल अरविंद सिंग अशी
शहीद जवानांची नावे आहेत.
Read also: https://ajinkyabharat.com/congress-mla-jhuber-khan-investigation-death/