शेतकऱ्यांचा आसूड मोर्चा ; कर्जमाफीसाठी शासनाला निवेदन
अकोला, दि. 29 :राज्यात यंदाच्या पावसाळ्याच्या सुरुवातीला हवामान खात्याने मान्सून लवकर येईल असा अंदाज व्यक्त केला होता. सुरुवातीला पावसाचे समाधानकारक आगमन झाल्याने शेतकरी व शेतमजुरांनी चांगल्या पिकांची स्वप्ने पाहिली होती. मात्र, अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले असून, कर्जमाफीच्या मागणीने आवाज उठवू लागले आहेत.कर्जमाफीच्या या प्रश्नाकडे शासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे, या मागणीसाठी अकोल्यात आसूड मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाचे नेतृत्व स्थानिक तरुण प्रशांत डिक्कर यांनी केले. त्यांनी गावोगावी जाऊन जात-पात, पक्षीय भेद विसरून शेतकऱ्यांनी एकत्र यावे, असे आवाहन केले.मोर्चाची सुरुवात अग्रेशन चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करून करण्यात आली. त्यानंतर मोर्चेकऱ्यांनी संत तुकाराम महाराज स्मारक तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानात डॉ. आंबेडकर, भगवान बुद्ध व महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यांना अभिवादन केले.यानंतर तहसीलदार यांच्यामार्फत माननीय मुख्यमंत्री यांना निवेदन सादर करून शेतकऱ्यांना तातडीने कर्जमाफी देण्याची मागणी करण्यात आली. या मोर्चात शेतकऱ्यांसोबत शेतमजूर, महिला व युवकांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता. पारंपरिक बैलगाड्यांसह निघालेल्या या मोर्चामुळे अकोल्यातील वातावरण काही काळ आंदोलनीय झाले होते.शेतकऱ्यांच्या या मागणीकडे शासन सकारात्मक दृष्टीने पाहील अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
read also : https://ajinkyabharat.com/sustainable-pavasamue-cow-death/
